शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

प्रजासत्ताक दिनी नक्षलवाद्यांनी जिल्हा परिषद शाळेवर फडकविला काळा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2017 20:00 IST

संतोष बुकावन/प्रकाश वलथरे ऑनलाइन लोकमत गोंदिया, दि. 26 : गोंदिया जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील राजोली येथे ...

संतोष बुकावन/प्रकाश वलथरे

ऑनलाइन लोकमतगोंदिया, दि. 26 : गोंदिया जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील राजोली येथे ऐन प्रजासत्ताक दिनी नक्षलवाद्यांनी तिरंगी ध्वजाच्या स्तंभावर काळा झेंडा फडकविला. एवढेच नाही तर शासनाला धोरणाविरूद्ध आवाहन करणारे बॅनर आणि हस्तलिखित पत्रके भरनोली ग्रामपंचायत व शाळेसमोरील लावली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. पोलीस यंत्रणेने संपूर्ण जागेची बॉम्ब शोधक व नाशक पथकामार्फत तपासणी केल्यानंतर काळा झेंडा उतरवून दुपारी १२.३५ वाजता तिरंगा ध्वज फडकविला.

हे कृत्य कोरची दलमच्या १० ते १२ नक्षल्यांनी येऊन मध्यरात्रीनंतर २ ते २.३० च्या सुमारास केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला. सकाळी ध्वजारोहण सोहळ्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक आर.एम.गहाणे व शिक्षकवृंद शाळेत पोहोचल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. सकाळी ६.३० च्या सुमारास शाळेचे परिचर मनोहर चौधरी पोहोचले. त्यांना शाळेच्या प्रवेशद्वारावर कागदी पत्रके व बाजुच्या परिसरात कापडी फलक लावलेला दिसला. काही वेळातच मुख्याध्यापक आल्यानंतर त्यांचे लक्ष ध्वजस्तंभाकडे गेले तर तिथे काळा झेंडा लागला असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी लगेच या प्रकाराची माहिती भ्रमणध्वनीद्वारे केशोरी पोलीस ठाण्यात दिली.

हा परिसर आधीपासूनच नक्षलदृष्ट्या संवेदनशिल असल्यामुळे शाळेपासून अवघ्या दोन किलोमीटरवर भरनोली येथे सशस्त्र पोलीस दूरकेंद्र (आर्म्स आऊट पोस्ट) आहे. मुख्याध्यापकांनी दिलेल्या माहितीवरून केशोरीचे ठाणेदार एस.एस.कुंभरे राजोलीत पोहोचले. तत्पूर्वी भरनोलीच्या दूरकेंद्रातील अधिकारी व जवान घटनास्थळी दाखल झाले होते. खबरदारी म्हणून पोलीस पोहोचल्याशिवाय काळा ध्वज उतरवू नका व ध्वज परिसरात विद्यार्थ्यांना जाऊ न देण्याची सूचना पोलिसांनी मुख्याध्यापकांना दिली. दरम्यान गोंदियावरून बॉम्ब शोध व नाशक पथक दुपारी १२ च्या सुमारास राजोलीत पोहोचले. मात्र त्यांच्या तपासणीत कोणतीही स्फोटक वस्तू जमिनीत किंवा ध्वजस्तंभालगत पेरून ठेवल्याचे आढळले नाही. त्यानंतर काळा झेंडा उतरवून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रेशीम झोडे यांच्या हस्ते दुपारी १२.३५ च्या सुमारास विधीवत पुजन करून गावकऱ्यांच्या उपस्थितीत तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. मात्र दिवसभर गावकऱ्यांमध्ये भितीयुक्त वातावरण होते.

नक्षल्यांचे काळा दिवसाचे आवाहननक्षल्यांनी ही कृत्य करताना लावलेले फलक व पत्रकांमध्ये केंद्र सरकारवरला टार्गेट केले. मोदी सरकार संविधानाला हटविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याला विरोध करा. धर्मनिरपेक्षतेच्या नावावर देशाला हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी इतर धर्मियांवर हल्ला चढविण्याचे षडयंत्र आहे. या प्रकाराला काळा दिवस म्हणून पाळा. हे सर्वसामान्य जनतेचे प्रजासत्ताक नाही. जनतेच्या खऱ्या जनवादी राजसत्तेसाठी सुरू असलेल्या जनयुद्धात सामील होणे हाच एकमेव मार्ग आहे. खोट्या प्रजासत्ताकाला विरोध करा, असा मजकूर लाल शाईत लिहिलेला आहे. पत्रकात कोरची एरिया कमिटी, भाकपा माओवादी असे खाली नमूद आहे.https://www.dailymotion.com/video/x844psm