शहरं
Join us  
Trending Stories
1
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
2
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
3
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
4
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
5
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
6
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
7
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
8
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
9
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
10
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
11
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
12
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
13
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
14
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
15
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
16
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
17
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
18
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
19
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
20
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?

सरकारची धन्यता...

By admin | Updated: May 3, 2015 00:16 IST

पुरोगामी महाराष्ट्राला अनेक हत्याकांडं व अत्याचारांचाही इतिहास आहे. यासाठी त्या त्या वेळेच्या सरकारने घोषणाबाजी करीत कडक कायदे व

अमर मोहिते - 

पुरोगामी महाराष्ट्राला अनेक हत्याकांडं व अत्याचारांचाही इतिहास आहे. यासाठी त्या त्या वेळेच्या सरकारने घोषणाबाजी करीत कडक कायदे व नियमांची खैरात केली. प्रत्यक्षात सरकारच्या कडक कायद्यांचे भय काही काळच टिकू शकले. वारंवार सरकार कायदे टिकवण्यात अपयशी ठरते. तरीही कडक कायद्यांची ठोसपणे व कायमस्वरूपी अंमलबजावणी करण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा अद्याप तयार झालेली नाही.सध्या महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी हा चर्चेचा केंद्रबिंदू आहे. गेल्या दोन महिन्यांत पोलिसांनी तर कारवाईचा धडका असा सुरू केला आहे, की जणू याचे व्यापारी गंभीर गुन्ह्यातील आरोपीच आहेत. महत्त्वाचे म्हणजे हा कायदा लागू झाल्यानंतर याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवून पोलिसांनीही फडणवीस सरकारला खूश केले व स्वत:ची पाठही थोपटून घेतली. न्यायालयानेही या बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करा, असे फर्मान जारी केले. त्यामुळे सरकारची कॉलर अधिकच टाइट झाली. पोलिसांना तर याने कमालीचे बळ मिळाले. पण हे सर्व किती काळ टिकणार, याविषयी ठोस असे उत्तर कोणीच दिलेले नाही. या बंदीची सुरुवात करून फडणवीस सरकारने एका विशिष्ट वर्गाला खूश केले जात असल्याचा आरोप सर्व स्तरांतून झाला. विशिष्ट रंगाच्या काही सामाजिक संघटनांनीही या बंदीचे स्वागत केले. एवढेच काय तर गायीचे महत्त्व महाभारतात कसे विषद करण्यात आले आहे, हेही न्यायालयाचा पटवून देण्याचा प्रयत्न काही सामाजिक संघटनांनी केला. हा हट्टाहास नेमका कशासाठी, की केवळ स्वत:ला प्रसिद्धीझोतात आणण्यासाठी या सामाजिक संघटना प्रयत्न करीत आहेत, या प्रश्नाचे उत्तर त्या संघटनाच देऊ शकतात. कारण एखादी घटना किंवा जनहितार्थ निर्णय झाले, की सामाजिक संघटना तत्काळ आपली भूमिका जाहिर करतात़ तसे बॅनरही लावायला विसरत नाहीत. पण पुढे जाऊन अशा सामाजिक संघटनांना आपण भूतकाळात काय केले होते याची आठवणही होत नाही. निव्वळ प्रसिद्धी या एकाच हेतूने अशा संघटना एखाद्या प्रश्नावर मतप्रदर्शन करतात. त्यामुळे कायद्याची कडक अंमलबजावणी दीर्घकाळ टिकणे ही बाब अशक्यच म्हणावी लागेल. तसेच या देशातील कर्तव्यदक्ष नागरिकही अन्याय व अत्याचार झाला की हातात मेणबत्ती घेऊन मोर्चे काढतो. पण कायदे व नियमांचे पालन करताना किंवा त्यांची कायमस्वरूपी अंमलबजावणी होण्याची कोणीही धडपड करताना दिसत नाहीत. त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्रात जेथे दलित व महिला अत्याचार अजून कमी झालेले नाहीत तेथे गोवंश हत्याबंदी कशी टिकेल, हे येणारा काळच सांगेल.