शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी भाजपची अनुकूलता म्हणजे निव्वळ ‘फार्स’

By admin | Updated: March 9, 2017 16:48 IST

शेतकरी कर्जमाफीसाठी भारतीय जनता पक्ष अनुकूल असल्याचा दावा म्हणजे निव्वळ एक‘फार्स’ आहे. कर्जमाफीची

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9  -  शेतकरी कर्जमाफीसाठी भारतीय जनता पक्ष अनुकूल असल्याचा दावा म्हणजे निव्वळ एक‘फार्स’ आहे. कर्जमाफीची मागणी मान्य असेल तर सरकारने तातडीने कर्जमाफी जाहीर करावी, असे आव्हान विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज राज्य सरकारला दिले आहे.
शेतकरी कर्जमाफीसाठी सलग दुसऱ्या दिवशी विधानसभेचे कामकाज ठप्प झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, " प्रारंभी भारतीय जनता पक्ष कर्जमाफीच्या विरोधात होता. परंतु, शेतकरी आणि विरोधी पक्षांमुळे सरकारवर दबाव निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री योग्य वेळी कर्जमाफी करू, असे सांगू लागले आहेत. परंतु, ही योग्य वेळ येणार तरी केव्हा? कर्जमाफीची घोषणा करण्यासाठी सरकार दिल्लीच्या आदेशाची प्रतीक्षा करते आहे की नागपूरच्या?"  
"सरकारने तातडीने कर्जमाफीची घोषणा करावी, अशी काँग्रेस-राष्ट्रवादीची मागणी आहे. शिवसेनाही या मागणीसाठी आग्रही असल्याचे दिसून येते. त्यामुळे सरकारने आता शेतकऱ्यांचा अधिक अंत न पाहता कर्जमाफीची घोषणा करावी. वेळकाढूपणा करून अधिक शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करू नये,"  असेही राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले.
तत्पूर्वी गुरूवारी सकाळी विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने केली. तीच आक्रमकता विधानसभेतही दिसून आली. काँग्रेस-राष्ट्रवादीने कर्जमाफीच्या तात्काळ घोषणेसाठी सभागृह दणाणून सोडले. त्यामुळे सभागृहाचे कामकाम तीन वेळा ठप्प झाले व त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.