शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथमध्ये बोगस कॉल सेंटर

By admin | Updated: June 10, 2017 03:04 IST

कर्जाचे आमिष दाखवून अमेरिकन नागरिकांना लुबाडणाऱ्या अंबरनाथ येथील बोगस कॉल सेंटरचा ठाणे पोलिसांनी गुरुवारी रात्री पर्दाफाश केला.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कर्जाचे आमिष दाखवून अमेरिकन नागरिकांना लुबाडणाऱ्या अंबरनाथ येथील बोगस कॉल सेंटरचा ठाणे पोलिसांनी गुरुवारी रात्री पर्दाफाश केला. या प्रकरणी आठ आरोपींना अटक केली असून, आणखी १८ संशयितांची चौकशी सुरू आहे.अंबरनाथ (पूर्व) येथील रमेश एंटरप्रायजेसच्या इमारतीमध्ये माउंट लॉजिक सोल्युशन्स या नावाने सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरमध्ये हा उद्योग सुरू होता. कर्जाच्या नावाखाली या कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांची लुबाडणूक सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलीस आयुक्तांना मिळाली होती. त्यानुसार, गुन्हे शाखेचे उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी तातडीने सूत्रे हलवून गुरुवारी रात्री ११च्या सुमारास येथे धाड टाकली. इमारतीच्या तळ मजल्यावर सुमारे तीन हजार चौरस फूट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या या कॉल सेंटरमधून रात्री ८.३० ते पहाटे ५ वाजेपर्यंत हा उद्योग चालायचा. येथील कॉलर्स अमेरिकन नागरिकांशी कोलंबस बँकेच्या नावे व्हीओआयपी कॉलद्वारे संपर्क साधायचे. त्यांना विविध प्रश्न विचारून कर्जाचे आमिष दाखवायचे. नागरिकाने तयारी दाखवली की, काही दिवसांनी पुन्हा संपर्क साधून कर्ज मंजूर झाले. परंतु, त्यासाठी १०० ते ५०० डॉलर्सपर्यंत प्रक्रिया शुल्काची (प्रोसेसिंग फी) मागणी केली जायची. हे प्रक्रिया शुल्क देण्यासाठी तेवढ्या रकमेचे आयट्यूनकार्ड विकत घेण्यास सांगून कार्डवरील १६ अंकी क्रमांक त्यांच्याकडून घेतला जायचा. हा १६ अंकी क्रमांक कॉल सेंटरच्या व्यवस्थापकास दिला जायचा. व्यवस्थापकामार्फत हा १६ अंकी क्रमांक ‘कॅश’ करण्यासाठी पुढे पाठवला जायचा. २०१५ सालापासून हा उद्योग सुरू असल्याची माहिती सहपोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी ३१ संगणकाच्या हार्डडीस्क, ३ लॅपटॉप आणि काही कागदपत्रे हस्तगत केले आहेत. सर्व आरोपी २० ते २२ वर्षे वयोगटातील आहेत. येथे २५ कॉलर्स कामाला होते. त्यापैकी आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली. बहुतांश आरोपी बारावीपर्यंत शिकलेले असून, कॉल सेंटरमध्ये काम करण्याचा अनुभव त्यांना होता. नवी मुंबईतील खारघर येथील गुरुप्रसाद श्रेयन, अंबरनाथ येथील देवेश येरलेकर, सचिन चिंचोळकर, प्रमोद दिनकर, वसीम शेख, मोहन कुळकर्णी, शरण राव आणि रोहन गेडाम ही आरोपींची नावे असून त्यापैकी श्रेयन, येरलेकर आणि चिंचोळकर हे यामागचे सूत्रधार असण्याची शक्यता आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.