शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
2
“सार्वजनिक गणेशोत्सव आता ‘महाराष्ट्र राज्य महोत्सव’”; आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा
3
मोठ्या बॅटरीचे काय सांगता? वनप्लस नॉर्ड सीई ५ मध्ये मोठी अपग्रेड मिळालीय, पण कॅमेरा...
4
१.१० रुपयांवरून वर्षभरात ८,३८५% वाढून ९३,९४ वर पोहोचला हा शेअर; आजही लागलं अपर सर्किट
5
चांगूर बाबाचे दुबईपर्यंत नेटवर्क; महाराष्ट्र-युपीतील 1500 हिंदू तरुणींचे धर्मांतरण, चौकशीत खुलासा
6
IND vs ENG: लॉर्ड्स कसोटीपूर्वी इंग्लंडचा मोठा डाव, खेळपट्टीच बदलून टाकली, कुणाला मिळणार मदत?
7
आयपीएलमध्ये तिकीट घोटाळा, सीआयडीची मोठी कारवाई, हैदराबाद क्रिकेट संघटेनेच्या अध्यक्षांना अटक   
8
'पालिका प्लॅन' ON ! सांगली, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
9
दे दणादण! काँग्रेस कार्यकर्ते आपापसात भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; माजी आमदार जखमी
10
Glen Industries IPO च्या GMP मध्ये तुफान तेजी; आतापर्यंत ४३ पट झाला सबक्राइब, पाहा डिटेल्स
11
Guru Purnima 2025: गुरु पौर्णिमेला सायंकाळी 'हा' उपाय करा; अडलेली कामे मार्गी लागतील!
12
पुन्हा प्रेमात पडला आदित्य रॉय कपूर? अनन्या पांडेनंतर आता 'या' मॉडेलसोबत डेटिंगच्या चर्चा
13
संजय शिरसाट यांना आयकर नोटीस; विट्स हॉटेल लिलावाच्या चौकशी आदेशानंतर दुसरा धक्का
14
उत्तरेत सुरू झाला, महाराष्ट्रात श्रावण कधीपासून? पाहा, यंदा किती श्रावणी सोमवार अन् महत्त्व
15
जुना मित्र पुन्हा कामाला आला! रशिया १० लाख भारतीयांना रोजगार देणार, कधीपर्यंत अर्ज करता येणार?
16
"मुंबई, महाराष्ट्रात मराठी माणसाला घर नाकारलं तर..."; मंत्री शंभूराज देसाईंची महत्त्वाची घोषणा
17
Airtel Recharge Plan: २०० रुपयांपेक्षा स्वस्तातील एअरटेलचे हे प्लान्स आहेत बेस्ट, WiFi असलेल्या लोकांना होणार मोठा फायदा
18
परदेशातून आल्यावर थरूर यांचा काँग्रेसवरच आणीबाणी बॉम्ब; लेखात इंदिरा गांधींवर जबर टीका, म्हणाले... 
19
Sindoor Bridge: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंदूर उड्डाणपुलाचे उद्घाटन
20
एका शब्दावरून निवडणूक आयोग अडकला, सर्वोच्च न्यायालयात मतदार पुनरावलोकनावरील सुनावणीवेळी झाली कोंडी

गोव्यात लोकशाहीचा खून - उद्धव ठाकरे

By admin | Updated: March 15, 2017 08:48 IST

सामानातील लेखात शिवसेनेकडून पुन्हा एकदा भाजापाला टार्गेट केले आहे. यावेळी त्यांनी गोवा आणि केंद्रातील सरकारवर टीका केली

