शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

दोन्ही मंत्र्यांचे माझ्यावर जास्तच प्रेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2017 00:38 IST

परदेशात जाताना मीच विजय शिवतारे व दिलीप कांबळे या जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांना शहराच्या कचरा प्रश्नात लक्ष घालण्याबाबत सांगितले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : परदेशात जाताना मीच विजय शिवतारे व दिलीप कांबळे या जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांना शहराच्या कचरा प्रश्नात लक्ष घालण्याबाबत सांगितले होते. त्यांचे बहुधा ‘जास्त प्रेम’ असावे, त्यामुळे त्यांनी जास्तच लक्ष घातले अशा शब्दांत पालकमंत्री गिरीश बापट यांनी कचरा विषयात दोन्ही मंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली. परदेशातूनही मी या विषयावर लक्ष ठेवून होतो, आता आल्यावर पूर्ण लक्ष देत आहे, असे ते म्हणाले.शहरात कचराप्रश्न पेटला असताना बापट परदेश दौऱ्यावर होते. याबाबत विचारले असता बापट म्हणाले, की कचऱ्यावर प्रक्रिया करणारे लहान प्रकल्प प्रभागांमध्ये सुरू करण्याची कल्पना माझीच होती. आता प्रत्येक प्रभागात असे करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कचऱ्यात कागद व प्लॅस्टिक याचे प्रमाण जास्त असते. ते वेगळे केले तरी कचऱ्याचे प्रमाण कमी होईल. पुण्यात सध्या तरी पाणी कपातीचा मुळीच विचार नाही, असे बापट यांनी स्पष्ट केले. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन केले आहे. त्यात फारसा बदल होणार नाही. शेतीसाठीचे आवर्तन सुरू असले तरी त्यातून फार पाणी संपणार नाही, अशी माहिती त्यांनी दिली. कॅनॉलच्या गळती व अन्य कामांसाठी ५ कोटी रुपयांच्या आतील खर्च करण्यास स्थानिकस्तरावर परवानगी द्यावी, असा प्रस्ताव सरकारला दिला आहे.परदेशात सरकारी खर्चाने गेला नाही असे सांगताना बापट म्हणाले, ‘‘जगातील अनेक देशांचा मिळून एक फंड आहे. त्यातून अशा दौऱ्यांचा खर्च होत असतो. गेली २ वर्षे संसदीय कामकाजमंत्री म्हणून काम पाहत आहे. अन्य देशांमधील या पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी दौरा केला. नियोजित दौरा ऐनवेळी रद्द करता येत नाही, त्यामुळेच दोन्ही मंत्र्यांना कचऱ्याच्या समस्येत लक्ष द्या, असे सांगितले होते.’’कचरा डेपोवर कॅपिंगच्या सूचनाफुरसुंगी व उरुळी येथील ग्रामस्थांबरोबरही चर्चा करणार आहे. त्यांच्या मागण्या योग्य आहेत. त्यांचा दूषित पाणी तसेच आरोग्याचा प्रश्न सोडवला जाईल. तेथील डेपोवर कॅपिंग करण्याबाबतही महापालिकेला सूचना दिल्या आहेत. ते कामही होईल. रविवारी (दि. १४) काही कचरा प्रक्रिया प्रकल्पांना भेट देणार आहे. त्यांची कार्यक्षमता वाढवण्याबाबत काय करता येईल, याबाबत तज्ज्ञांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे बापट म्हणाले.