शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

बोर्डीत पर्यटकांची कार खोल समुद्रात अडकली

By admin | Updated: March 21, 2017 03:32 IST

दहिसरहून बोर्डी समुद्रकिनारी आलेल्या पर्यटकांनी अतिउत्साहाच्या भरात कार खोल समुद्रात घुसवली.

अनिरुद्ध पाटील / बोर्डीदहिसरहून बोर्डी समुद्रकिनारी आलेल्या पर्यटकांनी अतिउत्साहाच्या भरात कार खोल समुद्रात घुसवली. ती वाळूत अडकून भरतीच्या पाण्याखाली गेली. पर्यटक प्रसंगावधान राखून बाहेर पडल्यामुळे जीवितहानी टळली. परंतु, भरतीमुळे गाडी दिवसभर पाण्यात बुडालेल्या स्थितीत होती. दुसऱ्या दिवशी ओहोटी लागल्यावर पोलीस व स्थानिकांच्या मदतीने कार जेसीबीच्या मदतीने बाहेर काढली. अरविंद खर्डेश्वर यांच्यासोबत एक पुरु ष, दोन महिला आणि लहान मुलगा अशा पाच व्यक्ती रविवारी कारने बोर्डीला आल्या होत्या. दुपारी नॅशनल शाळेसमोरील समुद्रकिनारा, चौपाटी त्यांनी पाहिली. त्यानंतर त्यांनी कार थेट समुद्राच्या पाण्यात घातली. ती वेळ नेमकी भरतीची होती. मात्र त्यांना ते माहीत नव्हते. भरतीच्या वेळी रेती किनाऱ्यावर लोटली जाते. खाली अत्यंत चिकणमातीच्या चिखलाचा थर जमतो. त्यात ही कार फसली आणि बंद पडली. झपाट्याने वाढणारे भरतीचे पाणी कारमध्ये शिरू लागल्याचे पाहताच आतील सर्व बाहेर आले. किनाऱ्यावरील मंडळींचे सहकार्य मिळेपर्यंत कार मात्र भरतीच्या पाण्यात बुडाली होती.पोलिसांनी झाई आणि बोर्डी येथील स्थानिकांच्या मदतीने कार बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र चिखलात ती खोलवर रुतल्याने आणि भरती आल्याने सायंकाळी ५च्या सुमारास हे प्रयत्न थांबविण्यात आले. सोमवारी सकाळी ८ वाजता कार बाहेर काढली. परगावातील पर्यटक किनाऱ्यावर अतिवेगाने वाहन चालवणे, मद्यप्राशन करून पाण्यात पोहणे यामुळे विनाकारण स्वत:चा जीव धोक्यात घालतात. शिवाय असुरक्षित वातावरण निर्माण करतात. अशा वाहनांवर व पर्यटकांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली असून, पर्यटन विकेंड उत्सव काळ आणि पर्यटन हंगाम या काळात जीवरक्षकाची नेमणूक करण्याचीही मागणी केली होती. त्यानंतर डहाणूतील घोलवड आणि बोर्डी या किनारी टेहळणी टॉवर उभारण्यात आले आहेत. मात्र, तेथे जीवरक्षक नाहीत. किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांच्या सरुक्षिततेविषयी मुंबई उच्च न्यायालयाने निर्देश दिले असले तरी त्याचे पालन मात्र होत नाही.