शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

निळी पाखरं वेगवेगळ्या राजकीय फांद्यांवर!

By admin | Updated: February 17, 2017 03:27 IST

राज्यातील दहा महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षांचे विविध गट वेगवेगळ्या पक्षांसोबत तर आहेतच, पण एकच पक्ष वेगवेगळ्या

यदु जोशी / मुंबईराज्यातील दहा महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षांचे विविध गट वेगवेगळ्या पक्षांसोबत तर आहेतच, पण एकच पक्ष वेगवेगळ्या पक्षांबरोबर असल्याचेही चित्र बघायला मिळत आहे. रिपब्लिकन नेत्यांचे महत्त्व कितपत उरले हा वादाचा प्रश्न असला, तरी निळ्या झेंड्याचे महत्त्व चांगले ठाऊक असलेल्या सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी रिपाच्या वेगवेगळ्या गटातटांना जवळ केले आहे. आठवलेंची सर्वदूर फरफटकेंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टीची भाजपाबरोबर फरफट चालली आहे. मुंबईत आधी त्यांना २५ जागा देण्याचे भाजपाने जाहीर केले. प्रत्यक्षात १७ जागा दिल्या. त्यातील ६ जागांवर भाजपाचे उमेदवार कमळावर लढत असल्याने गोंधळाची स्थिती आहे. ११ जागांवर भाजपाचा उमदेवार नाही. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये रिपाइंच्या उमेदवारांना भाजपाने कमळावर उभे केले. त्यांची रिपाइंने हकालपट्टी केली आहे. पुण्यात रिपाइंचे अधिकृत सात तर पिंपरी-चिंचवडमध्ये तीन उमेदवार आहेत. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर म्हणाले की, भाजपाने अधिक सन्मानाने युती करायला हवी होती पण आता त्यांनी मुंबईत ज्या सहा जागांवर आमच्या विरोधात उभे केले आहेत तेथे त्यांचे नेते आता आमच्या उमेदवारांचा प्रचार करीत आहेत. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती उरलेली नाही.अर्जून डांगळे हे पूर्वी आठवले समर्थक असलेले नेते आता शिवसेनेसोबत आहेत. आंबेडकरांची वेगळी आघाडीभारिप-बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस वा राष्ट्रवादीसोबत न जाता दोन्ही डावे पक्ष आणि अन्य लहान पक्षांची वेगळी आघाडी तयार केली आहे. ते मुंबईत ८०, पुण्यात ४०, अकोला ६५, नागपूर २२, ठाणे २५, नाशिक २४ आदी जागा लढत आहेत. आ.जोगेंद्र कवाडे यांच्या पीरिपाची मुंबईत काँग्रेसशी तर ठाण्यात चक्क शिवसेनेशी युती आहे. नागपुरात त्यांनी काही रिपब्लिकन गटांची मोट बांधून रिपब्लिकन फ्रंट तयार केला हा फ्रंट राष्ट्रवादीसोबत आहे. अमरावती, सोलापुरात ते काँग्रेससोबत आहेत तर उल्हासनगरमध्ये स्वबळावर लढत आहेत. शहर बदलले पाठिंबा बदललालाँगमार्चचे प्रणेते प्रा.आ.जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या पक्षांना पाठिंबा आहे. मुंबईत त्यांचा पक्ष काँग्रेससोबत आहे. काँग्रेसने त्यांना सात जागा सोडल्या पण सगळे उमेदवार पंजावरच लढत आहेत. चर्चा अशी आहे की सातपैकी बहुतेक उमेदवार काँग्रेसनेच दिले पण ते पीरिपाच्या कोट्यात टाकण्यात आले. पीरिपाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांचे फोटो मुंबईत राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या पोस्टरवर झळकलेले दिसतात. प्रत्यक्षात त्यांचा पाठिंबा काँग्रेसला आहे. गवई गट स्वबळ अन् काँग्रेससोबतहीदिवगंत नेते रा.सू.गवई यांच्या रिपब्लिकन पार्टीची सूत्रे आता त्यांचे पुत्र डॉ.राजेंद्र गवई सांभाळतात. त्यांनी त्यांच्या अमरावती या गृह जिल्ह्यात स्वबळावर उमेदवार उभे केले आहेत. महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांत ते सर्व ताकदीनिशी लढत आहेत. मुंबई, पुणे सोडून इतर महापालिकांमध्ये ते काँग्रेससोबत आहेत. बसपाचा एकला चलो रेबहुजन समाज पार्टी नेहमीप्रमाणे स्वबळावर लढत आहे. इतर पक्षांच्या नादी लागण्याचे त्यांनी सुरुवातीपासून टाळले आणि एक विश्वासार्हता मिळविली आहे. मुंबईत १४० जागा लढवताना बसपाने ९० जागांवर मुस्लिम आणि उत्तर भारतीयांना उमेदवारी दिली आहे. दलित उमेदवार तर आहेतच. या सोशल इंजिनियरिंगचा मोठा फायदा होईल, असे पक्षाला वाटते. पुणे ६०, नागपूर १०७, पिंपरी-चिंचवड २२, ठाणे २५, नाशिक ६०, उल्हासनगर २२, अमरावती ६० आणि अकोला १० अशा जागा बसपा लढवत आहे.