शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

बडी बेचैन रहती हैं किताबें...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2016 00:52 IST

‘किताबे झाकती है, बंद अलमारी की शिशोंसे, भरी हसरत से ताकती है, महिनों अब मुलाकाते नही होती’,

- मंगेश पांडे/प्रज्ञा केळकर-सिंग ल्ल ज्ञानोबा-तुकारामनगरी (पिंपरी) : ‘किताबे झाकती है, बंद अलमारी की शिशोंसे, भरी हसरत से ताकती है,महिनों अब मुलाकाते नही होती’, ‘बडी बेचैन रहती है किताबे,इन्हे अब नींद मे चलने की आदत हो गई है’, अशी ‘नज्म’ पेश करीत ज्येष्ठ साहित्यिक आणि गीतकार गुलजार यांनी रसिकांची सायंकाळ ‘कवितामय’ केली. पिंपरी चिंचवड येथील ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विविध नज्मे अदाकारीने पेश कर गुलजार यांनी मंत्रमुग्ध केले. अंबरीश मिश्र यांनी गुलजार यांना बोलते केले आणि या गप्पांमधून त्यांचा प्रवास उलगडला. गुलजार यांनी गप्पांच्या ओघात कवी आणि कविता यांच्यातील नात्याविषयी भूमिका मांडली. कवितेचा जन्म अनाहूत असतो, ती मनातील भावनांचे मूर्त स्वरुप असते, असे सांगत गुलजार म्हणाले, विस्तवावर ठेवलेल्या पातेल्यात उकळणारे पाणी वाफेच्या रुपात बाहेर पडते आणि पातेल्यावरील झाकण तडतडते. कवीमनाची स्थितीही अशीच असते. मनातील भावना कवितेच्या रुपात वाफा बनून बाहेर पडतात. या भावना व्यक्त होत नाहीत तोवर मनाला स्वस्थता मिळत नाही, असे सुरेख वर्णन त्यांनी केले.तंत्रज्ञानाच्या जमान्यात आजकाल कविताही एका क्लिकवर जन्म घेतात. पूर्वी पुस्तकांना अंगाखांद्यावर खेळवले जायचे., पुस्तकांतील चिठ्ठी, कोमजलेली फुले अनेक आठवणी जागवायची. पुस्तके उचलण्याच्या बहाण्याने नात्यांचे नाजूक बंध गुंफले जायचे. ‘अब वो जमाना नही रहा’ अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. इतक्या वर्षाच्या प्रवासात आजही आपण पूर्ण कवी झाल्याचे वाटत नसल्याचे त्यांनी प्रांजळपणे नमूद करत सर्वांची मने जिंकली. कुसुमाग्रज, कवी ग्रेस यांच्या अनुवादित केलेल्या काही कविताही त्यांनी पेश केल्या. अनुवाद तंतोतंत असेल तर तो सुंदर नसतो आणि सुंदर असेल तर तो तंतोतंत नसतो, असे सुरेख गणित त्यांनी यावेळी उलगडले.सिनेमांसाठी गीत करताना कवींना स्वातंत्र्य मिळते का असे विचारले असता गुलजार म्हणाले, ‘सिनेमांसाठी गीत नव्हे तर गाणी रचली जातात. सिनेमांसाठी गाणी लिहिणे कठीण असते. गाणी तयार करताना कथा, पटकथा, पात्राच्या भावना, त्याचा दृष्टकोन लक्षात घेऊन गाणे लिहावे लागते. मात्र, कवीला कविता लिहिताना पूर्ण स्वातंत्र्य असते. ‘चलो ना दरिया में काटा डाले, नझ्म पकडे‘ असे म्हणत मनातील भावना वेळच्या वेळी कागदावर उतरल्या नाहीत, त्यांनी रसिकांशी संवाद साधला नाही तर त्या कविता ‘अपूर्ण’ राहतात. कवितेला लोकप्रियतेचा कोणताही मापदंड नसतो, असा विचार त्यांनी मांडला.सिनेमा आणि साहित्यातमध्ये काळाच्या ओघात झालेला बदल विचारला असता, त्यांनी या प्रश्नाला बगल देत भावना व्यक्त करण्यावर भर दिला. प्रत्येक नझ्मने या गप्पा उत्तरोत्तर रंगत गेल्या.देशपातळीवर सर्व भाषांचे एक संमेलन हवे- देशामध्ये विविध भाषा आहेत. मात्र, मराठीसारखे साहित्य संमेलन अन्य भाषांमध्ये होत नाही, असे गौरवोद्गार उद्घाटन समारंभात कवी गुलजार यांनी काढले. देशपातळीवर सर्व भाषांचे लेखक एकत्र येतील, असे संमेलन व्हावे, अशी आपली इच्छा आहे. मात्र, तसे संमेलन अद्याप साकारलेले नाही. बनारसला तसेच पाटण्यातही असा प्रयत्न झाला होता. मात्र, त्याला यश आले नाही. महाराष्ट्र यात पुढाकार घेऊ शकतो, असा विश्वास आपणाला वाटतो.- विं. दा. करंदीकर, कुसुमाग्रज यांचे मराठी साहित्य मी स्वत: उर्दूत नेले आहे. आजच्या समकालीन शायरांनाएकत्र कसे आणता येईल, याचाही विचार होणे आवश्यक आहे.वाचनासाठी चोरली पुस्तके...- वाचनाची गरज भागविण्यासाठी आपण लहानपणी अनेकदा वाचनालयातून तसेच, भावाची पुस्तके चोरली. पुस्तकांवर लेखक, कवींचे जे नाव असायचे, त्याबद्दल आपणाला विशेष क्रेझ होती, अशी आठवणही गुलजार यांनी सांगितली.