शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

सात दिवस शोधत होते ते बहिणीचा मृतदेह

By admin | Updated: August 6, 2014 23:15 IST

माळीण दुर्घटनेला आठवडा झाला, तरी अनेक जण नातेवाइकांचा शोध घेत आहेत. 145 मृतदेहांचे शवविच्छेदन झाले असले, तरी काहींची ओळख अद्याप पटलेली नाही.

मंचर : माळीण दुर्घटनेला आठवडा झाला, तरी अनेक जण नातेवाइकांचा शोध घेत आहेत. 145 मृतदेहांचे शवविच्छेदन झाले असले, तरी काहींची ओळख अद्याप पटलेली नाही. आसाणो येथील पुरुषोत्तम रामचंद्र ढवळे यांच्या बहिणीचे कुटुंब ढिगा:याखाली सापडले. 6 जणांपैकी चौघांचे मृतदेह सापडले असून, ओळखही पटली आहे. बहीण तानूबाई (वय 69) व तिचा नातू सागर (वय 7) यांचे मृतदेह मिळालेले नाहीत, अशी माहिती ढवळे यांनी दिली. बुधवारी सकाळी ते परिसरात स्वत:च शोध घेत होते. अधिका:यांकडे विचारपूस करीत होते.
काही दिवसांपूर्वीच पुरुषोत्तम ढवळे बहिणीला भेटून गेले होते. घटना घडल्यानंतर आजर्पयत त्यांनी अनेकदा माळीण येथे हेलपाटे मारले. आजही हातात छत्री घेऊन ते दोन किलोमीटर अंतर पायी चालून बहिणीचा मृतदेह शोधण्यासाठी आले होते. शाळेसमोरील टाकीवर उभे राहून ते हताश नजरेने घटनास्थळाकडे पाहत होते. ते जिवंत असण्याची आता आशा नाही; निदान त्यांचे मृतदेह तरी मिळावेत, असे ढवळे म्हणाले. बहिणीच्या घरात ती स्वत:, सून भारती, गोरक्ष पोटे, 3 लहान मुली व मुलगा, असे सहा जण होते. सर्व जण गाडले गेले. इतरांचे मृतदेह मिळाले; मात्र बहीण तानूबाई व तिचा नातू सागर यांचे मृतदेह मिळाले नसल्याचे ढवळे म्हणाले. 
गावातील मंदिरालगतच बहिणीचे घर होते. अडीवरे प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन अनेक मृतदेह पाहिले. मात्र, बहीण व तिचा नातू यांचे मृतदेह सापडले नाहीत. माझी मुले पुणो येथून येऊन त्यांनीही शोधाशोध केली, असे पुरुषोत्तम ढवळे म्हणाले. त्यांनी तेथील अधिका:यांशी संपर्क साधला. ढवळे यांना अनेक जण धीर देत होते. अनोळखी मृतदेह समजून त्यांना अग्नी देण्याअगोदर मला मृतदेह मिळावेत, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.(वार्ताहर)