शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

विश्वस्त निवडीवर भाजपाचाच आक्षेप

By admin | Updated: July 31, 2016 04:20 IST

साई संस्थानच्या विश्वस्त निवडीत उपाध्यक्षपद न मिळाल्याने शिवसेनेने विश्वस्त मंडळातून बाहेर पडण्याचा इशारा दिला

शिर्डी : साई संस्थानच्या विश्वस्त निवडीत उपाध्यक्षपद न मिळाल्याने शिवसेनेने विश्वस्त मंडळातून बाहेर पडण्याचा इशारा दिला असतानाच, आता जिल्हा व शहर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनीही विरोध दर्शविला आहे. सरकारने निष्ठावंतांना डावलून बाहेरून आलेल्यांची व हुजरेगिरी करणारांची नियुक्ती केल्याचा तसेच नव्या विश्वस्तांना काँग्रेसचेच चष्मे असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.राज्य व नंतर केंद्रीय पक्ष पातळीवर याची दाद मागू.अपयश आले तर पक्षासमोर भावना व्यक्त करण्यासाठी गावबंद, रास्ता रोको सारखे अन्य मार्ग हाताळू, असा इशारा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, जिल्हा सरचिटणीस नितीन कापसे, तालुकाध्यक्ष नंदू जेजुरकर, शहराध्यक्ष शिवाजी गोंदकर वसचिन शिंदे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला़दरम्यान, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचा व्यवस्थापन मंडळात समावेश नसल्याने काँग्रेसनेही तालुक्यात शुक्रवारपासून आंदोलने सुरू केली आहेत़ शहर व परिसराच्या विकासासाठी प्रसंगी काँग्रेस व शिवसेनेशी चर्चा करून सर्वपक्षीय लढा उभारू, अशा गर्भित इशाऱ्याचे संकेतही राजेंद्र गोंदकर यांनी यावेळी दिले़ देशात जनसंघाने पहिली ग्रामपंचायत शिर्डीत जिंकली होती़ याची आठवण करून देत स्थानिक निष्ठावंताना डावलून अथवा विश्वासात न घेता वाकचौरे, कोल्हे, तांबे सारख्यांची निवड केल्याबद्दल पक्षाच्या भूमिकेवर आक्षेप घेण्यात आला़ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत, आता जनतेच्या समोर कसे जाणार, राजकीय व्यवस्था म्हणून विश्वस्त मंडळ नेमले जातेय का? असा सवाल उपस्थित करत भाजपा पदाधिकाऱ्यांनी विश्वस्तांच्या निवडी कोणत्या निकषावर केल्या, यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले़ (प्रतिनिधी)>राज्य सरकारने शिर्डी संस्थानच्या विश्वस्त मंडळात आपला समावेश केला नाही, म्हणून आपण नाराज नाही. कुणाची नियुक्ती करायची हा सरकारचा अधिकार आहे. त्यांनी चांगले काम करावे, साईबाबांच्या नावाला गालबोट लागणार नाही, असा कारभार करावा ही अपेक्षा आहे. - राधाकृष्ण विखे, विरोधी पक्षनेता