शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

संस्कृत घेतलेल्या विद्यार्थिनीच्या गळ्यात बोर्डाने मारले हिंदी

By admin | Updated: June 9, 2016 03:49 IST

नवी मुंबईतील सेंट अगस्टीन शाळेची विद्यार्थिनी अनुजा कैलास अरगडे हिला चक्क एका विषयात अनुपस्थित दाखवून अनुत्तीर्ण करण्यात आले

जितेंद्र कालेकर,

ठाणे- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या गलथान कारभारामुळे नवी मुंबईतील सेंट अगस्टीन शाळेची विद्यार्थिनी अनुजा कैलास अरगडे हिला चक्क एका विषयात अनुपस्थित दाखवून अनुत्तीर्ण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या विद्यार्थिनीने संस्कृत विषय घेतला असतानाही ती हिंदी विषयाची विद्यार्थिनी असल्याचे दाखवून ती परीक्षेला अनुपस्थित राहिल्याने अनुत्तीर्ण झाल्याचा जावईशोध बोर्डाने लावला आहे.अनुजाने आॅनलाइन एसएससीचा निकाल पाहिल्यावर तिला धक्काच बसला. दरवर्षी ९० टक्के गुण मिळवणाऱ्या अनुजाला एसएससीमध्ये एका विषयात अनुपस्थित दाखवून अनुत्तीर्ण करण्यात आले होते. तिला इंग्रजीमध्ये ७५, मराठी ८१, हिंदी- गैरहजर, गणित ९०, सामान्य तंत्रज्ञान ९१ आणि समाजशास्त्र ८६ असे गुण आहेत. मुळात तिने हिंदी विषय घेतलाच नव्हता. ती संपूर्ण १०० गुणांच्या संस्कृत विषयाची विद्यार्थिनी असल्याने तिने त्या विषयाची परीक्षा दिली होती. बोर्डाच्या कार्यालयात चकरा मारल्या असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे अनुजा हताश झाली होती.अखेरीस, प्रस्तुत प्रतिनिधीच्या मदतीने अरगडे कुटुंबीयांनी बुधवारी मंडळाचे सचिव जगताप यांची भेट घेतली असता त्यांच्या लक्षात या प्रकरणाचे गांभीर्य आले. या चुकीमागचे कारण शोधून लवकरच संस्कृत विषयाचे गुणही निकालपत्रात अनुजाला मिळतील, असे त्यांनी आश्वस्त केले.परीक्षेपूर्वीच अनुजाच्या परीक्षा प्रवेशपत्रावर (रिसीट) विषयांच्या सूचीत संस्कृतऐवजी हिंदी हा विषय दाखवण्यात आला होता. शिक्षण मंडळाची ही चूक दुरुस्त करण्यासाठी सेंट अगस्टीन शाळेने १६ फेब्रुवारी २०१६ रोजीच तातडीने पत्रव्यवहार केला होता. परीक्षेपूर्वी स्वत:ची चूक दुरुस्त करण्याऐवजी रिसीटवर दाखवल्याप्रमाणे तिच्या गुणपत्रिकेतही हिंदी विषयाचाच उल्लेख करून तिला अनुत्तीर्ण करण्याची महाचूक बोर्डाने केली. ‘‘अनुजाला आतापर्यंत ९० टक्के गुण मिळालेले आहेत. एसएससी परीक्षेत इतर विषयांतही तिला चांगले गुण मिळाले असल्याने हा निकाल आमच्यासाठी धक्कादायक आहे. मंडळाकडून आधी उडवाउडवीची उत्तरे मिळाली. पण, आता सचिवांकडून दुरुस्तीचे आश्वासन मिळाले आहे. प्रवेशासाठी असलेली स्पर्धा आणि निर्धारित वेळ याचे महत्त्व ओळखून मंडळाने ही दुरुस्ती तातडीने करावी, एवढीच अपेक्षा आहे.’’- भारती कैलास अरगडे, अनुजाची आई, नेरळ