शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर बालहत्याकांड: गावित बहिणींच्या फाशीच्या शिक्षेचे जन्मठेपेत रूपांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 09:04 IST

सीमा गावित व रेणुका शिंदे यांच्या फाशीच्या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत

मुंबई : राज्य सरकारने दया याचिकेवरील प्रक्रिया पार पडताना अत्यंत बेपर्वाई केली व हलगर्जी दाखवली. दया याचिकेवरील विलंबाला केवळ राज्य सरकार जबाबरदार आहे व काही अंशी केंद्र सरकारही जबाबदार आहे, अशा कठोर शब्दांत राज्य सरकारवर ताशेरे ओढत उच्च न्यायालयाने १९९६ च्या कोल्हापूर बालहत्याकांड प्रकरणातील आरोपी सीमा गावित व रेणुका शिंदे यांच्या फाशीच्या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत केले.या दोघींनी १३ बालकांचे अपहरण, पाच चिमुकल्यांची हत्या आणि चोरीसाठी काही बालकांचा वापर केल्याबद्दल २००१ मध्ये कोल्हापूर सत्र न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्का ठोठावली, तर २००४ मध्ये मुंबई उच्च न्यायालय व २००६ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले आणि त्यानंतर २०१४ मध्ये राष्ट्रपतींनी त्यांचा दया अर्ज फेटाळला.न्या. नितीन जामदार व न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला विलंबाबत न दिलेले स्पष्टीकरण, अवास्तव आणि अक्षम्य विलंबासाठीही धारेवर धरले. केवळ अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे दया अर्जावर निर्णय घेण्यास ७ वर्षे १० महिने १५ दिवस विलंब झाल्याबद्दलही फटकारले.प्रशासकीय यंत्रणेने बेपर्वाई आणि हलगर्जी दाखवली.  काय होती याचिका?सर्वोच्च न्यायालयाने गावित मायलेकींना फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र, या शिक्षेची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती. तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी २०१४ मध्ये या आरोपींचा दया अर्ज फेटाळला. दया अर्ज तीन महिन्यांत निकाली काढणे आवश्यक असताना राष्ट्रपतींनी त्या अर्जावर निर्णय घेण्यास पाच वर्षे घेतल्याने निर्णयातील विलंबाचा लाभ देऊन फाशी माफ करण्याची मागणी आरोपींनी केली होती. आमची तुरुंगातील वर्तणूक व हत्या घडली तेव्हाचे वय लक्षात घेऊन फाशी रद्द करावी, अशी मागणी दोन्ही बहिणींनी याचिकेत केली होती. जवळपास तीन दशकांपूर्वीच्या या धक्कादायक हत्याकांड प्रकरणात अंजना गावित आणि तिच्या मुली रेणुका व सीमा यांनी ४३ लहान मुलांचे अपहरण केले आणि त्यातील १३ जणांची निर्घृण हत्या केली, असे सरकारी पक्षाचे म्हणणे होते. पण प्रत्यक्षात पाच बालकांचीच हत्या झाल्याचे खटल्यात सिद्ध झाले. त्यामुळे कोल्हापूरमधील न्यायालयाने रेणुका व सीमा यांना २००१ मध्ये फाशीची शिक्षा ठोठावली होती, तर खटल्यादरम्यान अंजना गावितचे निधन झाले होते. रेणुका शिंदे आणि सीमा गावितची शिक्षा मुंबई हायकोर्टाने २००४ मध्ये आणि सुप्रीम कोर्टाने २००६ मध्ये कायम केली होती. त्यानंतर त्यांचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी ७ जुलै २०१४ रोजी फेटाळला होता. मात्र, शिक्षा अंमलबजावणीला विलंब झाला, असे म्हणत फाशीच्या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत करण्याची विनंती शिंदे-गावित बहिणींनी ॲड.  अनिकेत वगळ यांच्यामार्फत याचिकेद्वारे केली होती.१३ जणांची निर्घृण हत्याजवळपास तीन दशकांपूर्वीच्या या धक्कादायक हत्याकांड प्रकरणात अंजना गावित आणि तिच्या मुली रेणुका व सीमा यांनी ४३ लहान मुलांचे अपहरण केले व  त्यातील १३ जणांची निर्घृण हत्या केली, असे सरकारी पक्षाचे म्हणणे होते; पण प्रत्यक्षात पाच बालकांचीच हत्या झाल्याचे खटल्यात सिद्ध झाले. कोल्हापूरमधील न्यायालयाने रेणुका व सीमा यांना २००१ मध्ये फाशीची शिक्षा ठोठावली.