शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

दोन्ही मंत्र्यांचे माझ्यावर जास्तच प्रेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2017 00:38 IST

परदेशात जाताना मीच विजय शिवतारे व दिलीप कांबळे या जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांना शहराच्या कचरा प्रश्नात लक्ष घालण्याबाबत सांगितले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : परदेशात जाताना मीच विजय शिवतारे व दिलीप कांबळे या जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांना शहराच्या कचरा प्रश्नात लक्ष घालण्याबाबत सांगितले होते. त्यांचे बहुधा ‘जास्त प्रेम’ असावे, त्यामुळे त्यांनी जास्तच लक्ष घातले अशा शब्दांत पालकमंत्री गिरीश बापट यांनी कचरा विषयात दोन्ही मंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली. परदेशातूनही मी या विषयावर लक्ष ठेवून होतो, आता आल्यावर पूर्ण लक्ष देत आहे, असे ते म्हणाले.शहरात कचराप्रश्न पेटला असताना बापट परदेश दौऱ्यावर होते. याबाबत विचारले असता बापट म्हणाले, की कचऱ्यावर प्रक्रिया करणारे लहान प्रकल्प प्रभागांमध्ये सुरू करण्याची कल्पना माझीच होती. आता प्रत्येक प्रभागात असे करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कचऱ्यात कागद व प्लॅस्टिक याचे प्रमाण जास्त असते. ते वेगळे केले तरी कचऱ्याचे प्रमाण कमी होईल. पुण्यात सध्या तरी पाणी कपातीचा मुळीच विचार नाही, असे बापट यांनी स्पष्ट केले. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन केले आहे. त्यात फारसा बदल होणार नाही. शेतीसाठीचे आवर्तन सुरू असले तरी त्यातून फार पाणी संपणार नाही, अशी माहिती त्यांनी दिली. कॅनॉलच्या गळती व अन्य कामांसाठी ५ कोटी रुपयांच्या आतील खर्च करण्यास स्थानिकस्तरावर परवानगी द्यावी, असा प्रस्ताव सरकारला दिला आहे.परदेशात सरकारी खर्चाने गेला नाही असे सांगताना बापट म्हणाले, ‘‘जगातील अनेक देशांचा मिळून एक फंड आहे. त्यातून अशा दौऱ्यांचा खर्च होत असतो. गेली २ वर्षे संसदीय कामकाजमंत्री म्हणून काम पाहत आहे. अन्य देशांमधील या पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी दौरा केला. नियोजित दौरा ऐनवेळी रद्द करता येत नाही, त्यामुळेच दोन्ही मंत्र्यांना कचऱ्याच्या समस्येत लक्ष द्या, असे सांगितले होते.’’कचरा डेपोवर कॅपिंगच्या सूचनाफुरसुंगी व उरुळी येथील ग्रामस्थांबरोबरही चर्चा करणार आहे. त्यांच्या मागण्या योग्य आहेत. त्यांचा दूषित पाणी तसेच आरोग्याचा प्रश्न सोडवला जाईल. तेथील डेपोवर कॅपिंग करण्याबाबतही महापालिकेला सूचना दिल्या आहेत. ते कामही होईल. रविवारी (दि. १४) काही कचरा प्रक्रिया प्रकल्पांना भेट देणार आहे. त्यांची कार्यक्षमता वाढवण्याबाबत काय करता येईल, याबाबत तज्ज्ञांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे बापट म्हणाले.