शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

बोर्डीत पर्यटकांची कार खोल समुद्रात अडकली

By admin | Updated: March 21, 2017 03:32 IST

दहिसरहून बोर्डी समुद्रकिनारी आलेल्या पर्यटकांनी अतिउत्साहाच्या भरात कार खोल समुद्रात घुसवली.

अनिरुद्ध पाटील / बोर्डीदहिसरहून बोर्डी समुद्रकिनारी आलेल्या पर्यटकांनी अतिउत्साहाच्या भरात कार खोल समुद्रात घुसवली. ती वाळूत अडकून भरतीच्या पाण्याखाली गेली. पर्यटक प्रसंगावधान राखून बाहेर पडल्यामुळे जीवितहानी टळली. परंतु, भरतीमुळे गाडी दिवसभर पाण्यात बुडालेल्या स्थितीत होती. दुसऱ्या दिवशी ओहोटी लागल्यावर पोलीस व स्थानिकांच्या मदतीने कार जेसीबीच्या मदतीने बाहेर काढली. अरविंद खर्डेश्वर यांच्यासोबत एक पुरु ष, दोन महिला आणि लहान मुलगा अशा पाच व्यक्ती रविवारी कारने बोर्डीला आल्या होत्या. दुपारी नॅशनल शाळेसमोरील समुद्रकिनारा, चौपाटी त्यांनी पाहिली. त्यानंतर त्यांनी कार थेट समुद्राच्या पाण्यात घातली. ती वेळ नेमकी भरतीची होती. मात्र त्यांना ते माहीत नव्हते. भरतीच्या वेळी रेती किनाऱ्यावर लोटली जाते. खाली अत्यंत चिकणमातीच्या चिखलाचा थर जमतो. त्यात ही कार फसली आणि बंद पडली. झपाट्याने वाढणारे भरतीचे पाणी कारमध्ये शिरू लागल्याचे पाहताच आतील सर्व बाहेर आले. किनाऱ्यावरील मंडळींचे सहकार्य मिळेपर्यंत कार मात्र भरतीच्या पाण्यात बुडाली होती.पोलिसांनी झाई आणि बोर्डी येथील स्थानिकांच्या मदतीने कार बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र चिखलात ती खोलवर रुतल्याने आणि भरती आल्याने सायंकाळी ५च्या सुमारास हे प्रयत्न थांबविण्यात आले. सोमवारी सकाळी ८ वाजता कार बाहेर काढली. परगावातील पर्यटक किनाऱ्यावर अतिवेगाने वाहन चालवणे, मद्यप्राशन करून पाण्यात पोहणे यामुळे विनाकारण स्वत:चा जीव धोक्यात घालतात. शिवाय असुरक्षित वातावरण निर्माण करतात. अशा वाहनांवर व पर्यटकांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली असून, पर्यटन विकेंड उत्सव काळ आणि पर्यटन हंगाम या काळात जीवरक्षकाची नेमणूक करण्याचीही मागणी केली होती. त्यानंतर डहाणूतील घोलवड आणि बोर्डी या किनारी टेहळणी टॉवर उभारण्यात आले आहेत. मात्र, तेथे जीवरक्षक नाहीत. किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांच्या सरुक्षिततेविषयी मुंबई उच्च न्यायालयाने निर्देश दिले असले तरी त्याचे पालन मात्र होत नाही.