शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचा सर्जिकल स्ट्राइक

By admin | Updated: January 7, 2017 03:45 IST

भारतीय जनता पार्टीने आपल्या राज्य कार्यकारिणीची बैठक येथे आयोजित करण्याचा हेतू स्वबळाचा नारा देणे हाच आहे.

ठाणे : भारतीय जनता पार्टीने आपल्या राज्य कार्यकारिणीची बैठक येथे आयोजित करण्याचा हेतू स्वबळाचा नारा देणे हाच आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिरून त्या पक्षाची राजकीय ताकद खच्ची करणे, हेच ध्येय भाजपाने निश्चित केले आहे, असे संकेत पक्षाच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दिले.पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेना रोज टीका करीत आहे. केंद्र सरकारचा घटक असतानाही मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यावर शिवसेना तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्यासोबत राष्ट्रपतींना भेटून विरोधी निवेदन देण्यास जाणार होती. केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी शिवसेनेला रोखले. केंद्रीय अर्थसंकल्प काही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांकरिता पुढे ढकलण्याचा आग्रह विरोधी पक्षांनी धरला आहे. त्या सुरात शिवसेनेने सूर मिसळला आहे. अर्थसंकल्पाचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाचा असून सत्तेत सहभागी शिवसेनेवर तो बंधनकारक असताना पक्षाने घेतलेल्या भूमिकेमुळे भाजपाचे नेते कमालीचे नाराज झाले आहेत.भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसांची बैठक शुक्रवारी दिल्लीत सुरू झाली. तत्पूर्वी राज्य कार्यकारिणी ठाण्यात घेण्याचा निर्णय जाहीर करण्यामागे आता शिवसेनेला मुंबई, ठाण्यात कोंडीत पकडणे, हा हेतू आहे. राम कापसे यांच्याकडून ठाणे काढून घेतल्यापासून भाजपाने ठाण्याकडे लक्ष दिले नाही. गेली कित्येक वर्षे २५ टक्के जागाही भाजपाने लढवल्या नाहीत. या वेळी सर्व ताकद लढवून सर्व जागा लढवण्याचा पक्षाचा प्रयत्न असणार आहे. शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्यास त्या पक्षाचा मतदार एकवटून त्वेषाने बाहेर पडून मतदान करतो, या शक्यतेकडे लक्ष वेधले असता ‘लांडगा आला रे आला’ या गोष्टीप्रमाणे या वेळी शिवसेनेला लाभ होणार नाही, असा भाजपाचा होरा आहे. (प्रतिनिधी)>प्रतिष्ठा पणाला लागेल ती शिवसेनेचीभाजपाच्या सूत्रांनी सांगितले की, या दोन्ही महापालिका निवडणुकीत शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. कारण, सत्ता त्यांची आहे. भाजपाच्या जेवढ्या जागा वाढतील, तेवढा आम्हाला फायदाच आहे. मुंबईत विधानसभा निवडणुकीत भाजपाची एक जागा शिवसेनेपेक्षा जास्त निवडून आली, तेव्हापासून शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला. भाजपाच्या स्वबळावर लढण्यामुळे शिवसेनेच्या जागा घटल्या व त्यांना युती करून सत्ता बनवणे अपरिहार्य झाले, तर शिवसेना अधिक परावलंबी होईल.