शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही मंत्र्यांचे माझ्यावर जास्तच प्रेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2017 00:38 IST

परदेशात जाताना मीच विजय शिवतारे व दिलीप कांबळे या जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांना शहराच्या कचरा प्रश्नात लक्ष घालण्याबाबत सांगितले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : परदेशात जाताना मीच विजय शिवतारे व दिलीप कांबळे या जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांना शहराच्या कचरा प्रश्नात लक्ष घालण्याबाबत सांगितले होते. त्यांचे बहुधा ‘जास्त प्रेम’ असावे, त्यामुळे त्यांनी जास्तच लक्ष घातले अशा शब्दांत पालकमंत्री गिरीश बापट यांनी कचरा विषयात दोन्ही मंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली. परदेशातूनही मी या विषयावर लक्ष ठेवून होतो, आता आल्यावर पूर्ण लक्ष देत आहे, असे ते म्हणाले.शहरात कचराप्रश्न पेटला असताना बापट परदेश दौऱ्यावर होते. याबाबत विचारले असता बापट म्हणाले, की कचऱ्यावर प्रक्रिया करणारे लहान प्रकल्प प्रभागांमध्ये सुरू करण्याची कल्पना माझीच होती. आता प्रत्येक प्रभागात असे करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कचऱ्यात कागद व प्लॅस्टिक याचे प्रमाण जास्त असते. ते वेगळे केले तरी कचऱ्याचे प्रमाण कमी होईल. पुण्यात सध्या तरी पाणी कपातीचा मुळीच विचार नाही, असे बापट यांनी स्पष्ट केले. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन केले आहे. त्यात फारसा बदल होणार नाही. शेतीसाठीचे आवर्तन सुरू असले तरी त्यातून फार पाणी संपणार नाही, अशी माहिती त्यांनी दिली. कॅनॉलच्या गळती व अन्य कामांसाठी ५ कोटी रुपयांच्या आतील खर्च करण्यास स्थानिकस्तरावर परवानगी द्यावी, असा प्रस्ताव सरकारला दिला आहे.परदेशात सरकारी खर्चाने गेला नाही असे सांगताना बापट म्हणाले, ‘‘जगातील अनेक देशांचा मिळून एक फंड आहे. त्यातून अशा दौऱ्यांचा खर्च होत असतो. गेली २ वर्षे संसदीय कामकाजमंत्री म्हणून काम पाहत आहे. अन्य देशांमधील या पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी दौरा केला. नियोजित दौरा ऐनवेळी रद्द करता येत नाही, त्यामुळेच दोन्ही मंत्र्यांना कचऱ्याच्या समस्येत लक्ष द्या, असे सांगितले होते.’’कचरा डेपोवर कॅपिंगच्या सूचनाफुरसुंगी व उरुळी येथील ग्रामस्थांबरोबरही चर्चा करणार आहे. त्यांच्या मागण्या योग्य आहेत. त्यांचा दूषित पाणी तसेच आरोग्याचा प्रश्न सोडवला जाईल. तेथील डेपोवर कॅपिंग करण्याबाबतही महापालिकेला सूचना दिल्या आहेत. ते कामही होईल. रविवारी (दि. १४) काही कचरा प्रक्रिया प्रकल्पांना भेट देणार आहे. त्यांची कार्यक्षमता वाढवण्याबाबत काय करता येईल, याबाबत तज्ज्ञांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे बापट म्हणाले.