शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे विधान असंवेदनशील नव्हते, तर...", कर्जमाफीबद्दलच्या वादग्रस्त विधानावर बाबासाहेब पाटलांचा खुलासा
2
VIDEO: "निवडून यायचं म्हणून आम्ही आश्वासने देतो"; सहकार मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळलं मीठ, म्हणाले, "वेळ मारण्यासाठी..."
3
वयाच्या २३ व्या वर्षी 'शतकी रोमान्स'चा सिलसिला! यशस्वी जैस्वालनं कॅप्टन शुबमन गिलचा विक्रमही मोडला
4
छोटा राजनचा धाकटा भाऊ ठाकरेंच्या शिवसेनेत, प्रवेशावेळी उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
5
सासऱ्यांची ७ लाख कोटींची कंपनी, पत्नी अब्जाधीश; माजी पंतप्रधान मायक्रोसॉफ्टमध्ये करणार जॉब
6
इंजिनिअरच्या घरात सापडलं मोठं घबाड; नोटांचा ढीग आणि सोनं-चांदीही जप्त
7
सावधान! दिवाळीत तुमच्या घरीही येऊ शकतं 'विष'; 'अशी' झटपट ओळखा भेसळयुक्त मिठाई
8
भारताचे मोठे पाऊल! काबुलमधील दूतावास पुन्हा सुरू होणार, अफगाणिस्तानशी 'दहशतवादा'वर चर्चा
9
निष्काळजीपणाचा कळस! सिरपनंतर आता गोळ्या... लाखो मुलांना दिलं टेस्टमध्ये फेल झालेलं औषध
10
“CJI गवई दलित असल्यानेच सवर्णाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न, कारवाई व्हावी”: रामदास आठवले
11
डोनाल्ड ट्रम्प भारतीयांना आणखी एक धक्का देणार! H-1B व्हिसा नियमांमध्ये आणखी बदल करण्याची तयारी
12
Yashasvi Jaiswal Record : यशस्वीचा मोठा पराक्रम; गांगुली- द्रविडसह गिल अन् विराटलाही टाकले मागे
13
LG Electronics IPO: एलजी इलेक्ट्रॉनिक्स आयपीओचं आज अलॉटमेंट, तुम्हाला मिळालेत का शेअर्स? कसं चेक कराल?
14
हिंदू अभिनेत्याशी दुसरं लग्न केल्याने ट्रोल करणाऱ्यांना सारा खानचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "आमचा धर्म..."
15
"ते माझ्यावर हसले...", ऑफिसमध्ये मानसिक आरोग्याबाबत तरुणीला आला वेदनादायी अनुभव
16
दिवाळी बोनसवर किती टॅक्स? रोख रक्कम, मिठाई की गिफ्ट व्हाउचर; कर नियमांबद्दलच्या 'या' चुका टाळा!
17
संजय राऊतांच्या गैरहजेरीत बैठका! ‘मातोश्री’वर केली महत्त्वाची खलबते, ठाकरे बंधूंनी डावललं?
18
KL राहुलनं सेंच्युरीत जमलं नाही ते केलं; पण क्लासला दांडी मारून आलेल्या चाहत्यांसमोर नको ते घडलं
19
प्लॅन A विष, प्लॅन B गोळीबार... नवऱ्याचा काटा काढण्यासाठी बायकोचा बॉयफ्रेंडसह भयंकर कट
20
...तर मग लाडक्या बहिणींना योजनेचे १५०० रुपये मिळणार नाहीत का? अजित पवारांनी दिले उत्तर

भाजपच्या गडात सेनेची पक्षबांधणी

By admin | Updated: January 30, 2015 00:56 IST

भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या विदर्भात शिवसेनेने पक्ष बांधणीसाठी अधिक लक्ष केंद्रित केले आहे. शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून सुरू केलेल्या ‘मिशन विदर्भ’च्या

विदर्भावर अधिक लक्ष : नेत्यांचे दौरै सुरूनागपूर : भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या विदर्भात शिवसेनेने पक्ष बांधणीसाठी अधिक लक्ष केंद्रित केले आहे. शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून सुरू केलेल्या ‘मिशन विदर्भ’च्या माध्यमातून बालेकिल्ल्यात भाजपला शह देण्याचे सेनेचे प्रयत्न आहेत. यासाठी पक्षाचे सर्व प्रमुख नेते प्रत्येक जिल्ह्यात जाऊन कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत.सेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी दोन दिवस नागपूरमध्ये पक्षाच्या प्रमुख नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली व त्यांना सूचना दिल्या. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत विदर्भात भाजपला घवघवीत यश मिळाले. या मुळे विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला ठरला आहे. त्यापूर्वीच्या काळात या भागात भाजप प्रमाणेच सेनेचीही शक्ती होती. विशेषत: विदर्भात पश्चिम विदर्भ हा सेनेचा बालेकिल्ला मानला जात होता तर पूर्व विदर्भातील वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यातही सेनेचे आमदार निवडून येत होते. विधानसभा निवडणुकीत ऐन वेळी युती तुटल्याने सेनेची पिछेहाट झाली. निवडणुकीनंतर सेना सत्तेत सहभागी झाली असली तरी स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर दोन्ही पक्षात मतभेद आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री विदर्भाचाच असल्याने भाजपसाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर सेनेची कोंडी होत आहे .पुढच्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता विदर्भात पुन्हा जनाधार मिळविण्यासाठी शिवसेनेने‘शिवसंपर्क’ अभियानाच्या निमित्ताने ‘मिशन विदर्भ’ सुरू केले आहे. शिवसेनेचे संपर्क प्रमुख, मंत्री आणि आणि इतरही नेत्यांचे विदर्भात दौरे सुरू असून प्रत्येक जिल्ह्यात प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन त्यांना पक्ष बळकट करण्याच्या सूचना दिल्या जात आहे. विशेष म्हणजे ही मोहीम फक्त विदर्भातच सुरू आहे. (प्रतिनिधी)सध्या तरी स्वबळावरप्रत्येक कार्यकर्त्याला निवडणूक लढविण्याची संधी मिळायला हवी. संघटना वाढीसाठी ही बाब गरजेची आहे. त्यामुळे पुढच्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सध्या तरी शिवसेनेचे धोरण स्वबळाचेच आहे, असे राऊत म्हणाले. यावेळी खासदार कृपाल तुमाने व माजी आमदार आशिष जयस्वाल उपस्थित होते. वैदर्भीयांना गृहीत धरू नकाशेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतमालाला न मिळणारा भाव यामुळे संतापून विदर्भातील शेतकऱ्यांनी आघाडी सरकारच्या विरोधातील राग मतपेटीतून व्यक्त केला. त्यामुळे राज्यात सत्ता परिवर्तन झाले. आता शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारला गांभीर्याने पाहावे लागेल. मुख्यमंत्री विदर्भाचेच असल्याने ते त्यांना न्याय देतील. विदर्भातील जनतेला गृहीत धरू नये असे संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदत वाटपासंदर्भात ते बोलत होते.अंतर्गत धुसफूस उघडशिवसेनेच्या आढावा बैठकीदरम्यान पक्षातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली. काही शिवसैनिकांनी पक्षात पूर्वाश्रमीच्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश दिल्याबद्दल नापसंती व्यक्त करीत पक्ष बळकट करण्यासाठी सक्षम जिल्हा प्रमुख निुयक्त करण्याची मागणी केली.