शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

निळी पाखरं वेगवेगळ्या राजकीय फांद्यांवर!

By admin | Updated: February 17, 2017 03:27 IST

राज्यातील दहा महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षांचे विविध गट वेगवेगळ्या पक्षांसोबत तर आहेतच, पण एकच पक्ष वेगवेगळ्या

यदु जोशी / मुंबईराज्यातील दहा महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षांचे विविध गट वेगवेगळ्या पक्षांसोबत तर आहेतच, पण एकच पक्ष वेगवेगळ्या पक्षांबरोबर असल्याचेही चित्र बघायला मिळत आहे. रिपब्लिकन नेत्यांचे महत्त्व कितपत उरले हा वादाचा प्रश्न असला, तरी निळ्या झेंड्याचे महत्त्व चांगले ठाऊक असलेल्या सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी रिपाच्या वेगवेगळ्या गटातटांना जवळ केले आहे. आठवलेंची सर्वदूर फरफटकेंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टीची भाजपाबरोबर फरफट चालली आहे. मुंबईत आधी त्यांना २५ जागा देण्याचे भाजपाने जाहीर केले. प्रत्यक्षात १७ जागा दिल्या. त्यातील ६ जागांवर भाजपाचे उमेदवार कमळावर लढत असल्याने गोंधळाची स्थिती आहे. ११ जागांवर भाजपाचा उमदेवार नाही. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये रिपाइंच्या उमेदवारांना भाजपाने कमळावर उभे केले. त्यांची रिपाइंने हकालपट्टी केली आहे. पुण्यात रिपाइंचे अधिकृत सात तर पिंपरी-चिंचवडमध्ये तीन उमेदवार आहेत. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर म्हणाले की, भाजपाने अधिक सन्मानाने युती करायला हवी होती पण आता त्यांनी मुंबईत ज्या सहा जागांवर आमच्या विरोधात उभे केले आहेत तेथे त्यांचे नेते आता आमच्या उमेदवारांचा प्रचार करीत आहेत. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती उरलेली नाही.अर्जून डांगळे हे पूर्वी आठवले समर्थक असलेले नेते आता शिवसेनेसोबत आहेत. आंबेडकरांची वेगळी आघाडीभारिप-बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस वा राष्ट्रवादीसोबत न जाता दोन्ही डावे पक्ष आणि अन्य लहान पक्षांची वेगळी आघाडी तयार केली आहे. ते मुंबईत ८०, पुण्यात ४०, अकोला ६५, नागपूर २२, ठाणे २५, नाशिक २४ आदी जागा लढत आहेत. आ.जोगेंद्र कवाडे यांच्या पीरिपाची मुंबईत काँग्रेसशी तर ठाण्यात चक्क शिवसेनेशी युती आहे. नागपुरात त्यांनी काही रिपब्लिकन गटांची मोट बांधून रिपब्लिकन फ्रंट तयार केला हा फ्रंट राष्ट्रवादीसोबत आहे. अमरावती, सोलापुरात ते काँग्रेससोबत आहेत तर उल्हासनगरमध्ये स्वबळावर लढत आहेत. शहर बदलले पाठिंबा बदललालाँगमार्चचे प्रणेते प्रा.आ.जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या पक्षांना पाठिंबा आहे. मुंबईत त्यांचा पक्ष काँग्रेससोबत आहे. काँग्रेसने त्यांना सात जागा सोडल्या पण सगळे उमेदवार पंजावरच लढत आहेत. चर्चा अशी आहे की सातपैकी बहुतेक उमेदवार काँग्रेसनेच दिले पण ते पीरिपाच्या कोट्यात टाकण्यात आले. पीरिपाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांचे फोटो मुंबईत राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या पोस्टरवर झळकलेले दिसतात. प्रत्यक्षात त्यांचा पाठिंबा काँग्रेसला आहे. गवई गट स्वबळ अन् काँग्रेससोबतहीदिवगंत नेते रा.सू.गवई यांच्या रिपब्लिकन पार्टीची सूत्रे आता त्यांचे पुत्र डॉ.राजेंद्र गवई सांभाळतात. त्यांनी त्यांच्या अमरावती या गृह जिल्ह्यात स्वबळावर उमेदवार उभे केले आहेत. महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांत ते सर्व ताकदीनिशी लढत आहेत. मुंबई, पुणे सोडून इतर महापालिकांमध्ये ते काँग्रेससोबत आहेत. बसपाचा एकला चलो रेबहुजन समाज पार्टी नेहमीप्रमाणे स्वबळावर लढत आहे. इतर पक्षांच्या नादी लागण्याचे त्यांनी सुरुवातीपासून टाळले आणि एक विश्वासार्हता मिळविली आहे. मुंबईत १४० जागा लढवताना बसपाने ९० जागांवर मुस्लिम आणि उत्तर भारतीयांना उमेदवारी दिली आहे. दलित उमेदवार तर आहेतच. या सोशल इंजिनियरिंगचा मोठा फायदा होईल, असे पक्षाला वाटते. पुणे ६०, नागपूर १०७, पिंपरी-चिंचवड २२, ठाणे २५, नाशिक ६०, उल्हासनगर २२, अमरावती ६० आणि अकोला १० अशा जागा बसपा लढवत आहे.