शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

ब्लड आॅन कॉल केवळ नावालाच !

By admin | Updated: August 1, 2016 17:42 IST

गरजू रुग्णांना वेळेवर आणि शासकीय शुल्कामध्ये रक्त उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाने जीवन अमृत सेवा (ब्लड आॅन कॉल) योजना ७ जानेवारी २0१४ पासून सुरू केली.

- नितीन गव्हाळे,
अकोला, दि.१ - गरजू रुग्णांना वेळेवर आणि शासकीय शुल्कामध्ये रक्त उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाने जीवन अमृत सेवा (ब्लड आॅन कॉल) योजना ७ जानेवारी २0१४ पासून सुरू केली. १0४ क्रमांकावर संपर्क साधून गरजु रूग्णांना एका तासाच्या आता रक्त मिळाले पाहिजे. असा या योजनेचा हेतू आहे. परंतु रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना ही सेवा जीवन अमृत सेवा नसून जीवन मृत सेवा असल्याचा अनुभव येत आहे.  एका रूग्णाच्या नातेवाईकाने १0४ क्रमांकावर कॉल करूनही त्यांना तीन दिवस रक्त मिळाले नाही. ब्लॅड आॅन कॉल योजना केवळ नावालाच असल्याचे या घटनेतून समोर आले आहे. 
अकोला तालुक्यातील खेकडी गावातील निकीता सुरेश मोरे या युवतीला आजारपणामुळे शहरातील खासगी रूग्णालयात भरती करण्यात आले. डॉक्टरांनी ती अशक्त असल्यामुळे तिला रक्त देण्यास सांगितले. नातेवाईकांनी रक्तासाठी ब्लड आॅन कॉलच्या १0४ क्रमांकावर संपर्क साधला आणि एबी पॉझिटिव्ह रक्तगटाची मागणी केली. नातेवाईकांना रक्त लवकरच पाठविण्यात येईल. असे सांगण्यात आले. परंतु दोन दिवस उलटूनही रूग्णाला रक्त मिळाले नाही. अखेर नातेवाईकांनी खासगी रक्तपेढी रक्तपिशवी निकीताला रक्त चढविले. त्यामुळे शासनाने सुरू केलेली ही योजना गरजु रूग्णांना रक्त पुरवठा करण्यात अपयशी ठरली आहे. रूग्णांना वेळेवर रक्त मिळत नसेल तर या योजनेवर शासन कशासाठी लाखो रूपयांचा खर्च करीत आहे. रक्ताची बाटली रुग्णाचा जीव गेल्यावर मिळणार का? असा सवाल रूग्णांच्या नातेवाईकांकडून विचारला जात आहे. 
राज्य रक्त संक्रमण परिषदेने जीवन अमृत सेवा सुरू केली. त्यामध्ये १0४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क केल्यास तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील आवश्यक त्या गटाचे ठिकाणी रक्त उपलब्ध करून दिले जाते. दूरध्वनी केलेल्या परिसराच्या ४0 किलो मीटर परिघात रक्त उपलब्ध करून देण्याची ही योजना आहे.  मात्र, अलीकडे १0४ या क्रमांकावर अनेकदा संपर्क करून हा क्रमांक लागत नाही. कधी कधी हा संपर्क क्षेत्राबाहेर असल्याचे सांगितले जाते. काहींना आलेल्या अनुभवानुसार दूरध्वनी उचलल्यानंतर रक्त मागणीची माहिती घेतली जाते. पुढे काहीच कार्यवाही होत नाही. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना तातडीने रक्त उपलब्ध करून देणारी ही योजना नावालाच असल्याचे चित्र आहे. आरोग्य विभागाच्या अनेक चांगल्या योजना आहेत. मात्र, केवळ चांगल्या प्रकारे न चालविल्याने त्यांचा लाभ रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना घेता येत नसल्याचे चित्र आहे.