शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

राजोडी समुद्रात बुडालेल्या चार मुलांचे मृतदेह सापडले

By admin | Updated: August 13, 2016 03:15 IST

समुद्राला आलेल्या भरतीचा अंदाज न आल्याने नालासोपारा येथील चार मुले राजोडी येथील समुद्रात गुरुवारी दुपारी वाहून गेली. शुक्रवारी सकाळी पोलिसांनी हेलिकॉप्टर, पालिका

वसई : समुद्राला आलेल्या भरतीचा अंदाज न आल्याने नालासोपारा येथील चार मुले राजोडी येथील समुद्रात गुरुवारी दुपारी वाहून गेली. शुक्रवारी सकाळी पोलिसांनी हेलिकॉप्टर, पालिका अग्निशमन दल आणि मच्छीमारांच्या मदतीने हाती घेतलेल्या शोधमोहिमेत चौघांचेही मृतदेह राजोडी समुद्रकिनारी हाती लागले. दोघांना गावकऱ्यांनी वाचवले होते. नालासोपारा येथील लक्ष्मीबेन छेडा मार्गावर राहणारी सात मुले दुपारी दोनच्या सुमारास पोहण्यासाठी विरार पश्चिमेकडील राजोडी बीचवर गेली होती. सातपैकी सहा जण समुद्रात पोहायला उतरली होती. भरतीच्या लाटेच्या तडाख्याने सहाही मुले समुद्रात खेचली गेली. यावेळी किनाऱ्यावर असलेले गावकरी मदतीसाठी धावले. सहापैकी दोघांना वाचवण्यात गावकऱ्यांना यश आले.मात्र, मोठी भरती असल्याने लाटेच्या तडाख्यात सनी पालव (१५), सचिन विश्वकर्मा (१६), रोहन जाधव (१७) आणि चेतन कालप (१९) ही चार मुले वाहून गेली होती. तर सचिन माळेकर (१६), नमन मिश्रा (१५) आणि अंकित शर्मा (१५) ही मुले बचावली होती. पोलिसांनी वसई विरार पालिकेच्या अग्निशमन दल आणि मच्छीमारांच्या मदतीने शोधमोहीम हाती घेतली होती. पण, रात्री उशिरापर्यंत कुणाचाही पत्ता लागला नाही. शुक्रवारी सकाळी हेलिकॉप्टर आणि अग्निशमन दर तसेच मच्छीमारांच्या मदतीने पुन्हा शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. सकाळी चारही मुलांचे मृतदेह हाती लागले. (प्रतिनिधी)