शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

भाजपाचा सर्जिकल स्ट्राइक

By admin | Updated: January 7, 2017 03:45 IST

भारतीय जनता पार्टीने आपल्या राज्य कार्यकारिणीची बैठक येथे आयोजित करण्याचा हेतू स्वबळाचा नारा देणे हाच आहे.

ठाणे : भारतीय जनता पार्टीने आपल्या राज्य कार्यकारिणीची बैठक येथे आयोजित करण्याचा हेतू स्वबळाचा नारा देणे हाच आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिरून त्या पक्षाची राजकीय ताकद खच्ची करणे, हेच ध्येय भाजपाने निश्चित केले आहे, असे संकेत पक्षाच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दिले.पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेना रोज टीका करीत आहे. केंद्र सरकारचा घटक असतानाही मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यावर शिवसेना तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्यासोबत राष्ट्रपतींना भेटून विरोधी निवेदन देण्यास जाणार होती. केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी शिवसेनेला रोखले. केंद्रीय अर्थसंकल्प काही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांकरिता पुढे ढकलण्याचा आग्रह विरोधी पक्षांनी धरला आहे. त्या सुरात शिवसेनेने सूर मिसळला आहे. अर्थसंकल्पाचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाचा असून सत्तेत सहभागी शिवसेनेवर तो बंधनकारक असताना पक्षाने घेतलेल्या भूमिकेमुळे भाजपाचे नेते कमालीचे नाराज झाले आहेत.भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसांची बैठक शुक्रवारी दिल्लीत सुरू झाली. तत्पूर्वी राज्य कार्यकारिणी ठाण्यात घेण्याचा निर्णय जाहीर करण्यामागे आता शिवसेनेला मुंबई, ठाण्यात कोंडीत पकडणे, हा हेतू आहे. राम कापसे यांच्याकडून ठाणे काढून घेतल्यापासून भाजपाने ठाण्याकडे लक्ष दिले नाही. गेली कित्येक वर्षे २५ टक्के जागाही भाजपाने लढवल्या नाहीत. या वेळी सर्व ताकद लढवून सर्व जागा लढवण्याचा पक्षाचा प्रयत्न असणार आहे. शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्यास त्या पक्षाचा मतदार एकवटून त्वेषाने बाहेर पडून मतदान करतो, या शक्यतेकडे लक्ष वेधले असता ‘लांडगा आला रे आला’ या गोष्टीप्रमाणे या वेळी शिवसेनेला लाभ होणार नाही, असा भाजपाचा होरा आहे. (प्रतिनिधी)>प्रतिष्ठा पणाला लागेल ती शिवसेनेचीभाजपाच्या सूत्रांनी सांगितले की, या दोन्ही महापालिका निवडणुकीत शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. कारण, सत्ता त्यांची आहे. भाजपाच्या जेवढ्या जागा वाढतील, तेवढा आम्हाला फायदाच आहे. मुंबईत विधानसभा निवडणुकीत भाजपाची एक जागा शिवसेनेपेक्षा जास्त निवडून आली, तेव्हापासून शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला. भाजपाच्या स्वबळावर लढण्यामुळे शिवसेनेच्या जागा घटल्या व त्यांना युती करून सत्ता बनवणे अपरिहार्य झाले, तर शिवसेना अधिक परावलंबी होईल.