शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सरकारची धन्यता...

By admin | Updated: May 3, 2015 00:16 IST

पुरोगामी महाराष्ट्राला अनेक हत्याकांडं व अत्याचारांचाही इतिहास आहे. यासाठी त्या त्या वेळेच्या सरकारने घोषणाबाजी करीत कडक कायदे व

अमर मोहिते - 

पुरोगामी महाराष्ट्राला अनेक हत्याकांडं व अत्याचारांचाही इतिहास आहे. यासाठी त्या त्या वेळेच्या सरकारने घोषणाबाजी करीत कडक कायदे व नियमांची खैरात केली. प्रत्यक्षात सरकारच्या कडक कायद्यांचे भय काही काळच टिकू शकले. वारंवार सरकार कायदे टिकवण्यात अपयशी ठरते. तरीही कडक कायद्यांची ठोसपणे व कायमस्वरूपी अंमलबजावणी करण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा अद्याप तयार झालेली नाही.सध्या महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी हा चर्चेचा केंद्रबिंदू आहे. गेल्या दोन महिन्यांत पोलिसांनी तर कारवाईचा धडका असा सुरू केला आहे, की जणू याचे व्यापारी गंभीर गुन्ह्यातील आरोपीच आहेत. महत्त्वाचे म्हणजे हा कायदा लागू झाल्यानंतर याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवून पोलिसांनीही फडणवीस सरकारला खूश केले व स्वत:ची पाठही थोपटून घेतली. न्यायालयानेही या बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करा, असे फर्मान जारी केले. त्यामुळे सरकारची कॉलर अधिकच टाइट झाली. पोलिसांना तर याने कमालीचे बळ मिळाले. पण हे सर्व किती काळ टिकणार, याविषयी ठोस असे उत्तर कोणीच दिलेले नाही. या बंदीची सुरुवात करून फडणवीस सरकारने एका विशिष्ट वर्गाला खूश केले जात असल्याचा आरोप सर्व स्तरांतून झाला. विशिष्ट रंगाच्या काही सामाजिक संघटनांनीही या बंदीचे स्वागत केले. एवढेच काय तर गायीचे महत्त्व महाभारतात कसे विषद करण्यात आले आहे, हेही न्यायालयाचा पटवून देण्याचा प्रयत्न काही सामाजिक संघटनांनी केला. हा हट्टाहास नेमका कशासाठी, की केवळ स्वत:ला प्रसिद्धीझोतात आणण्यासाठी या सामाजिक संघटना प्रयत्न करीत आहेत, या प्रश्नाचे उत्तर त्या संघटनाच देऊ शकतात. कारण एखादी घटना किंवा जनहितार्थ निर्णय झाले, की सामाजिक संघटना तत्काळ आपली भूमिका जाहिर करतात़ तसे बॅनरही लावायला विसरत नाहीत. पण पुढे जाऊन अशा सामाजिक संघटनांना आपण भूतकाळात काय केले होते याची आठवणही होत नाही. निव्वळ प्रसिद्धी या एकाच हेतूने अशा संघटना एखाद्या प्रश्नावर मतप्रदर्शन करतात. त्यामुळे कायद्याची कडक अंमलबजावणी दीर्घकाळ टिकणे ही बाब अशक्यच म्हणावी लागेल. तसेच या देशातील कर्तव्यदक्ष नागरिकही अन्याय व अत्याचार झाला की हातात मेणबत्ती घेऊन मोर्चे काढतो. पण कायदे व नियमांचे पालन करताना किंवा त्यांची कायमस्वरूपी अंमलबजावणी होण्याची कोणीही धडपड करताना दिसत नाहीत. त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्रात जेथे दलित व महिला अत्याचार अजून कमी झालेले नाहीत तेथे गोवंश हत्याबंदी कशी टिकेल, हे येणारा काळच सांगेल.