शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बॉम्बस्फोट किंवा आत्मघाती हल्ल्यांचा धोका

By admin | Updated: October 25, 2014 08:32 IST

एअर इंडियाचे विमान बॉम्बस्फोट वा आत्मघाती हल्ल्यात उडवून देण्याचा धोका गुप्तचर यंत्रणांनी उघड केल्याच्या पार्श्‍वभूमीवर या तिन्ही विमानतळांवर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

 सुरक्षा यंत्रणा सतर्क : मुंबई, अहमदाबाद, कोची विमानतळांवर रेडअलर्ट

मुंबई/अहमदाबाद/कोची : एअर इंडियाचे विमान बॉम्बस्फोट किंवा आत्मघाती हल्ल्यात उडवून देण्याचा धोका गुप्तचर यंत्रणांनी गोपनीय माहितीच्या आधारावर उघड केल्याच्या पार्श्‍वभूमीवर या तिन्ही विमानतळांवर रेड अलर्ट जारी करीत चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.मुंबई- कोची तसेच अहमदाबाद-मुंबई या क्षेत्रात एअर इंडियाच्या विमानाला धोका असल्याची माहिती कोलकात्याहून मिळाली असल्याचे कोची येथील विमानतळ संचालक ए.के.सी नायर यांनी सांगितले. आत्मघाती बॉम्बर्स एअर इंडियाच्या दोन विमानांमध्ये चढण्याचा प्रयत्न करतील, असा इशारा नवी दिल्लीतील नागरी विमान वाहतूक सुरक्षा विभागाकडून एका पत्रात देण्यात आला.२४ ऑक्टोबरच्या मध्यरात्री किंवा २५ ऑक्टोबरच्या सकाळी अहमदाबादहून मुंबईला तसेच पहाटे ५ वाजता कोचीहून मुंबईला जाणार्‍या विमानांना लक्ष्य केले जाऊ शकते. प्रत्येक विमानात वेगवेगळा सुसाईड बॉम्बर असेल. त्यामुळे कसून चौकशी केल्यानंतर विमान उड्डाणांना परवानगी द्यावी, असे या पत्रात म्हटले होते. धोका लक्षात घेता या दोन तारखांना अहमदाबाद, मुंबई विमानतळांवरील सर्व विमानांची सुरक्षा वाढविली जाईल. अहमदाबादचे नागरी विमान वाहतूक प्रादेशिक उपायुक्तांनी २२ ऑक्टोबर रोजी या पत्राची प्रत संबंधित अधिकार्‍यांना दिली.याआधीच विमानतळांभोवती चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला असून प्रवाशांची कसून चौकशी करण्यासह विमानतळावरील प्रवेशाबाबतही चांगलीच छाननी होत आहे. अपहरणप्रतिबंधक पथकांनाही सतर्क करण्यात आले आहे. २४ ऑक्टोबर रोजी गुजरातमध्ये नववर्ष साजरे करण्यात आले तर २५ ऑक्टोबर रोजी भाऊबीज साजरी होत आहे.आयसीस-अल-कायदाची हातमिळवणीभारतात दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी आयसीस आणि अल-कायदा या दोन संघटनांनी हातमिळवणी केल्याची माहिती मिळाली आहे. गेल्याच महिन्यात अल-कायदाने भारतात शाखा उघडण्याची घोषणा केली. या संघटनेचा प्रमुख आयमन अल जवाहिरी याने व्हिडिओही जारी केला होता.दिवाळीच्या आनंदावर विरजणसुरक्षा यंत्रणतेतील जवान दिवाळी साजरी करण्याच्या मन:स्थितीत असतानाच हल्ल्यांबाबत सावधगिरीचा इशारा देण्यात आल्यामुळे मुंबई, अहमदाबाद, कोची विमानतळांवरील अधिकार्‍यांना धक्का बसला.सतर्कतेच्या इशार्‍यानंतर तिन्ही विमानतळांवरील संपूर्ण यंत्रणा सुरक्षा बंदोबस्ताला लागली.(लोकमत न्यूज नेटवर्क)