शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

‘राज्यातील २९ प्रकल्पांत पुस्तकगाडी’

By admin | Updated: February 24, 2015 04:22 IST

आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांत उत्तम शिक्षण देण्यासाठी पुस्तकगाडी हे चांगले माध्यम बनेल. आश्रमशाळांचा दर्जा सुधारण्यात मदत होईल

वाडा : आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांत उत्तम शिक्षण देण्यासाठी पुस्तकगाडी हे चांगले माध्यम बनेल. आश्रमशाळांचा दर्जा सुधारण्यात मदत होईल, असा विश्वास आदिवासी विकास मंत्री व पालघरचे पालकमंत्री विष्णू सवरा यांनी व्यक्त केला. वाड्यातील सोनळेत पुस्तकगाडी उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. आदिवासी विकास विभाग व क्वेस्ट संस्था २९ प्रकल्पांमध्ये ही योजना राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले.वयोगटांनुसार वाचन क्षमता विकसित करण्यासाठी विविध कृती कार्यक्रम केले जाणार आहेत. सौरऊर्जेद्वारे विद्यार्थ्यांना बालचित्रपट दाखविले जातील. विद्यार्थ्यांना व साहित्यिकदृष्ट्या समृद्ध करण्यात हा प्रकल्प यशस्वी होईल, असे संस्थेचे अध्यक्ष सिनेअभिनेते अतुल कुलकर्णी यांनी सांगितले. हा उद्घाटनाचा कार्यक्रम अत्यंत साधेपणात पार पडला. या वेळी आमदार पांडुरंग बरोरा, प्रकल्प अधिकारी ए़ एस़ गंगर उपस्थित होते़ (वार्ताहर)