शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे आघाडीअस्त्र

By admin | Updated: March 16, 2017 03:00 IST

उत्तर प्रदेशातील राजकारणात मुस्लिम मतांचा विचार न करता एकगठ्ठा हिंदू मतांचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी भिवंडी पालिकेसाठी

भिवंडी : उत्तर प्रदेशातील राजकारणात मुस्लिम मतांचा विचार न करता एकगठ्ठा हिंदू मतांचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी भिवंडी पालिकेसाठी मात्र वेगवेगळ््या पक्षांची आणि फुटीर नेत्यांची आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास इतर पक्षातील फुटीर नेते तयार होणार नसल्याने आणि मुस्लिम मते गमावणे परवडणार नसल्याने शहर विकास किंवा त्या स्वरूपाची आघाडी करून सत्ता हस्तगत करण्याच्या भाजपाच्या हालचाली अंतिम टप्प्यात आल्या आहेत. त्याचवेळी काँग्रेस-समाजवादी पक्षाच्या आघाडीचा प्रयोग उत्तर प्रदेशात यशस्वी झाला नसला, तरी त्या पक्षांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस, मुस्लिम समाजातील काही गटांना एकत्र आणण्याची गरज समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी व्यक्त केल्याने भिवंडी महापालिकेच्या पुढील महिन्यात होणाऱ्या न्ॉिवडणुकीत दोन आघाड्यांची लढाई होण्याची शक्यता आहे. शिवसेना मात्र या दोन्ही आघाड्यांपासून अलिप्त राहून वेगळी लढेल, असेच आताचे चित्र आहे. भिवंडीच्या मागील निवडणुकीत सर्व पक्ष स्वबळावर लढले. आताही शिवसेना भाजपासोबत जाण्याची शक्यता नाही. त्यामुळे शिवसेनेला बाजूला ठेवत भाजपाने काँग्रेससह वेगवेगळ््या पक्षातील फुटीरांना एकत्र करण्याच्या हालचाली अंतिम टप्पयात आणल्या आहेत. भाजपाची भिवंडीतील स्वबळाची ताकद किरकोळ आहे. त्या तुलनेत काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची ताकद मोठी आहे. त्यामुळे काँग्रेसमधील एका गटाशी भाजपाच्या नेत्यांनी संधान बांधले आहे. (प्रतिनिधी) भिवंडीत प्रभावी पक्ष असलेल्या काँग्रेसमधील एक गट इतका भाजपा नेत्यांच्या सोबत आहे, की प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी तो गट त्यांच्या स्वागतालाही फिरकला नाही. फक्त विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या दौऱ्यावेळी त्यांनी हजेरी लावली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल केलेल्या विधानावरून सुरू असलेल्या खटल्यानिमित्ताने काँग्रेसचे नेते राहूल गांधी अनेकदा भिवंडीत आले. त्यावेळी पक्षाने शक्तिप्रदर्शनाचा प्रयत्न केला. त्यानंतरही आंदोलने झाली. त्यामुळे पक्ष चर्चेत असला तरी निवडून येण्याच्या क्षमतेचे नेते जर फुटले, तर पक्षाची अवस्था बिकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मनोज म्हात्रे यांच्या हत्येनंतर पक्षाच्या चार नेत्यांनी सलग दौरे करत पक्षाला उभारी देण्याचा प्रयत्न केला. या भागाचे प्रतिनिधित्व करणारे खासदार कपिल पाटील हे एकहाती पालिका निवडणूक हाताळणार असल्याने म्हात्रे हत्या प्रकरणाच्या निमित्ताने काँग्रेसने त्यांना लक्ष्य केले. त्यातही पक्षाचा गट फोडण्याचे प्रयत्न होत असल्याने या टीकेची धार दिवसेंदिवस तीव्र होण्याची शक्यता आहे.भिवंडी : भाजपाने सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर महाराष्ट्रात व उत्तर प्रदेशांत यश संपादन केले असून ते लोकशाहीस मारक आहे. हिंदू- मुस्लिमांना विभक्त करण्यासाठी सुरू असलेले भाजपाचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र यायला हवे.समाजवादी पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत भिवंडीच्या निवडणुकीते लढावे, असे आवाहन समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी केले. हिंदू-मुस्लिमांत फूट पाडत भाजपा देशांत अराजकता माजवण्याच्या स्थितीत आहे. भाजपाविरोधात मराठा समाजाचे मोर्चे निघाले. नोटाबंदी झाली. त्याचा फटका गोरगरीबांना बसला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही थांबल्या नाहीत. असे असूनही भाजपा बहुमताने निवडून येतो, हे आश्चर्य असल्याचे ते म्हणाले. तेलगू, उत्तर भारतीय, मराठी भाषकांचे गट, गुजराती-मारवाडी गटांवर भाजपाची भिस्त आहे. मुस्लिमांचाही एक गट सोबत ठेवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. त्यासाठी वेगवेगळ््या गटातील प्रभावी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांसोबत सध्या गुप्त बैठका सुरू असून त्यातून भाजपापुरस्कृत आघाडी आकाराला येते आहे.प्रभागरचनेची अडचणठाणे, उल्हासनगरप्रमाणे चार वॉर्डांचा एक प्रभाग झाल्याने उमेदवाराला पक्षाच्या चिन्हाखेरीजी निवडून येणे कठीण आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची फौज नसलेल्या उमेदवारांची पंचाईत झाली आहे. त्यामुळे आघाडी झाली आणि तिला एक चिन्ह मिळाले, तर सर्व गटांची सोय होईल, असे मानले जाते.