शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

बेपत्ता नगरसेविकेचा मृतदेह सापडला

By admin | Updated: October 3, 2015 03:52 IST

नेरूळ येथून गेल्या आठवड्यात बेपत्ता झालेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका शशिकला मालदी यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

नवी मुंबई : नेरूळ येथून गेल्या आठवड्यात बेपत्ता झालेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका शशिकला मालदी यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. मानखुर्द - गोवंडीदरम्यान रेल्वेच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला असून, त्यांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. बेपत्ता झाल्याच्या दिवशीच त्यांचा मृत्यू झाला असून, १० दिवसांनी ही घटना उघड झाली आहे.२३ सप्टेंबरपासून प्रभाग ८८च्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका शशिकला मालदी बेपत्ता होत्या. याप्रकरणी २८ तारखेला कुटुंबीयांनी त्या मानसिक तणावात घर सोडून गेल्याची तक्रार नेरूळ पोलिसांकडे केली होती. एक महिला लोकप्रतिनिधी बेपत्ता झाल्याची शहरातली पहिलीच घटना असल्याने उपायुक्त शहाजी उमाप, साहाय्यक आयुक्त धनराज दायमा, वरिष्ठ निरीक्षक संगीता अल्फान्सो यांनी तपासाकरिता दोन पथके तयार केली होती. या पथकाने सर्वत्र शोध घेतल्यानंतर मुंबई, नवी मुंबई व परिसरात आढळलेल्या बेवारस मृतदेहांची माहिती मिळवली. यावेळी गोवंडी येथे रेल्वेच्या धडकेने एका महिलेचा मृत्यू झाला असून तिची ओळख पटलेली नसल्याचे समजले. या मृतदेहाची पाहणी करुनही पोलिसांना ओळख पटली नाही. अखेर शुक्रवारी कपड्यावरून तो मृतदेह मालदी यांचा असल्याची खात्री पटली. त्यानंतर मृतदेह अंत्यविधीसाठी कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी नेरूळच्या स्मशानभूमी मध्ये शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आहे. माजी मंत्री गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक, पालिका अधिकारी यावेळी उपस्थित होते.अपघातानंतर मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी रेल्वे पोलिसांनी सर्वत्र चौकशी केली होती. त्यावेळी मालदी यांच्या बेपत्ता होण्याची तक्रारच झालेली नव्हती. यामुळे त्यांचा मृतदेह बेवारस म्हणून मुंबईच्या राजावाडी रुग्णालयात होता. अखेर दहा दिवसांनी नेरूळ पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला.एप्रिल महिन्यात झालेल्या महापालिका निवडणुकीत प्रभाग ८८ मधून मालदी निवडून आल्या होत्या. तेव्हापासून प्रभागात विरोधकांच्या कुरघोडीचा त्यांना त्रास होत होता. त्यांच्या जात प्रमाणपत्रावरही विरोधकांनी आक्षेप घेतलेला आहे. तर गणेशोत्सवापूर्वी मंडप उभारणीवरून झालेल्या वादात त्यांच्यावर हल्ल्याचाही प्रयत्न झाला होता. याचा प्रचंड मनस्ताप झाल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.घटनेच्या दिवशी मालदी यांनी पर्स किंवा मोबाइल सोबत नेला नव्हता. यामुळे त्या गोवंडीपर्यंत पोचल्या कशा व अपघातापूर्वीचे काही तास त्या कुठे होत्या, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.चौकशीची मागणीनेरूळची महिला गोवंडीला जावून आत्महत्या करते, ही न पटणारी बाब आहे. त्यामुळे या प्रकरणाची सी.आय.डी. मार्फत चौकशी करून ही आत्महत्या आहे की हत्या याचा उलगडा करण्याची मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.