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 15 - मुंबई महानगरपालिका निवडणूका जाहिर झाल्यानंतर शिवसेने भाजपाशी युती तोडत एकला चलो रे चा नारा लगवला होता. मुंबईमध्ये जागावाटपावरुन दोन्ही मित्रपक्षामध्ये दुरावा निर्माण झाला होता. भाजपाला 40 जागाही निवडणून येणार नाहीत अशा तोऱ्यात शिवसेना होती. महापालिका निवडणूकीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाने न भूतो न भविष्यती यश मिळवत शिवसनेच्या अडचणी वाढवल्या. भाजपामुळे शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळवता आले नाही. याचं वेळी फडणवीस यांनी सरकार वाचवण्यासाठी बिनविरोध पाठिंबा देण्याचा निर्णय घेतं वाद शमवण्याचा प्रयत्न केला. पण भाजपाने शिवसेनेला डिवचल्यामुळे शांत राहिल ती कसली शिवसेना. सध्या सुरु असलेलं अधिवेशनासह, कारभारावर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या शिवसेनेने वारंवार भाजपावर टीकास्त्र सोडले. भाजपाला धडा शिकविण्याच्या हव्यासातून शिवसेनेना गोव्यातील राजकीय मैदानात उतरला व त्याने लज्जास्पद कामगिरी बजावली. गोव्यामध्ये शिवसेनेचे तीन उमेदवार उभे होते. या तीघांना मिळून गोव्यात फक्त 750 मते मिळाली आहेत. वास्तविक शिवसेनेने ही निवडणूक का लढविली, हाच मुळी एक गहन प्रश्न आहे. शिवसनेचे गोव्यात अस्तित्वच नाही. गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रीकर यांनी मंगळवारी चौथ्यांदा शपथ घेतली. गोव्यातील शिवसेनेच्या अवस्थेमुळे सोशल मीडियावर ते चर्चेचा विषय ठरले आहेत. आजच्या सामानातील लेखात शिवसेनेकडून पुन्हा एकदा भाजापाला टार्गेट केले आहे. यावेळी त्यांनी गोवा आणि केंद्रातील सरकारवर घनाघाती टीका केली. शिवसेनेची अवस्था मुंबई टू गोवा या चित्रपटातील विनोदासारखीच झाली म्हटल्यास हरकत नाही.

(गोव्यात शिवसेनेला मिळाली अवघी 750 मत, डिपॉझिटही जप्त)

शिवसेना मुखपत्र सामनातून गोव्यातील सत्ता कराणावर तोफ डागली आहे. सत्तेसाठी गोव्यात जी राजकीय धुळवड खेळली गेली तिला लोकशाहीचा खून याशिवाय वेगळे काही म्हणता येणार नाही. अर्थात, लोकशाहीचा असा खून गोव्यात अनेकदा झाला आहे. त्यात आणखी एका खुनाची भर पडली. खून पचवायची शक्ती आमच्या लोकशाहीला मिळो. अशी टीका सामनामधून भाजपावर करण्यात आली आहे. काँग्रेसच्या तुलनेत कमी जागा मिळवूनही गोव्यातील सत्तास्पर्धेत भाजपाने तूर्त तरी आघाडी घेतली आहे. अर्थात त्यासाठी गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना केंद्रातील संरक्षणमंत्रीपद सोडून पुन्हा गोव्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री होण्याची वेळ आली आहे. ज्या पाच राज्यात निवडणुका झाल्या त्यात गोवा हे सर्वात छोटे राज्य, पण तेथे झालेली राजकीय उलथापालथ मोठीच म्हणावी लागेल. सामनातील महत्वाचे मुद्दे - गोव्यातील निकाल पूर्णपणे भाजपाच्या विरोधात गेले आहेत. गोव्याचा भौगोलिक आकार उत्तर प्रदेशच्या एखाद्या जिल्हय़ापेक्षाही लहान असावा. - सत्ताधारी भाजपला जनतेने नाकारले व काँग्रेसला 17 जागा देऊन मोठा पक्ष म्हणून निवडून आणले. हा पराभव नक्की कोणाचा? - मुख्यमंत्री पार्सेकरांसह अर्धा डझन विद्यमान मंत्र्यांचा पराभव झाला- मनोहर पर्रीकर हे संरक्षणमंत्री म्हणून मोदी सरकारला ओझे झाले असावेत किंवा स्वतः मनोहर पर्रीकरांना दिल्लीपेक्षा गोवाच बरे असे वाटल्याने ते स्वतःच परतले आहेत- संरक्षणमंत्री असताना पर्रीकर यांचा मुक्काम सदासर्वकाळ गोव्यातच होता व गोव्यातून ते पाकिस्तानसारख्या देशाच्या दुश्मनास सुका दम भरीत होते. - सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर बहुमताची जुळवाजुळव करण्यासाठी ज्या वेगवान हालचाली कराव्या लागतात त्यात काँग्रेस मागे पडली- काँग्रेस सुस्त राहिली म्हणून भाजपविरोधात निवडून आलेले पक्ष भाजपच्याच घोडेबाजारात सामील झाले आणि बुधवारी मुख्यमंत्री पर्रीकर यांचा शपथविधीही पार पडला. - गोव्याच्या बाबतीत भाजपने काँग्रेस परंपरेचीच ह्यरीह्ण ओढली.