शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

मोहनेतील तमीळ शाळेला ३५ वर्षानी मिळाली पुस्तके

By admin | Updated: August 3, 2016 03:11 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या तमीळ माध्यमाच्या डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शाळेतील विद्यार्थी यंदा प्रचंड खूष आहेत

जान्हवी मोर्ये,

कल्याण- कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या तमीळ माध्यमाच्या डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शाळेतील विद्यार्थी यंदा प्रचंड खूष आहेत कारण तब्बल ३५ वर्षांनंतर त्यांच्या हातात कोरी पुस्तके पडली आहेत. १९८० सालापासून मोहने परिसरात सुरु झालेल्या या शाळेतील विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्यांनी मुंबई महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या पुस्तकांच्या झेरॉक्स काढून धडे गिरवले.मोहने परिसरातील एनआरसी कंपनी आर्थिक डबघाईला आल्याचे कारण पुढे करीत व्यवस्थापनाने कंपनीला नोव्हेंबर २००९ टाळे ठोकले. या कंपनीत पोटापाण्यानिमित्त आलेल्या परप्रांतीय कामगारांची वस्ती मोहने स्टेशन परिसरात तिपन्नानगर म्हणून वसली. या वस्तीतील तमीळ भाषिक मुलांसाठी महापालिकेने १९८० साली शाळा सुरु केली. आज या शाळेत इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात ११९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेतील गैरहजेरीचे प्रमाण कमी आहे. या विद्यार्थ्यासाठी तमीळ भाषेतून एक-दोन वर्षे नव्हे तर तब्बल ३५ वर्षे पुस्तके उपलब्ध होत नव्हती. मात्र मुलांची शिकण्याची आणि शिक्षकांची शिकविण्याची जिद्द मोठी होती. शिक्षक मुंबई महापालिकेतून तमिळ माध्यमाच्या पुस्तकांच्या झेरॉक्स प्रती काढून विद्यार्थ्याना धडे देत होते. यंदाच्या वर्षी शिक्षण मंडळाने प्रथमच या विद्यार्थ्यांना कोरी पुस्तके उपलब्ध करुन दिली आहे, अशी माहिती शिक्षण खात्यातील सहाय्यक अधिकारी अर्चना जाधव यांनी दिली. पुस्तके उपलब्ध करुन दिल्याचे आम्हाला समाधान आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका राणी महेंद्रन यांनी सांगितले की, आम्हाला पुस्तके प्राप्त झाली याचा खूप आनंद झाला आहे. झेरॉक्स प्रतींवर शिकवताना त्या जपून ठेवण्याची काळजी घ्यावी लागत होती. विद्यार्थ्याना पुस्तके मिळत नसल्याने त्यांना घरी जाऊन गृहपाठ करता येत नव्हता. त्यांची सगळी मदार झेरॉक्स कॉपीवर होती. त्यामुळे दोन-तीन वर्षापासून मुंबई महापालिकेकडून पुस्तकांची एक प्रत घेऊन त्यावर विद्यार्थी अभ्यास करीत होते.कोऱ्या पुस्तकांचा वास घेताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारा आनंद आम्हा शिक्षकांनाही सुखावून गेला आहे.।विद्यार्थ्यांना झाले पुस्तक वाटपस्थानिक नगरसेविका नमिता पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यात आली. पहिली, दुसरी, तिसरी,चौथी आणि सातवीची सर्व पुस्तके उपलब्ध झाली आहेत. परंतु पाचवी, सहावी आणि आठवीची काही पुस्तके येणं बाकी आहे. या पुस्तकांच्या छपाईचे काम अजून सुरू आहे. ते पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना देण्यात येतील.।मुंबई महापालिकेने दिली पुस्तके कल्याण-डोंबिवली महापालिकेचे प्रभारी शिक्षण अधिकारी जे. जे. तडवी यांनी सांगितले की, पुस्तकांची छपाई ‘बालभारती’कडून केली जाते. मात्र मुंबई महापालिकेने केलेल्या सहकार्यामुळे या विद्यार्थ्यांना पुस्तके देणे शक्य झाले आहे. मुंबई महापालिकेला शुल्क देऊन पुस्तकांची छपाई करून घेतली आहे.