शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

पुस्तकाचं भिलार गाव ठरावं प्रकाशनाचं डेस्टिनेशन!

By admin | Updated: May 4, 2017 18:29 IST

‘वाचन संस्कृतीला बळ देण्यासाठी आणि लोकांच्या ज्ञान पिपासू वृत्तीला खतपाणी घालण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने देशातलं पहिलं पुस्तकांचं गाव आपण महाबळेश्वर

आॅनलाइन लोकमत 
सातारा, दि.04 -  ‘वाचन संस्कृतीला बळ देण्यासाठी आणि लोकांच्या ज्ञान पिपासू वृत्तीला खतपाणी घालण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने देशातलं पहिलं पुस्तकांचं गाव आपण महाबळेश्वर तालुक्यातील भिलार इथं उभारलंय. या गावाला साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने भेटी देऊन आपली ज्ञानलालसा पूर्ण करतील, आता पुस्तक प्रकाशकांची मोठी जबाबदारी आहे. लोक जयपूर हे ठिकाण लग्नाचे डेस्टिनेशन म्हणून निवडतात. त्याच पद्धतीने भिलार हे गाव ‘पुस्तक प्रकाशनाचे’ डेस्टिनेशन होईल,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिलार येथे व्यक्त केला.
भिलार गावामध्ये ‘पुस्तकांचं गाव’ या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘ज्ञान मिळविण्याची इच्छा जोपर्यंत संपत नाही. तोपर्यंत पुस्तकाचं अस्तित्व संपणार नाही. अलीकडे माध्यमं मोठ्या संख्येने वाढली असली तरी वेगवेगळ्या प्रकारे ज्ञान मिळविण्यासाठी लोक आसूसलेले आहेत. पुस्तकांमुळे विकासाच्या कक्षा रुंदावतात. वारकरी सांप्रदायामुळे महाराष्ट्रातील जनतेला ईश्वर व निसर्गाची नातं जोडता आलं. संतांनी जी परंपरा निर्माण केली. तिच पुढे साहित्यिकांनीही जोपासली आहे. भिलार या पुस्तकाच्या गावी साहित्यप्रेमींना कथा, कादंब-या, बालसाहित्य असे विविध प्रकारचं साहित्य वाचायला मिळणार आहे. याचा निखळ आनंद वाचकप्रेमींनी घ्यावा,’ असे आवाहनही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.