शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

नकारात्मक प्रशासनामुळे सरकारच्या गतीला खीळ

By admin | Updated: November 4, 2016 05:05 IST

आमच्या सरकारला ज्या गतीने आणि उत्साहाने काम करायचे होते ते प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या नकारात्मक आणि उदासीन वृत्तीमुळे साध्य करता आले नाही

मुंबई : आमच्या सरकारला ज्या गतीने आणि उत्साहाने काम करायचे होते ते प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या नकारात्मक आणि उदासीन वृत्तीमुळे साध्य करता आले नाही, अशी खंत ग्रामविकास तसेच महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी व्यक्त केली. त्या मंत्रालयात पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करीत होत्या. ‘अधिकारी ऐकत नाहीत’ अशी तक्रार काही काळापूर्वी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यांच्याच सरकारमध्ये मंत्री असलेल्या पंकजा यांनीही प्रशासनाविषयी नाराजीचा सूर लावला. त्या म्हणाल्या की, विकासाचा अजेंडा राबविण्यामध्ये प्रशासनाचा नकारात्मक दृष्टिकोन हा अडथळा ठरत आहे. गेल्या दोन वर्षात राज्यात दुष्काळाचे आव्हान होते. त्यासाठी जलयुक्त शिवार या महत्वाकांक्षी योजनेसाठी सरकार म्हणून आपण स्वत: खूप काही काम करण्याची धडपड केली. मात्र, अनेकदा मंत्रालयापासून तालुका पातळीवर ज्या गतीने प्रशासनाने उत्साहाने कामे करायला हवी होते, त्या गतीने ती झालीच नाहीत, अशी खंत अशी खंतही व्यक्त केली.राज्यात गेल्या दोन वर्षात सरकारने चांगली कामे केली. मात्र काही दिवसांपासून जातीपातीच्या मुद्यावर नेत्यांची आणि एकूणच समाजाची जी वर्गवारी केली जात आहे, ती योग्य नाही, असे त्या म्हणाल्या. जातपात ही मनातून हद्दपार केली पाहिजे, कारण जन्म कोणत्या जातीत हवा याची जन्माआधी निवड करण्याचा पर्याय कोणालाच उपलब्ध नसतो. त्यामुळे जातीय सलोखा कायम राहील याची काळजी समाजात घेतली गेली पाहिजे, असेही मत त्यांनी व्यक्त केले. (विशेष प्रतिनिधी) >सरपंचांची थेट निवडसरपंचांची निवडणूक थेट जनतेतून घेण्याचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाच्या विचाराधीन आहे. दक्षिणेकडील काही राज्यांमध्ये ती पद्धत आहे आणि आपला विभाग तिचा अभ्यास करीत आहे, असे त्यांनी एका प्रश्नात स्पष्ट केले. कुपोषणाच्या प्रश्नावर आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून बालमृत्यूच्या प्रश्नावर अनेक स्तरावर उपाय योजना करण्याचे आव्हान सरकारसमोर आहे, असे त्या म्हणाल्या.