शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
3
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
4
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
5
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
6
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
7
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
8
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
9
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
10
मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की राग राग होतो? त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या सोप्या टिप्स!
11
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
12
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
13
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
14
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
15
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
16
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
17
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
18
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
19
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

चुकीच्या माणसांना झोडपून काढा!

By admin | Updated: May 16, 2016 02:26 IST

समाजातील चुकीच्या माणसांमुळे चांगल्या व्यक्तींना विनाकारण त्रास सहन करावा लागतो

कामठी (नागपूर) : समाजातील चुकीच्या माणसांमुळे चांगल्या व्यक्तींना विनाकारण त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पोलिसांनी चुकीच्या माणसांना झोडपून काढावे. त्याचबरोबर समाजातील चांगल्या व्यक्तींची सदैव पाठराखण करावी, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.कामठी, कामठी जुनी व हिंगणा पोलीस ठाण्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शनिवारी सकाळी नागपूर ग्रामीण पोलीस प्रशासनाकडून नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाकडे हस्तांतरण करण्यात आले. त्याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले, लोकप्रतिनिधींनी मनात आणले तर, समाजात कायद्याची दहशत निर्माण होऊ शकते. आम्ही सार्वजनिक जीवनात असतो; आमच्या सोबत कुणीही फोटो काढतो. पण पोलिसांनी गुन्हेगार ओळखावे आणि सामान्य माणसाला संरक्षण द्यावे. दुसरीकडे, चुकीच्या लोकांना कायद्याचा आधार घेत ठोकून काढावे, असे मुख्यमंत्री म्हणाले.गृह विभागाचे काम अत्यंत पारदर्शकपणे सुरू आहे. नागपूरप्रमाणे संपूर्ण राज्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण करण्यास सरकार यशस्वी होईल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला. शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण कमी होत असल्याने त्यांनी नागपूर शहर पोलिसांचे अभिनंदन केले. (प्रतिनिधी)राजकीय हस्तक्षेप नाही : मुख्यमंत्रीपोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पूर्वी राजकीय हस्तक्षेप केला जायचा. त्यामुळे अधिकाऱ्यांना हव्या असलेल्या ठिकाणी ‘पोस्टिंग’ मिळायचे. यातून भ्रष्टाचार वाढीला लागला होता. आता पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या नियमानुसार केल्या जातील. त्यात कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.