शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

बेपत्ता नगरसेविकेचा मृतदेह सापडला

By admin | Updated: October 3, 2015 03:52 IST

नेरूळ येथून गेल्या आठवड्यात बेपत्ता झालेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका शशिकला मालदी यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

नवी मुंबई : नेरूळ येथून गेल्या आठवड्यात बेपत्ता झालेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका शशिकला मालदी यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. मानखुर्द - गोवंडीदरम्यान रेल्वेच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला असून, त्यांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. बेपत्ता झाल्याच्या दिवशीच त्यांचा मृत्यू झाला असून, १० दिवसांनी ही घटना उघड झाली आहे.२३ सप्टेंबरपासून प्रभाग ८८च्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका शशिकला मालदी बेपत्ता होत्या. याप्रकरणी २८ तारखेला कुटुंबीयांनी त्या मानसिक तणावात घर सोडून गेल्याची तक्रार नेरूळ पोलिसांकडे केली होती. एक महिला लोकप्रतिनिधी बेपत्ता झाल्याची शहरातली पहिलीच घटना असल्याने उपायुक्त शहाजी उमाप, साहाय्यक आयुक्त धनराज दायमा, वरिष्ठ निरीक्षक संगीता अल्फान्सो यांनी तपासाकरिता दोन पथके तयार केली होती. या पथकाने सर्वत्र शोध घेतल्यानंतर मुंबई, नवी मुंबई व परिसरात आढळलेल्या बेवारस मृतदेहांची माहिती मिळवली. यावेळी गोवंडी येथे रेल्वेच्या धडकेने एका महिलेचा मृत्यू झाला असून तिची ओळख पटलेली नसल्याचे समजले. या मृतदेहाची पाहणी करुनही पोलिसांना ओळख पटली नाही. अखेर शुक्रवारी कपड्यावरून तो मृतदेह मालदी यांचा असल्याची खात्री पटली. त्यानंतर मृतदेह अंत्यविधीसाठी कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी नेरूळच्या स्मशानभूमी मध्ये शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आहे. माजी मंत्री गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक, पालिका अधिकारी यावेळी उपस्थित होते.अपघातानंतर मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी रेल्वे पोलिसांनी सर्वत्र चौकशी केली होती. त्यावेळी मालदी यांच्या बेपत्ता होण्याची तक्रारच झालेली नव्हती. यामुळे त्यांचा मृतदेह बेवारस म्हणून मुंबईच्या राजावाडी रुग्णालयात होता. अखेर दहा दिवसांनी नेरूळ पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला.एप्रिल महिन्यात झालेल्या महापालिका निवडणुकीत प्रभाग ८८ मधून मालदी निवडून आल्या होत्या. तेव्हापासून प्रभागात विरोधकांच्या कुरघोडीचा त्यांना त्रास होत होता. त्यांच्या जात प्रमाणपत्रावरही विरोधकांनी आक्षेप घेतलेला आहे. तर गणेशोत्सवापूर्वी मंडप उभारणीवरून झालेल्या वादात त्यांच्यावर हल्ल्याचाही प्रयत्न झाला होता. याचा प्रचंड मनस्ताप झाल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.घटनेच्या दिवशी मालदी यांनी पर्स किंवा मोबाइल सोबत नेला नव्हता. यामुळे त्या गोवंडीपर्यंत पोचल्या कशा व अपघातापूर्वीचे काही तास त्या कुठे होत्या, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.चौकशीची मागणीनेरूळची महिला गोवंडीला जावून आत्महत्या करते, ही न पटणारी बाब आहे. त्यामुळे या प्रकरणाची सी.आय.डी. मार्फत चौकशी करून ही आत्महत्या आहे की हत्या याचा उलगडा करण्याची मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.