शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

कोल्हापूर बालहत्याकांड: गावित बहिणींच्या फाशीच्या शिक्षेचे जन्मठेपेत रूपांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 09:04 IST

सीमा गावित व रेणुका शिंदे यांच्या फाशीच्या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत

मुंबई : राज्य सरकारने दया याचिकेवरील प्रक्रिया पार पडताना अत्यंत बेपर्वाई केली व हलगर्जी दाखवली. दया याचिकेवरील विलंबाला केवळ राज्य सरकार जबाबरदार आहे व काही अंशी केंद्र सरकारही जबाबदार आहे, अशा कठोर शब्दांत राज्य सरकारवर ताशेरे ओढत उच्च न्यायालयाने १९९६ च्या कोल्हापूर बालहत्याकांड प्रकरणातील आरोपी सीमा गावित व रेणुका शिंदे यांच्या फाशीच्या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत केले.या दोघींनी १३ बालकांचे अपहरण, पाच चिमुकल्यांची हत्या आणि चोरीसाठी काही बालकांचा वापर केल्याबद्दल २००१ मध्ये कोल्हापूर सत्र न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्का ठोठावली, तर २००४ मध्ये मुंबई उच्च न्यायालय व २००६ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले आणि त्यानंतर २०१४ मध्ये राष्ट्रपतींनी त्यांचा दया अर्ज फेटाळला.न्या. नितीन जामदार व न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला विलंबाबत न दिलेले स्पष्टीकरण, अवास्तव आणि अक्षम्य विलंबासाठीही धारेवर धरले. केवळ अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे दया अर्जावर निर्णय घेण्यास ७ वर्षे १० महिने १५ दिवस विलंब झाल्याबद्दलही फटकारले.प्रशासकीय यंत्रणेने बेपर्वाई आणि हलगर्जी दाखवली.  काय होती याचिका?सर्वोच्च न्यायालयाने गावित मायलेकींना फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र, या शिक्षेची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती. तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी २०१४ मध्ये या आरोपींचा दया अर्ज फेटाळला. दया अर्ज तीन महिन्यांत निकाली काढणे आवश्यक असताना राष्ट्रपतींनी त्या अर्जावर निर्णय घेण्यास पाच वर्षे घेतल्याने निर्णयातील विलंबाचा लाभ देऊन फाशी माफ करण्याची मागणी आरोपींनी केली होती. आमची तुरुंगातील वर्तणूक व हत्या घडली तेव्हाचे वय लक्षात घेऊन फाशी रद्द करावी, अशी मागणी दोन्ही बहिणींनी याचिकेत केली होती. जवळपास तीन दशकांपूर्वीच्या या धक्कादायक हत्याकांड प्रकरणात अंजना गावित आणि तिच्या मुली रेणुका व सीमा यांनी ४३ लहान मुलांचे अपहरण केले आणि त्यातील १३ जणांची निर्घृण हत्या केली, असे सरकारी पक्षाचे म्हणणे होते. पण प्रत्यक्षात पाच बालकांचीच हत्या झाल्याचे खटल्यात सिद्ध झाले. त्यामुळे कोल्हापूरमधील न्यायालयाने रेणुका व सीमा यांना २००१ मध्ये फाशीची शिक्षा ठोठावली होती, तर खटल्यादरम्यान अंजना गावितचे निधन झाले होते. रेणुका शिंदे आणि सीमा गावितची शिक्षा मुंबई हायकोर्टाने २००४ मध्ये आणि सुप्रीम कोर्टाने २००६ मध्ये कायम केली होती. त्यानंतर त्यांचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी ७ जुलै २०१४ रोजी फेटाळला होता. मात्र, शिक्षा अंमलबजावणीला विलंब झाला, असे म्हणत फाशीच्या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत करण्याची विनंती शिंदे-गावित बहिणींनी ॲड.  अनिकेत वगळ यांच्यामार्फत याचिकेद्वारे केली होती.१३ जणांची निर्घृण हत्याजवळपास तीन दशकांपूर्वीच्या या धक्कादायक हत्याकांड प्रकरणात अंजना गावित आणि तिच्या मुली रेणुका व सीमा यांनी ४३ लहान मुलांचे अपहरण केले व  त्यातील १३ जणांची निर्घृण हत्या केली, असे सरकारी पक्षाचे म्हणणे होते; पण प्रत्यक्षात पाच बालकांचीच हत्या झाल्याचे खटल्यात सिद्ध झाले. कोल्हापूरमधील न्यायालयाने रेणुका व सीमा यांना २००१ मध्ये फाशीची शिक्षा ठोठावली.