शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
3
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
4
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
5
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
6
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
7
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
8
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
9
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
10
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
11
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
12
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
13
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
14
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
15
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
16
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
17
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
18
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
19
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
20
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप

हायकोर्टातही भाजपाचा विजय

By admin | Updated: December 5, 2014 03:57 IST

धडपड करून विधानसभेत आवाजी मतदानाने बहुमत सिद्ध करण्यात यशस्वी ठरलेल्या भाजप सरकारने उच्च न्यायालयातही विजयी पताका कायम ठेवली आहे़

मुंबई : धडपड करून विधानसभेत आवाजी मतदानाने बहुमत सिद्ध करण्यात यशस्वी ठरलेल्या भाजप सरकारने उच्च न्यायालयातही विजयी पताका कायम ठेवली आहे़ या आवाजी मतदानाविरोधातील दोन्ही याचिका न्यायालयाने गुरूवारी फेटाळून लावल्या़ त्यामुळे भाजप सरकारने सुटकेचा नि:श्वास सोडला ़भाजपच्या प्रस्तावावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आवाजी मतदानाला काँग्रेसचे आमदार नसीम खान व सामाजिक कार्यकर्ते राजकुमार अवस्थी यांनी स्वतंत्र याचिका दाखल करून न्यायालयात आव्हान दिले होते़ न्या़ व्ही़ एम़ कानडे व न्या़ अनुजा प्रभूदेसाई यांच्या खंडपीठासमोर याची सोमवारपासून सलग चार दिवस सुनावणी सुरू होती़ त्यात याचिकाकर्त्यांकडून अ‍ॅड़ अनिल अंतुरकर यांनी युक्तिवाद केला़ ते म्हणाले, आवाजी मतदान हे बेकायदा आहे़ याला प्रत्युत्तर देण्यासाठी सरकारकडून अ‍ॅडव्होकेट जनरल सुनील मनोहर, ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे व मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी फौजफाटा होता़ विधानसभा अध्यक्ष बागडे यांनी नियमानुसारच आवाजी मतदानाला परवानगी दिली होती़ त्यात बहुमत सिद्ध झाले़ त्यामुळे वैयक्तिक मतदानाचा प्रश्नच उद्भवत नाही़ आणि याचिकाकर्ते हे भाजप सरकार अल्पमतात असल्याचा दावा करून असून ते गैर असल्याचा युक्तिवाद अ‍ॅडव्होकेट जनरल मनोहर यांनी केला़ याचे अ‍ॅड़ अणे यांनी समर्थन केले़ अखेर विधानसभेतील मतदानासंदर्भात हस्तक्षेप करण्याचे अधिकार न्यायालयाला नसल्याचे स्पष्ट करत खंडपीठाने या याचिका फेटाळल्या़ (प्रतिनिधी)