शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

बीजेएस घेणार ‘त्यांचे’ पालकत्व

By admin | Updated: June 13, 2016 04:57 IST

बीड जिल्ह्यातील अनिता विष्णू देवकुळे या मातेने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपल्या तीनही मुलींसह स्वेच्छामरणाची परवानगी मागितली होती.

पुणे : बीड जिल्ह्यातील अनिता विष्णू देवकुळे या मातेने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपल्या तीनही मुलींसह स्वेच्छामरणाची परवानगी मागितली होती. तथापि, या मातेची तसेच तीन मुलींच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी भारतीय जैन संघटनेने (बीजेएस) उचलली असून, त्यासाठी त्यांना पुण्यात आणण्यात येणार आहे़ दिंद्रुड (ता. माजलगाव) गावाच्या रहिवाशी असलेल्या अनिता यांचे लग्न विष्णू देवकुळे (रा़ डोंबिवली पूर्व, मुंबई) यांच्याशी झाले. तिला तीन मुली झाल्या. मुलगा होत नाही म्हणून नवरा, सासू-सासरे यांनी अनिता व तिच्या मुलींचा मोठ्या प्रमाणावर छळ केला़ या पार्श्वभूमीवर अनिता यांनी ९ जून रोजी मुख्यमंत्र्यांकडे तिन्ही मुलींसह स्वेच्छामरणाची परवानगी मागितली होती.बीजेएसचे बीड येथील पदाधिकारी राजेंद्र मुनोत व गौतम खटोड यांनी अनिताच्या माहेरी भेट दिली असता अतिशय छोट्या घरात तीन मुलींसह अनिता राहत असल्याचे आढळले. डोंबिवलीवरून त्या नुकत्याच माहेरी आल्या होत्या. बीजेएसच्या कार्यकर्त्यांनी अनिताची आईव भावाशी चर्चा केली हीपरिस्थिती प्रत्यक्षात भयानक असल्याचे दिसून आले. घरातील सर्वांकडून आई व मुलींना होणाऱ्या त्रासाची माहिती या पदाधिकाऱ्यांनी घेतली. बीजेएसने या तीनही मुलींच्या इयत्ता पाचवी तेबारावीपर्यंतच्या शिक्षणाची तसेच अनिता यांच्या हाताला काम देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. बीडवरून सोमवारी त्या पुण्याकडे रवाना होतील. (प्रतिनिधी)बीजेएस सध्या महाराष्ट्रातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची ७०० मुले-मुली तसेच मेळघाट व ठाणे परिसरातील ३०० मुले अशा एकूण १ हजार विद्यार्थ्याना शिक्षणासाठी वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पात आणत आहे. त्यांच्या स्वागताचा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी होत आहे़ आपण स्वत: अनिता व मुलीशी बोललो़ त्यांना खरोखरच त्रास होत असून मदतीची गरज असल्याचे लक्षात आले़ त्यामुळे तिन्ही मुलींच्या पुढच्या शिक्षणाची व अनिता यांना काम देण्याची जबाबदारी बीजेएसने स्वीकारली आहे़ त्याला त्यांनी संमती दिली आहे़- शांतिलाल मुथा,संस्थापक, बीजेएस