शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

सेनेच्या कर्जमुक्तीला भाजपाचा कोलदांडा

By admin | Updated: September 14, 2015 03:03 IST

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करा, अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेली मागणी फेटाळून लावत कर्जमुक्तीचा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही, तर तो बँकांनाच होईल

औरंगाबाद / मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करा, अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेली मागणी फेटाळून लावत कर्जमुक्तीचा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही, तर तो बँकांनाच होईल, असा दावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत केला.काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसपाठोपाठ उद्धव ठाकरे यांनी शनिवारी औरंगाबादेत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याची मागणी केली होती. मात्र ही मागणी अव्यवहार्य ठरवत शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी नवा फॉर्म्युला सुचविण्याचे आवाहन दानवे यांनी राजकीय पक्षांना केले. दानवे म्हणाले, राज्यातील युतीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आमचे सरकार साडे तीन लाख कोटी रुपयांचे कर्ज घेऊन जन्माला आलेले सरकार आहे. तरीही शेतकऱ्यांसाठी आणखी कर्ज काढण्याची आमची तयारी आहे. मात्र, कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही तर तो बँकांनाच होईल. आधी बँका डबघाईला आणायच्या आणि नंतर कर्जमाफीची बोंब ठोकायची हे त्यांचे कारस्थान आहे. उद्धव ठाकरे यांनीही कर्जमुक्तीची मागणी केल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर दानवे म्हणाले, राज्यात याआधीही कर्जमाफी झाली; पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत. त्यामुळे नवीन फॉर्म्युला ठरवावा लागणार आहे. त्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)वाटचाल मध्यावधीकडे सत्तेत असूनही भाजपा व शिवसेना आज ज्या पद्धतीने भांडत आहेत, ते पाहिल्यानंतर राज्याची वाटचाल मध्यावधीच्या दिशेने चालू असल्याचे जाणवत आहे. आपापसांतील मतभेदांमुळे ही मंडळी सरकार कसे चालवणार, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी औरंगाबाद येथे केला.सप्टेंबरमध्येच टंचाईग्रस्त गावे जाहीर करणारप्रचलित नियमानुसार १५ सप्टेंबर रोजी नजर पैसेवारी येते. अंतिम पैसेवारी जानेवारीत जाहीर होते. त्यानंतर दुष्काळ जाहीर करण्यात येतो. परंतु, यंदा राज्य सरकार एवढी वाट बघणार नाही. नजर पैसेवारी येताच टंचाईग्रस्त गावे जाहीर केली जातील, अशी माहिती दानवे यांनी दिली. अजित पवार, तटकरेंना केले बाजूला!दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, या मागणीसाठी राष्ट्रवादीने सोमवारी ‘जेल भरो’ आंदोलन आयोजित केले असले तरी याचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व पक्षाचे विधिमंडळातील नेते अजित पवार यांच्याऐवजी खा. सुप्रिया सुळे या करणार आहेत. सिंचन घोटाळ्याप्रकरणी एसीबीने पवार आणि तटकरे यांना समन्स पाठविले. कदाचित यामुळेच पक्षनेतृत्वाने या दोघांना आंदोलनापासून लांब राहण्याचा सल्ला दिला असल्याचे समजते. याबाबत तटकरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पक्षाने जिल्हानिहाय जबाबदारीचे वाटप केलेले आहे. त्यानुसार औरंगाबादमध्ये दिलीप वळसे-पाटील, जालन्यात खा. सुप्रिया सुळे व राजेश टोपे, बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर, परभणीत धनंजय मुंडे, उस्मानाबाद येथे जितेंद्र आव्हाड, लातूरला जयंत पाटील, नांदेडमध्ये अनिल देशमुख तर हिंगोलीत शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जेलभरो होणार आहे. हे तर ‘जेल जाने से रोको’। दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी आयोजित केलेले ‘जेल भरो’ आंदोलन हे प्रत्यक्षात भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या असलेल्यांचे ‘जेल जाने से रोको’ आंदोलन असल्याची टीका मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत केली.