शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे ‘मोदी एके मोदी’च

By admin | Updated: September 26, 2014 01:21 IST

लोकसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या घवघवीत यशानंतर भारतीय जनता पक्षाने तोच ‘फॉर्म्युला’ विधानसभेच्या प्रचारात वापरण्याचे ठरविले आहे. अगोदरपासूनच भाजपाकडून निवडणुकांमध्ये स्वतंत्र

राज्यातील एकाही नेत्याला ‘होर्डिंग’वर स्थान नाही : प्रचारात लोकसभेप्रमाणेच ‘फॉर्म्युला’योगेश पांडे - नागपूर लोकसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या घवघवीत यशानंतर भारतीय जनता पक्षाने तोच ‘फॉर्म्युला’ विधानसभेच्या प्रचारात वापरण्याचे ठरविले आहे. अगोदरपासूनच भाजपाकडून निवडणुकांमध्ये स्वतंत्र प्रचाराचे संकेत देण्यात आले होते व राज्याप्रमाणेच उपराजधानीत ठिकठिकाणी पक्षाचे ‘होर्डिंग्ज’ लागलेले दिसून आले. सर्व ‘होर्डिंग्ज’वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच ‘फोकस’ करण्यात आले असून राज्यातील एकाही भाजपा नेत्याला यात स्थान नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.गेल्या वर्षी झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुका व लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाच्या संपूर्ण प्रचाराचे केंद्रबिंदू नरेंद्र मोदी हेच होते. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपा-शिवसेनेची युती होणार की नाही यावर गेले काही आठवडे सातत्याने चर्चांना उधाण आले होते. परंतु युतीची प्रतीक्षा न करता भाजपाने प्रचाराला सुरुवात केली होती व उपराजधानीत ठिकठिकाणी नरेंद्र मोदी यांची मोठमोठी छायाचित्रे असलेली ‘होर्डिंग्ज’ लावण्यात आली. यात शिवसेनेचा कुठेही उल्लेख नसल्यान युतीबाबत शंका व्यक्त करण्यात येत होतीच. गुरुवारी शिवसेनेसोबतची २५ वर्षे जुनी युती तुटली अन् भाजपाच्या प्रचाराचा मार्ग मोकळा झाला.दरम्यान, भाजपातर्फे लावण्यात आलेल्या ‘होर्डिंग्ज’वर स्थानिकच नव्हे तर राज्यातील मोठ्या नेत्यांनादेखील स्थान देण्यात आलेले नाही. अगदी मुख्यमंत्रिपदासाठी नाव समोर करण्यात येत असलेले वजनदार नेतेदेखील ‘आऊट आॅफ फोकस’च आहेत. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकांत प्रादेशिक नेत्यांना ‘प्रोजेक्ट’ करण्यापेक्षा नरेंद्र मोदी यांच्याच नावावर भाजपा मत मागणार हे स्पष्ट झाले आहे. ‘फॉर्म्युला’ चालणार का?लोकसभा निवडणुकांत प्रचाराच्या वेळी ‘मोदी’ यांची लाटच निर्माण झाली होती. परंतु लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या परिस्थितीत बराच फरक असल्याचे मत राजकीय क्षेत्रातील जाणकार व्यक्त करीत आहेत. लोकसभेदरम्यान राष्ट्रीय मुद्यांवर जास्त भर देण्यात आला होता. परंतु विधानसभा निवडणुकांदरम्यान स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देणे जास्त महत्त्वाचे ठरते. शिवाय जातीची समीकरणे व गटातटाचे राजकारण यालादेखील यात महत्त्व असते. अशा स्थितीत केवळ ‘मोदी एके मोदी’ हा प्रचाराचा ‘फॉर्म्युला’ कितपत चालणार याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.