शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

बेपत्ता नगरसेविकेचा मृतदेह सापडला

By admin | Updated: October 3, 2015 03:52 IST

नेरूळ येथून गेल्या आठवड्यात बेपत्ता झालेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका शशिकला मालदी यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

नवी मुंबई : नेरूळ येथून गेल्या आठवड्यात बेपत्ता झालेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका शशिकला मालदी यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. मानखुर्द - गोवंडीदरम्यान रेल्वेच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला असून, त्यांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. बेपत्ता झाल्याच्या दिवशीच त्यांचा मृत्यू झाला असून, १० दिवसांनी ही घटना उघड झाली आहे.२३ सप्टेंबरपासून प्रभाग ८८च्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका शशिकला मालदी बेपत्ता होत्या. याप्रकरणी २८ तारखेला कुटुंबीयांनी त्या मानसिक तणावात घर सोडून गेल्याची तक्रार नेरूळ पोलिसांकडे केली होती. एक महिला लोकप्रतिनिधी बेपत्ता झाल्याची शहरातली पहिलीच घटना असल्याने उपायुक्त शहाजी उमाप, साहाय्यक आयुक्त धनराज दायमा, वरिष्ठ निरीक्षक संगीता अल्फान्सो यांनी तपासाकरिता दोन पथके तयार केली होती. या पथकाने सर्वत्र शोध घेतल्यानंतर मुंबई, नवी मुंबई व परिसरात आढळलेल्या बेवारस मृतदेहांची माहिती मिळवली. यावेळी गोवंडी येथे रेल्वेच्या धडकेने एका महिलेचा मृत्यू झाला असून तिची ओळख पटलेली नसल्याचे समजले. या मृतदेहाची पाहणी करुनही पोलिसांना ओळख पटली नाही. अखेर शुक्रवारी कपड्यावरून तो मृतदेह मालदी यांचा असल्याची खात्री पटली. त्यानंतर मृतदेह अंत्यविधीसाठी कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी नेरूळच्या स्मशानभूमी मध्ये शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आहे. माजी मंत्री गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक, पालिका अधिकारी यावेळी उपस्थित होते.अपघातानंतर मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी रेल्वे पोलिसांनी सर्वत्र चौकशी केली होती. त्यावेळी मालदी यांच्या बेपत्ता होण्याची तक्रारच झालेली नव्हती. यामुळे त्यांचा मृतदेह बेवारस म्हणून मुंबईच्या राजावाडी रुग्णालयात होता. अखेर दहा दिवसांनी नेरूळ पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला.एप्रिल महिन्यात झालेल्या महापालिका निवडणुकीत प्रभाग ८८ मधून मालदी निवडून आल्या होत्या. तेव्हापासून प्रभागात विरोधकांच्या कुरघोडीचा त्यांना त्रास होत होता. त्यांच्या जात प्रमाणपत्रावरही विरोधकांनी आक्षेप घेतलेला आहे. तर गणेशोत्सवापूर्वी मंडप उभारणीवरून झालेल्या वादात त्यांच्यावर हल्ल्याचाही प्रयत्न झाला होता. याचा प्रचंड मनस्ताप झाल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.घटनेच्या दिवशी मालदी यांनी पर्स किंवा मोबाइल सोबत नेला नव्हता. यामुळे त्या गोवंडीपर्यंत पोचल्या कशा व अपघातापूर्वीचे काही तास त्या कुठे होत्या, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.चौकशीची मागणीनेरूळची महिला गोवंडीला जावून आत्महत्या करते, ही न पटणारी बाब आहे. त्यामुळे या प्रकरणाची सी.आय.डी. मार्फत चौकशी करून ही आत्महत्या आहे की हत्या याचा उलगडा करण्याची मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.