शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

सीमावासीयांना दिलासा मिळेल

By admin | Updated: December 10, 2014 00:31 IST

एन. डी. पाटील : बेळगावात एकीकरण समितीचा महामेळावा; मराठी भाषिक लढा सुरूच ठेवतील

बेळगाव : कर्नाटक सरकारने बेळगाव शहरात चालविलेली हुकूमशाही व पक्षपाती धोरण याविरोधात सीमाभागातील मराठी भाषिक बेळगावसह अखंड महाराष्ट्रचा लढा सुरूच ठेवतील. सीमाभागातील मराठी माणसांनी हताश होऊ नये, सर्वोच्च न्यायालयात आपल्याला दिलासा मिळेल, असा विश्वास ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी आज व्यक्त केला.बेळगाव येथील टिळकवाडी भागातील वक्सिन डेपो मैदानात महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाविरोधात आयोजित केलेल्या महामेळाव्याचे उद्घाटन प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मध्यवर्ती एकीकरण समितीचे अध्यक्ष वसंतराव पाटील, अ‍ॅड. राम आपटे, दीपक दळवी, मालोजी अष्टेकर, मनोहर किणेकर, आमदार संभाजी पाटील, आमदार अरविंद पाटील, निंगोजी हुद्दार उपस्थित होते. प्रा. पाटील म्हणाले, बेळगावातील मराठी माणसाचा स्वाभिमान डिवचण्यासाठी कर्नाटक सरकार बेळगावात विधीमंडळ अधिवेशन भरवत आहे. बेळगावचे नामांतर करीत आहे. याशिवाय मास्टर प्लॅन आखून गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावत आहे. गेल्या ६० वर्षांपासून लोकशाही मार्गाने चाललेला हा लढा असून, न्याय मिळेपर्यंत तो सुरूच राहील. सर्वोच्च न्यायालयातील प्रत्यक्ष सुनावणी काही दिवसांत सुरू होईल. यामध्ये सीमावासीयांना न्याय मिळेल.जिल्हा प्रशासनाने जाचक अटी घालून या मेळाव्यास परवानगी दिली होती. तरीही सीमाभागातील हजारो मराठी भाषिक मेळाव्यास उपस्थित होते. ‘बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, आदी घोषणांनी टिळकवाडी परिसर दणाणून गेला होता. (प्रतिनिधी)महाराष्ट्रातील नेत्यांनी फिरवली पाठ महाराष्ट्र एकीकरण समितीच्या या महामेळाव्याकडे अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्रातील नेत्यांनी पाठ फिरवली. प्रा. एन. डी. पाटील, माजी आमदार नरसिंगराव पाटील आणि भरमू सुबराव पाटील वगळता महाराष्ट्रातील एकही मोठा नेता महामेळाव्यास आला नसल्याने सीमाभागाला पुन्हा एकदा महाराष्ट्रातील नेत्यांनी पोरका केल्याची भावना सीमावासीयांत निर्माण झाली आहे.कर्नाटक सरकारच्या कारवाईच्या भीतीने बेळगावच्या महापालिकेत सीमाप्रश्नाचा ठराव न मांडणारे, तसेच काळ्या दिनाच्या सायकल फेरीत सहभागी न झालेले महापौर, उपमहापौर आणि नगरसेवक या मेळाव्यास उपस्थित होते. त्यांच्या हजेरीमुळे मराठी भाषिक सुखावले; मात्र त्यांनी मौन बाळगल्यामुळे संतप्त झालेल्या लोकांनी जोरदार घोषणाबाजी करून त्यांचा निषेध व्यक्त केला. चंदगडचे माजी आमदार नरसिंगराव पाटील यांनी आपल्या भाषणात मराठी नगरसेवकांनी सीमाप्रश्नाचा ठराव मांडावा, अशी मागणी केली.