शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

एक कोटीची झाली ग्रंथविक्री

By admin | Updated: February 27, 2017 03:34 IST

शहरात झालेल्या ९० व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात केवळ एक कोटी रुपयांची ग्रंथविक्री झाली आहे.

जान्हवी मोर्ये,डोंबिवली- शहरात झालेल्या ९० व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात केवळ एक कोटी रुपयांची ग्रंथविक्री झाली आहे. मागील संमेलनाच्या तुलनेत ही विक्री २० टक्केच आहे. त्यामुळे मराठी भाषेच्या संवर्धनाकरता आर्थिक मदतीसाठी मराठी साहित्य महामंडळाने केलेल्या आवाहनाला मराठी साहित्य प्रकाशक व विक्रेत्यांनी प्रतिसाद दिलेला नाही. हे स्पष्ट झाले आहे.डोंबिवली सांस्कृतिक नगरी असल्याने येथे होणाऱ्या साहित्य संमेलनात विक्रमी ग्रंथविक्री होईल, अशी अपेक्षा होती. संमेलनाच्या पु. भा. भावे साहित्य नगरीत उभारलेल्या रा. चि. ढेरे ग्रंथग्राममध्ये ३५६ ग्रंथ प्रकाशक व विक्रेते सहभागी झाले होते. ग्रंथविक्री चांगली व्हावी, यासाठी ग्रंथ दालनाचे उद्घाटन संमेलनाच्या पहिल्याच दिवशी ३ फेब्रुवारीला सकाळी ९.३० वाजताच करण्यात आले. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी ग्रंथविक्रेते, प्रकाशक यांनी काही अंशी आर्थिक मदत करावी, असे आवाहन साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी केले होते. परंतु, एकाही प्रकाशक व विक्रेत्यांनी मराठी भाषा साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी सतपात्री दान देण्याचे सौजन्य दाखवलेले नाही. याबाबत डॉ. जोशी यांना विचारले असता, ते म्हणाले की, ‘आपण आवाहन करीत राहणे हेच आमच्या हाती आहे. त्याला प्रतिसाद किती व कसा मिळेल, हे आपण सांगू शकत नाही.’ मराठी प्रकाशक परिषदेचे कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी यांनी सांगितले की, ग्रंथदालनात एक कोटी रुपये ग्रंथविक्री झाली. त्यात प्रकाशक कमी आणि विक्रेते जास्त होते. पिंपरी-चिंचवडला पाच कोटी रुपये ग्रंथ विक्री झाली होती. त्या तुलनेत डोंबिवलीतील साहित्य संमेलनात केवळ २० टक्केच ग्रंथ विक्री झाली. संमेलन लोकांपर्यंत पोहोचविण्यात आयोजक अपयशी ठरले. त्यामुळे ग्रंथविक्री झाली नाही. ग्रंथविक्रीच कमी झाल्याने मदत कशी करणार, असा सवाल आमच्या पुढे आहे. पिंपरी-चिंचवडला ग्रामीण भागातील वाचकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. याउलट डोंबिवलीतील शहरी वाचकांपैकी केवळ तरुण वाचकच पुस्तक खरेदीकडे वळला, हे या संमेलनात समाधानकारक चित्र होते.दरम्यान, कमी निधी जमा झाल्याने खर्चात काटकसर करण्यात आली. साहित्यिकांना मानधन परत करण्याचे आवाहन केले होते. साहित्य संमेलनात कवी, सूत्रसंचालक, साहित्यिक, मुलाखतकार, मुलाखत देणारे मान्यवर, असे जवळपास २११ जण सहभागी झाले होते. समन्वय, सूत्रसंचालक व अध्यक्षांना अडीच हजार मानधन व तीन वेळाचा प्रवास खर्च देण्यात आला. तर वक्ता, कवी मंडळींना दोन हजार मानधन व तीन वेळाचा प्रवास खर्च दिला गेला. २११ जणांपैकी केवळ किरण येले यांनीच मानधन परत केले आहे. ज्याचा लेखन हाच प्रपंच आहे, त्यावरच त्याचा उदरनिर्वाह आहे. त्यांच्याकडून मानधन परतीची अपेक्षा ठेवणे चुकीचे ठरले. मात्र ज्यांचा लेखन प्रपंच ही त्यांची ओळख आहे, त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधनही अन्य आहे.>कविता, साहित्यवाचनसाहित्य संमेलनानंतर आगरी यूथ फोरमतर्फे २७ फेबु्रवारीला मराठी भाषा दिन साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने कविवर्य कुसुमाग्रजांच्या कविता आणि साहित्यावर आधारित एक तासाचा कार्यक्रम होईल. हा कार्यक्रम अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कार्यालय, जगन्नाथ कॉमर्स प्लाझा, पहिला मजला, मानपाडा रोड, डोंबिवली (पूर्व) येथे सायंकाळी ६.३० वाजता होईल. खर्चाची तारीख लांबली साहित्य संमेलनाचा खर्च दीड महिन्याच्या आत महामंडळास सादर करावा लागतो. संमेलनाचा खर्च ५ मार्चपर्यंत महामंडळास सादर करण्याचे ठरले होते. मात्र महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे संमेलनाचा खर्च सादर करण्याची तारीख लांबली. आता १९ मार्चला तो सादर केला जाणार आहे, असे आयोजक आगरी यूथ फोरमकडून सांगण्यात आले.