शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
4
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
5
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
7
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
8
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
9
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
10
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
11
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
12
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
13
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
14
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
15
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
16
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
17
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
18
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
19
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
20
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!

बोर्डाच्या कोऱ्या उत्तर पत्रिका गायब

By admin | Updated: March 19, 2015 02:32 IST

राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी व बारावीच्या परीक्षा सध्या सुरू असून या परीक्षेत मोठी गडबड आहे.

राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी व बारावीच्या परीक्षा सध्या सुरू असून या परीक्षेत मोठी गडबड आहे. परीक्षा केंद्रातून कोऱ्या उत्तर पत्रिकाच गायब झाल्या असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहेत. हा प्रकार लक्षात येताच विभागीय अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशीला सुरुवात केली आहे. लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार बोर्ड परीक्षा सुरू होण्यापूर्वी सर्व परीक्षा केंद्रांवर उत्तर पत्रिका पोहोचवल्या जातात. प्रत्येक केंद्राला विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा अधिक उत्तर पत्रिका उपलब्ध करून दिल्या जातात. उत्तर पत्रिका उपलब्ध करून देत असतांना त्या मोजण्याऐवजी त्यांचे वजन केले जाते. त्यामुळे कुठे किती उत्तर पत्रिका दिल्या आहेत. याची माहिती बोर्डाकडे राहत नाही. विशेष म्हणजे कुठल्याही उत्तर पत्रिकेमध्ये अनुक्रमानुसार क्रमांक राहत नसल्याचीही माहिती मिळाली आहे. त्यामुळे कोणत्या क्रमांकाची उत्तर पत्रिका कोणत्या परीक्षा केंद्राला देण्यात आली, याची माहितीही काढता येत नाही. याचा लाभ घेत काही परीक्षा केंद्रांमधून उत्तर पत्रिका गायब केल्या जातात. त्या विद्यार्थ्यांना विकल्या जातात. अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. परंतु अजूनही हा प्रकार बोर्डाच्या नजरेत आलेला नाही. असे प्रकार विशेषत: ग्रामीण भागांमध्ये होतात. बोर्डातील अधिकाऱ्यांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या दीड वर्षापासून बोर्डात अध्यक्ष व सचिव नसल्याने याप्रकारच्या घटनेत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत या प्रकरणाकडे फारसे गांभीर्याने पाहण्यात आले नव्हते. गेल्या १७ मार्च रोजी कोऱ्या उत्तरपत्रिका गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आला. भरारी पथकाला १२ वीच्या परीक्षेच्या दरम्यान नागपुरातील एका परीक्षा केंद्रात एका विद्यार्थ्याकडे दोन उत्तरपत्रिका आढळून आल्या. त्यापैकी एक कोरी होती तर दुसरी लिहिलेली होती. या पार्श्वभूमीवर तातडीने दोन्ही उत्तरपत्रिका जप्त करण्यात आल्या; सोबतच याची माहिती विभागीय अधिकाऱ्यांनाही फोनवर देण्यात आली. अधिकाऱ्यांना या उत्तरपत्रिका सील करण्याचे आदेश देण्यात आले. दोन्ही उत्तरपत्रिका तातडीने बोर्डाला पाठविण्याचे निर्देश देण्यात आले. यासंबंधात बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगितले की, एका विद्यार्थ्याजवळ दोन उत्तरपत्रिका आढळून आल्या; सोबत या प्रकरणाची चौकशी केली जात असल्याचेही स्पष्ट केले. माहिती मिळताच विद्यार्थ्याच्या दोन्ही उत्तरपत्रिका मागविण्यात आल्या आहेत. चौकशीदरम्यान संबंधित विद्यार्थी आणि परीक्षा केंद्रातील अधिकाऱ्यांनाही विचारणा केली जाईल. उत्तरपत्रिका गायब होण्यासंबंधात मात्र त्यांनी कुठल्याही प्रकारची टिप्पणी करण्यास नकार दिला.