शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

नोटाबंदीमुळे लोटाबंदीला अडथळा

By admin | Updated: December 25, 2016 17:42 IST

मार्च २०१७ पर्यंत ग्रामीण भागातील ३५४ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

ऑनलाइन लोकमत/हर्षनंदन वाघबुलडाणा, दि. 25 - जिल्हा परिषदेच्या स्वच्छता अभियानांतर्गंत मार्च २०१७ पर्यंत ग्रामीण भागातील ३५४ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र नोटाबंदीमुळे शौचालय बांधकाम करणारी यंत्रणा अडचणीत आली असून उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांची कसरत होत आहे. जिल्ह्यातील ८६८ ग्रामपंचायतीपैकी १५२ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत. उर्वरित ग्रामपंचायतीपैकी ३५४ ग्रामपंचयती हागणदारीमुक्त करण्यासाठी मार्च २०१७ पर्यंत उद्दिष्ठ ठेवण्यात आले आहे. तर शासनाने ३१ डिसेंबर नंतर उघड्यावर शौचालयास जाणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याचेआदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशनचे अधिकारी व कर्मचारी उद्दिष्ठ पूर्ण करण्यासाठी कसरत होत आहे. लाभार्थ्यास घरी शौचालय बांधण्यासाठी शासनाकडून प्रत्येकी १२ हजार रूपये अनुदान देण्यात येत आहे. मात्र नोटाबंदीमुळे शौचालय लाभार्थ्यांस बँक खात्यातून पैसे काढणे कठीण झाले आहे. शौचालय मंजूर झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायततर्फे शौचालय लाभार्थ्यांस १२ हजाराचा धनादेश देण्यात येत आहे. मात्र सदर धनादेश बँकेत जमा करण्याठी लाभार्थ्यांला शेतीचे कामे प्रलंबित ठेवून बँकेत धनादेश जमा करीत आहेत. मात्र अनेक बँकेकडून नोटाबंदीमुळे कामेवाढल्याने धनादेश वटविण्याचे काम चार पाच दिवस विलंब होत आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होत नाहीत. तर  चार-पाच दिवसानंतर बँक खात्यात धनादेश जमा झाल्यानंतही लाभार्थ्याच्या हातात पूर्ण पैसे येत नसल्यामुळे शौचालय बांधकाम बंद ठेवण्यात येत असल्याचे चित्र ग्रामीण भागत दिसत आहे.शौचालय बांधकामाला पैशाची सुट द्यावीजिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशनअंतर्गंत मार्च २०१७ पर्यंत असलेले उद्दिष्ठ पूर्ण करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी जिल्हा परिषदेच्या मुकाअ दिपा मुधोळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करीत आहेत. मात्र नोटाबंदीमुळे अनेक गावात वेगात असलेली शौचालयाची कामे खोळंबली आहेत. अनेक मजुरांना मजुरी देण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे शौचालय बांधकामलाभार्थींना अनुदानाची रक्कम रोख स्वरूपात बँकेकडून मिळावी, अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.