शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

एक कोटीची झाली ग्रंथविक्री

By admin | Updated: February 27, 2017 03:34 IST

शहरात झालेल्या ९० व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात केवळ एक कोटी रुपयांची ग्रंथविक्री झाली आहे.

जान्हवी मोर्ये,डोंबिवली- शहरात झालेल्या ९० व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात केवळ एक कोटी रुपयांची ग्रंथविक्री झाली आहे. मागील संमेलनाच्या तुलनेत ही विक्री २० टक्केच आहे. त्यामुळे मराठी भाषेच्या संवर्धनाकरता आर्थिक मदतीसाठी मराठी साहित्य महामंडळाने केलेल्या आवाहनाला मराठी साहित्य प्रकाशक व विक्रेत्यांनी प्रतिसाद दिलेला नाही. हे स्पष्ट झाले आहे.डोंबिवली सांस्कृतिक नगरी असल्याने येथे होणाऱ्या साहित्य संमेलनात विक्रमी ग्रंथविक्री होईल, अशी अपेक्षा होती. संमेलनाच्या पु. भा. भावे साहित्य नगरीत उभारलेल्या रा. चि. ढेरे ग्रंथग्राममध्ये ३५६ ग्रंथ प्रकाशक व विक्रेते सहभागी झाले होते. ग्रंथविक्री चांगली व्हावी, यासाठी ग्रंथ दालनाचे उद्घाटन संमेलनाच्या पहिल्याच दिवशी ३ फेब्रुवारीला सकाळी ९.३० वाजताच करण्यात आले. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी ग्रंथविक्रेते, प्रकाशक यांनी काही अंशी आर्थिक मदत करावी, असे आवाहन साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी केले होते. परंतु, एकाही प्रकाशक व विक्रेत्यांनी मराठी भाषा साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी सतपात्री दान देण्याचे सौजन्य दाखवलेले नाही. याबाबत डॉ. जोशी यांना विचारले असता, ते म्हणाले की, ‘आपण आवाहन करीत राहणे हेच आमच्या हाती आहे. त्याला प्रतिसाद किती व कसा मिळेल, हे आपण सांगू शकत नाही.’ मराठी प्रकाशक परिषदेचे कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी यांनी सांगितले की, ग्रंथदालनात एक कोटी रुपये ग्रंथविक्री झाली. त्यात प्रकाशक कमी आणि विक्रेते जास्त होते. पिंपरी-चिंचवडला पाच कोटी रुपये ग्रंथ विक्री झाली होती. त्या तुलनेत डोंबिवलीतील साहित्य संमेलनात केवळ २० टक्केच ग्रंथ विक्री झाली. संमेलन लोकांपर्यंत पोहोचविण्यात आयोजक अपयशी ठरले. त्यामुळे ग्रंथविक्री झाली नाही. ग्रंथविक्रीच कमी झाल्याने मदत कशी करणार, असा सवाल आमच्या पुढे आहे. पिंपरी-चिंचवडला ग्रामीण भागातील वाचकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. याउलट डोंबिवलीतील शहरी वाचकांपैकी केवळ तरुण वाचकच पुस्तक खरेदीकडे वळला, हे या संमेलनात समाधानकारक चित्र होते.दरम्यान, कमी निधी जमा झाल्याने खर्चात काटकसर करण्यात आली. साहित्यिकांना मानधन परत करण्याचे आवाहन केले होते. साहित्य संमेलनात कवी, सूत्रसंचालक, साहित्यिक, मुलाखतकार, मुलाखत देणारे मान्यवर, असे जवळपास २११ जण सहभागी झाले होते. समन्वय, सूत्रसंचालक व अध्यक्षांना अडीच हजार मानधन व तीन वेळाचा प्रवास खर्च देण्यात आला. तर वक्ता, कवी मंडळींना दोन हजार मानधन व तीन वेळाचा प्रवास खर्च दिला गेला. २११ जणांपैकी केवळ किरण येले यांनीच मानधन परत केले आहे. ज्याचा लेखन हाच प्रपंच आहे, त्यावरच त्याचा उदरनिर्वाह आहे. त्यांच्याकडून मानधन परतीची अपेक्षा ठेवणे चुकीचे ठरले. मात्र ज्यांचा लेखन प्रपंच ही त्यांची ओळख आहे, त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधनही अन्य आहे.>कविता, साहित्यवाचनसाहित्य संमेलनानंतर आगरी यूथ फोरमतर्फे २७ फेबु्रवारीला मराठी भाषा दिन साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने कविवर्य कुसुमाग्रजांच्या कविता आणि साहित्यावर आधारित एक तासाचा कार्यक्रम होईल. हा कार्यक्रम अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कार्यालय, जगन्नाथ कॉमर्स प्लाझा, पहिला मजला, मानपाडा रोड, डोंबिवली (पूर्व) येथे सायंकाळी ६.३० वाजता होईल. खर्चाची तारीख लांबली साहित्य संमेलनाचा खर्च दीड महिन्याच्या आत महामंडळास सादर करावा लागतो. संमेलनाचा खर्च ५ मार्चपर्यंत महामंडळास सादर करण्याचे ठरले होते. मात्र महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे संमेलनाचा खर्च सादर करण्याची तारीख लांबली. आता १९ मार्चला तो सादर केला जाणार आहे, असे आयोजक आगरी यूथ फोरमकडून सांगण्यात आले.