शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
2
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
3
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
4
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
5
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
6
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
7
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
8
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
9
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
10
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
11
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
12
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
13
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
14
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
15
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
16
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
17
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
18
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
19
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
20
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना

बाहेरून परीक्षा देणाऱ्यांसाठी बोर्डाची नवीन कार्यपद्धती

By admin | Updated: May 18, 2015 03:39 IST

दहावी-बारावीची परीक्षा बाहेरून देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवीन कार्यपद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक

पुणे : दहावी-बारावीची परीक्षा बाहेरून देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवीन कार्यपद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला असून, लवकरच त्याची अंमलबजावणी होणार आहे.आर्थिक, कौटुंबिक किंवा अन्य कारणामुळे नियमितपणे शाळा वा कॉलेजमध्ये जाऊन दहावी-बारावीची परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना १७ नंबरचा अर्ज भरून परीक्षा देण्याची सुविधा राज्य शिक्षण मंडळाने उपलब्ध केली आहे. राज्यातील सुमारे दोन लाख विद्यार्थी या सुविधेचा लाभ घेऊन दरवर्षी बाहेरून परीक्षा देतात. परंतु, अनेकदा ‘एजंट’कडून या विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक केली जाते. काही शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील कर्मचाऱ्यांकडूनही या विद्यार्थ्यांना त्रास दिला जातो. काही वेळा राज्य मंडळाने निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा या विद्यार्थ्यांकडून अधिक शुल्क आकारले जाते. परिणामी काही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात. या सर्व बाबी विचारात घेऊन बाहेरून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळाकडून नवीन कार्यपद्धती तयार केली जात असून, तज्ज्ञ मंडळींनी यावरील कामास सुरूवात केली आहे.प्रत्येक विद्यार्थ्याला घराशेजारील शाळेत १७ नंबरचा अर्ज कसा भरता येईल. तसेच विद्यापीठाच्या बहि:स्थ विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याच्या पद्धतीनुसार प्रत्येक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयास विद्यार्थी वाटून देण्याचा विचारही शिक्षण मंडळाकडून सुरू आहे. सोमवारी याविषयी बैठक होणार आहे.