शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

प्रजासत्ताक दिनी नक्षलवाद्यांनी जिल्हा परिषद शाळेवर फडकविला काळा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2017 20:00 IST

संतोष बुकावन/प्रकाश वलथरे ऑनलाइन लोकमत गोंदिया, दि. 26 : गोंदिया जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील राजोली येथे ...

संतोष बुकावन/प्रकाश वलथरे

ऑनलाइन लोकमतगोंदिया, दि. 26 : गोंदिया जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील राजोली येथे ऐन प्रजासत्ताक दिनी नक्षलवाद्यांनी तिरंगी ध्वजाच्या स्तंभावर काळा झेंडा फडकविला. एवढेच नाही तर शासनाला धोरणाविरूद्ध आवाहन करणारे बॅनर आणि हस्तलिखित पत्रके भरनोली ग्रामपंचायत व शाळेसमोरील लावली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. पोलीस यंत्रणेने संपूर्ण जागेची बॉम्ब शोधक व नाशक पथकामार्फत तपासणी केल्यानंतर काळा झेंडा उतरवून दुपारी १२.३५ वाजता तिरंगा ध्वज फडकविला.

हे कृत्य कोरची दलमच्या १० ते १२ नक्षल्यांनी येऊन मध्यरात्रीनंतर २ ते २.३० च्या सुमारास केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला. सकाळी ध्वजारोहण सोहळ्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक आर.एम.गहाणे व शिक्षकवृंद शाळेत पोहोचल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. सकाळी ६.३० च्या सुमारास शाळेचे परिचर मनोहर चौधरी पोहोचले. त्यांना शाळेच्या प्रवेशद्वारावर कागदी पत्रके व बाजुच्या परिसरात कापडी फलक लावलेला दिसला. काही वेळातच मुख्याध्यापक आल्यानंतर त्यांचे लक्ष ध्वजस्तंभाकडे गेले तर तिथे काळा झेंडा लागला असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी लगेच या प्रकाराची माहिती भ्रमणध्वनीद्वारे केशोरी पोलीस ठाण्यात दिली.

हा परिसर आधीपासूनच नक्षलदृष्ट्या संवेदनशिल असल्यामुळे शाळेपासून अवघ्या दोन किलोमीटरवर भरनोली येथे सशस्त्र पोलीस दूरकेंद्र (आर्म्स आऊट पोस्ट) आहे. मुख्याध्यापकांनी दिलेल्या माहितीवरून केशोरीचे ठाणेदार एस.एस.कुंभरे राजोलीत पोहोचले. तत्पूर्वी भरनोलीच्या दूरकेंद्रातील अधिकारी व जवान घटनास्थळी दाखल झाले होते. खबरदारी म्हणून पोलीस पोहोचल्याशिवाय काळा ध्वज उतरवू नका व ध्वज परिसरात विद्यार्थ्यांना जाऊ न देण्याची सूचना पोलिसांनी मुख्याध्यापकांना दिली. दरम्यान गोंदियावरून बॉम्ब शोध व नाशक पथक दुपारी १२ च्या सुमारास राजोलीत पोहोचले. मात्र त्यांच्या तपासणीत कोणतीही स्फोटक वस्तू जमिनीत किंवा ध्वजस्तंभालगत पेरून ठेवल्याचे आढळले नाही. त्यानंतर काळा झेंडा उतरवून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रेशीम झोडे यांच्या हस्ते दुपारी १२.३५ च्या सुमारास विधीवत पुजन करून गावकऱ्यांच्या उपस्थितीत तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. मात्र दिवसभर गावकऱ्यांमध्ये भितीयुक्त वातावरण होते.

नक्षल्यांचे काळा दिवसाचे आवाहननक्षल्यांनी ही कृत्य करताना लावलेले फलक व पत्रकांमध्ये केंद्र सरकारवरला टार्गेट केले. मोदी सरकार संविधानाला हटविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याला विरोध करा. धर्मनिरपेक्षतेच्या नावावर देशाला हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी इतर धर्मियांवर हल्ला चढविण्याचे षडयंत्र आहे. या प्रकाराला काळा दिवस म्हणून पाळा. हे सर्वसामान्य जनतेचे प्रजासत्ताक नाही. जनतेच्या खऱ्या जनवादी राजसत्तेसाठी सुरू असलेल्या जनयुद्धात सामील होणे हाच एकमेव मार्ग आहे. खोट्या प्रजासत्ताकाला विरोध करा, असा मजकूर लाल शाईत लिहिलेला आहे. पत्रकात कोरची एरिया कमिटी, भाकपा माओवादी असे खाली नमूद आहे.https://www.dailymotion.com/video/x844psm