शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

दोन्ही मंत्री डेंजर झोनमध्ये : पवार कोकणात येणार का; चिपळूण-गुहागरवर साऱ्यांच्या नजरा...

By admin | Updated: October 7, 2014 23:42 IST

रत्नागिरी : मतदारसंघात व्यक्तिगत संपर्कावर भर

रत्नागिरी : आठ दिवसांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतील मतदानासाठी जिल्ह्यातील पाच मतदारसंघात कार्यकर्ते नेते, शिक्षक प्रचाराला लागले आहेत. यंदा प्रथमच या निवडणुकीला लाटेचे रूप प्राप्त झाल्याने जिल्हाभरातील सर्व लढती महत्वपूर्ण ठरणार आहेत. जिल्ह्यातील लक्षवेधी लढत म्हणून दोन मंत्र्यांविरोधात भाजपच्या उमेदवारांच्या लढाईकडे लक्ष लागले आहे. रत्नागिरीत उदय सामंत शिवसेनेची उमेदवारी घेऊन, तर भास्कर जाधव पारंपरिक प्रतिस्पर्धी विनय नातू यांच्याशी दोन हात करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी वगळता विधानसभेसाठी अद्याप एकही मोठा नेता प्रचाराला आलेला नाही.भाजपने वेगळे लढण्याची भूमिका घेतल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बाळ मानेंसाठी रत्नागिरीत आले. मात्र, चुरशीच्या गुहागरकडे त्यांनी पाठ फिरवली. दुसरीकडे राष्ट्रवादीचे चिपळूणचे उमेदवार शेखर निकम यांच्यासाठी एखादी प्रचारसभा होण्याची शक्यता असली तरी खराब हवामानाचे कारण देत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा दौरा पुढे ढकलला जात असल्याने पक्षासाठी ही बाब प्रतिष्ठेची करण्यात येत आहे. सद्यस्थितीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा दौरावगळता राष्ट्रवादीचे मिशन स्वत: निकम, माजी आमदार रमेश कदम व तालुकापातळीवरील नेते सांभाळत आहेत. मात्र, शिवसेना, भाजपच्या लढाईत निकम यांनी आपला तळ देवरूखपासून चिपळूणपर्यंत सुरक्षित ठेवण्यासाठी शिक्षकांचा अधिकाधिक उपयोग केल्याचे पाहायला मिळते.सन १९८० पासून चिपळूण मतदारसंघात काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी असा प्रवास सुरू राहिला. चिपळूणला राजाराम शिंदे, निशिकांत जोशी, सूर्यकांत खेडेकर, भास्कर जाधव, रमेश कदम व सदानंद चव्हाण यांनी प्रतिनिधित्व केले. या मतदारसंघात यंदा कडवी लढत होत असून, तरूण कार्यकर्ते, युवती संघटना, विविध संस्थांमधील पदाधिकारी, माजी मुख्याध्यापक, क्रीडा संघटना प्रचारात उतरल्या आहेत. महिलांनी प्रथमच मतदारसंघ पिंजून काढला आहे. नव्या मतदारसंघात सहभागी झाल्यानंतर देवरूख, संगमेश्वर, कसबा या भागात शिवसेनेला निकम यांना तोंड द्यावे लागत असून, काँग्रेसची भूमिकाही निर्णायक ठरणार आहे.जिल्ह्यात राष्ट्रवादीकडे हुकमी निवडून येईल अशी जागा सध्या दिसत नाही. मात्र, गुहागरकडे राज्याचे लक्ष आहे. भास्कर जाधव, शेखर निकम हे घासून असलेल्या मतदारसंघातील दोन उमेदवार एकमेकांच्या मतसंख्येवर स्वत:चा निर्णय ठरवणार आहेत. चिपळूण मतदारसंघातील ८० वाड्यांवर भास्कर जाधव यांचे, तर त्या मतदारांचा प्रभाव असलेल्या चिपळूणमध्ये निकम यांचे भवितव्य ठरणार आहे. त्यामुळेच या लढती महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. (प्रतिनिधी)यापूर्वी रमेश कदम व भास्कर जाधव यांच्यातील सरळ लढतीत शरद पवार खराब हवामानाचे कारण देत पाटण येथून माघारी फिरले होते. त्या निवडणुकीत कदम पराभूत झाले, तर शिवसेनेचे भास्कर जाधव विजयी झाले होते. यावेळी पवार यांच्या परिवारातले शेखर निकम चिपळूणमध्ये असून, पवार यांची सभा चिपळूणमध्ये होईल, या आशेवर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असताना वेधशाळेने खराब हवामानाचा अंदाज व्यक्त केल्याने पवार दौरा करणार काय, असा प्रश्न केला जात आहे.चिपळूण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने रश्मी कदम यांना उमेदवारी दिली असली तरी या पक्षात सारे शांत असल्याने कदम यांची उमेदवारी नेमकी कोणाच्या फायद्याची ठरणार, यावरही नजरा आहेत. देवरूख पट्ट्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची भूमिका निकम यांच्यासाठी जमेची बाजू असल्याचे बोलले जात आहे. चिपळूण विधानसभा मतदारसंघात देवरूख-संगमेश्वर पट्ट्यातील निष्ठावान काँग्रेस कार्यकर्त्यांची व मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याने या जागेकडे लक्ष आहे.