शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरांनीच केले रक्तदान

By admin | Updated: May 27, 2017 16:29 IST

एखाद्या रुग्णावर उपचार सुरु असताना त्याने उपचारास प्रतिसाद दिला नाही अन् रुग्ण दगावल्यास नातेवाईकांडून डॉक्टरांना मारहाण किंवा शिवीगाळ केली जाते.

ऑनलाइन लोकमत
हिंगोली, दि. 27 -  एखाद्या रुग्णावर उपचार सुरु असताना त्याने उपचारास प्रतिसाद दिला नाही अन् रुग्ण दगावल्यास नातेवाईकांडून डॉक्टरांना मारहाण किंवा शिवीगाळ केली जाते. परंतु रुग्णासोबत कोणीही नसताना त्याचे पालक बनून त्याची सुश्रूषा केल्याचे ऐकल्यावर पटकण विश्वास बसणार नाही. मात्र हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयात अशा एका रुग्णास डॉक्टरांनी जीवदान दिले.  
हिंगोली तालुक्यातील खेर्डा येथील अंबुबाई व नवसाजी खंदारे हे पती-पत्नी वसमत तालुक्यातील पोखर्णी येथे शेती कामाकरिता वास्तव्यास आहेत. परंतु २८ मे रोजी नांदुरा येथे अंबुबाई खंदारे यांच्या भाच्याचा विवाह सोहळा असल्याने, अंबुबाई नवसाची खंदारे हे दोघे पूर्णा येथून २६ मे रोजी रात्री १२ च्या रेल्वेने नांदुरामार्गे निघाले होते.  मात्र नांदुरा रेल्वेस्थानक समजून जूनूना रेल्वेस्थानकावर अंबुबाई उतरण्याचा प्रयत्न करत होत्या. 
त्यांच्या पतीने त्यांना थांबविण्याचा खूप प्रयत्न केला. तोपर्यंत त्यांचा पाय प्लॅटफॉर्मच्या खाली गेला आणि त्या प्लॅटफॉर्मवर आदळल्या. परंतु त्यांचा पाय रेल्वेच्या पायºयांमध्ये अडकल्याने मोडला. तर रेल्वे अन् त्यात त्यांचे पतीही समोर गेले. अंबुबार्इंनी जोरजोरात आरडा-ओरडा केला काही ग्रामस्थ त्यांच्यावजवळ धावून गेल. वसमत येथील १०८ या टोल फ्री क्रमांकाच्या रुग्णवाहिकेस संपर्क साधला. 
काही वेळातच ती घटनास्थळी पोहोचली. रुग्णवाहिकेसोबत असलेले डॉ. रवि करवंदे यांनी रुग्णवाहिकेत उपचार करत जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी पहाटे ३. ३० च्या सुमारास तिला दाखल केले. विशेष म्हणजे महिलेसोबत कोणीही नव्हते. दरम्यान, येथे डीएमओ असलेले डॉ. अग्रवाल व आपतकालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. इनायतुल्ला खान यांनी सदर महिलेवर प्राथमिक उपचार केले. सकाळी महिलेची तपासणी केली असता महिलेचा पाय पूर्ण निकामी झाल्याने तो कापल्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. 
लागलीच उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी कसलाही विचार न करता थेट शस्त्रक्रियेची तयारी केली. शस्त्रक्रिया यशस्वी करुन महिलेचा उजवा पाय काढून टाकण्यात आला. महिलेच्या सांगण्यावरून खर्डा येथील काही नातेवाईकांशी डॉक्टरांनी मोबाईलवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता. दुपारी दोनच्या सुमारास महिलेचा भाचा तेथे आला. 
डॉक्टरांनी स्वत: केले रक्तदान 
महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे पायातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. त्यामुळे महिलेला रक्ताची नितांत गरज होती. परंतु जिल्हासामान्य रुग्णालयातील रक्त पेढीमध्ये एबी ग्रुपचे रक्तच उपलब्ध नसल्याने, या ग्रुपचे रक्त मिळविण्यासाठी डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले. एवढेच काय तर विविध व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवहरी एबी ग्रुपचे रक्त असणाºयांना रक्तदान करण्यासाठी आवाहन केले होते. परंतु बराच वेळ प्रतीक्षा करुनही रक्त मिळत नसल्याने आपातकालीन सेवेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ईनायतुल्ला खान यांनी स्वत: रक्तदान करुन सदर महिलेला रक्त दिले. एकंदर सर्व डॉक्टरांनीच सांघिकपणे केलेल्या कार्यामुळे ‘देव तारी, त्याला कोण मारी’ या उक्तीचा प्रत्यय आला.