शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या तोंडावर खूनसत्र सुरू

By admin | Updated: November 4, 2016 01:32 IST

महापालिका निवडणूक जशी जवळ येऊ लागली,तसे वातावरण बदलू लागले आहे.

पिंपरी : महापालिका निवडणूक जशी जवळ येऊ लागली,तसे वातावरण बदलू लागले आहे. गुन्हेगारी कारवाया वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना, शहरात प्रत्यक्षात खून सत्र सुरू झाले आहे. ऐन दिवाळीत एकाच आठवड्यात घडलेल्या खुनाच्या दोन घटनांनी शहर हादरुन गेले आहे. फेब्रुवारी २०१७ ला होणाऱ्या निवडणुकीपूर्वी त्यात आणखी वाढ होणार याचे संकेत या घटनांमुळे मिळू लागले आहेत. पोलिसांपुढे कायदा, सुव्यवस्था अबाधित राखण्याचे मोठे आव्हान आहे. ऐन दिवाळीत एका आठवड्यात खुनाच्या दोन घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडल्या. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. शनिवारी भोसरीत विकास माळी या तरूणाचा खून झाला. स्थानिक गुंडांच्या वर्चस्ववादातुन हा प्रकार घडला असल्याचे कारण पुढे आले आहे. या खून प्रकरणातील मुख्य आरोपीसह अन्य पाच आरोपींना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. २०१४ मध्ये अक्षय काटे याचा खून झाला होता. या खुनाचा बदला घेण्यासाठी विकासचा खून करण्यात आला. विकासच्या खूनप्रकरणातील मुख्य आरोपीसह अन्य आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अक्षय काटे याचा खून ज्या टोळीने केला होता, त्या टोळीत विकास माळी याचाही सहभाग होता. अक्षयच्या खुनाचा बदला घेण्याच्या उद्देशाने विकासला धारदार शस्त्राचे वार करून संपविण्यात आले. अक्षयच्या खुनाचा बदला घेण्यासाठी विकासचा खून झाला. हे पुढे कारण पुढे आले असले तरी दोन टोळ्यांमधील वर्चस्ववाद नेमका काय आहे? असा मुद्दाही उपस्थित झाला. ‘मसल पॉवर’साठी राजकीय मंडळी अशा स्थानिक गुंडांच्या टोळयांची मदत घेत असते. हे सर्वश्रुत आहे. अवघ्या चार महिन्यांवर निवडणूक येऊन ठेपली आहे. निवडणूक एनकॅश करण्याचा जो तो प्रयत्न करत आहे. निवडणुकीत आर्थिक लाभ कसा उठवायचा याचाच अनेकजण त्यांच्या पातळीवर विचार करत आहेत. तयारीसुद्धा सुरू आहे. त्यासगुन्हेगारही अपवाद नाहीत. राजकीय मंडळींना मदत करण्याच्या उद्देशाचे त्यांचेही प्रस्ताव दाखल होऊ लागले आहेत. त्यातून स्थानिक गुंडांमध्ये वर्चस्व वाद उफाळून येऊ लागला आहे.(प्रतिनिधी)> भोसरीतील खुनाच्या घटनेला चार दिवसांचा अवधी उलटला नाही, तोच पिंपरीत अमर इंगवले या तरुणाचा खून झाला. चोरी, घरफोड्या अशा गुन्हेगारी घटना कमी होऊन खून, हाणामारीच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. दहशत माजविण्याचे हे प्रकार असून महापालिका निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपल्यामुळे घडू लागले आहेत. वर्ष, दोन वर्षासाठी तडीपार केलेले गुंड आदेशाचा भंग करून शहरात वावरताना आढळून येऊ लागले आहेत. काही राजकारण्यांची त्यांना फूस असून साम, दाम, दंड, भेद या तंत्रांचा अवलंब करण्याचा उद्देश असलेल्या राजकारण्यांकडून अशा प्रकारांना बळ दिले जात आहे.