शहरं
Join us  
Trending Stories
1
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
2
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
3
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
4
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
5
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
6
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
7
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
8
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
9
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
10
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
11
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
12
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
13
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
14
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
15
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
16
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
17
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
18
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
19
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
20
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री

बोर्डाच्या कोऱ्या उत्तर पत्रिका गायब

By admin | Updated: March 19, 2015 02:32 IST

राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी व बारावीच्या परीक्षा सध्या सुरू असून या परीक्षेत मोठी गडबड आहे.

राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी व बारावीच्या परीक्षा सध्या सुरू असून या परीक्षेत मोठी गडबड आहे. परीक्षा केंद्रातून कोऱ्या उत्तर पत्रिकाच गायब झाल्या असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहेत. हा प्रकार लक्षात येताच विभागीय अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशीला सुरुवात केली आहे. लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार बोर्ड परीक्षा सुरू होण्यापूर्वी सर्व परीक्षा केंद्रांवर उत्तर पत्रिका पोहोचवल्या जातात. प्रत्येक केंद्राला विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा अधिक उत्तर पत्रिका उपलब्ध करून दिल्या जातात. उत्तर पत्रिका उपलब्ध करून देत असतांना त्या मोजण्याऐवजी त्यांचे वजन केले जाते. त्यामुळे कुठे किती उत्तर पत्रिका दिल्या आहेत. याची माहिती बोर्डाकडे राहत नाही. विशेष म्हणजे कुठल्याही उत्तर पत्रिकेमध्ये अनुक्रमानुसार क्रमांक राहत नसल्याचीही माहिती मिळाली आहे. त्यामुळे कोणत्या क्रमांकाची उत्तर पत्रिका कोणत्या परीक्षा केंद्राला देण्यात आली, याची माहितीही काढता येत नाही. याचा लाभ घेत काही परीक्षा केंद्रांमधून उत्तर पत्रिका गायब केल्या जातात. त्या विद्यार्थ्यांना विकल्या जातात. अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. परंतु अजूनही हा प्रकार बोर्डाच्या नजरेत आलेला नाही. असे प्रकार विशेषत: ग्रामीण भागांमध्ये होतात. बोर्डातील अधिकाऱ्यांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या दीड वर्षापासून बोर्डात अध्यक्ष व सचिव नसल्याने याप्रकारच्या घटनेत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत या प्रकरणाकडे फारसे गांभीर्याने पाहण्यात आले नव्हते. गेल्या १७ मार्च रोजी कोऱ्या उत्तरपत्रिका गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आला. भरारी पथकाला १२ वीच्या परीक्षेच्या दरम्यान नागपुरातील एका परीक्षा केंद्रात एका विद्यार्थ्याकडे दोन उत्तरपत्रिका आढळून आल्या. त्यापैकी एक कोरी होती तर दुसरी लिहिलेली होती. या पार्श्वभूमीवर तातडीने दोन्ही उत्तरपत्रिका जप्त करण्यात आल्या; सोबतच याची माहिती विभागीय अधिकाऱ्यांनाही फोनवर देण्यात आली. अधिकाऱ्यांना या उत्तरपत्रिका सील करण्याचे आदेश देण्यात आले. दोन्ही उत्तरपत्रिका तातडीने बोर्डाला पाठविण्याचे निर्देश देण्यात आले. यासंबंधात बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगितले की, एका विद्यार्थ्याजवळ दोन उत्तरपत्रिका आढळून आल्या; सोबत या प्रकरणाची चौकशी केली जात असल्याचेही स्पष्ट केले. माहिती मिळताच विद्यार्थ्याच्या दोन्ही उत्तरपत्रिका मागविण्यात आल्या आहेत. चौकशीदरम्यान संबंधित विद्यार्थी आणि परीक्षा केंद्रातील अधिकाऱ्यांनाही विचारणा केली जाईल. उत्तरपत्रिका गायब होण्यासंबंधात मात्र त्यांनी कुठल्याही प्रकारची टिप्पणी करण्यास नकार दिला.