शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

बिहारमधील भाजपचा पराभव म्हणजे मोदींचीच हार - संजय राऊत

By admin | Updated: November 8, 2015 11:39 IST

'बिहारमध्ये मोदींच्या नावाने निवडणूका लढण्यात आल्या, त्यामुळे हा पराभव म्हणजे मोदींचीच हार आहे' असे सांगत शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपाला टोला हाणला.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ - 'बिहारमध्ये मोदींच्या नावाने निवडणूका लढण्यात आल्या, त्यामुळे हा पराभव म्हणजे मोदींचीच हार आहे' असे सांगत भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने भाजपाला चिमटा काढला आहे.  जेव्हा काँग्रेसचा पराभव होतो तेव्हा पराभवाची जबाबदारी सोनिया गांधींची असते, तसेच आता बिहार निवडणूकीतील भाजपाच्या पराभवाची जबाबदारी नरेंद्र मोदींची आहे आणि त्यांनी ती स्वीकारली पाहिजे, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी हाणला.
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बिहार निवडणूकीत मतदारांनी महागठबंधनच्या बाजूने कौल दिला असून मोदींच्या नेतृत्वाखाली लढणा-या एनडीएला मतदारांनी साफ धुडकावून लावले आहे. महागठबंधनची स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरू असून नीतिश कुमाच पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणाप असल्याचे या निकालांनंतर स्पष्ट झाले आहे. त्याच पार्श्वबूमीवर भाजप सरकारचा केंद्रातील व महाराष्ट्रातील सत्तेतील साथीदार असणा-या शिवसेनेने नीतिशकुमार यांचे अभिनंदन करतानाच भाजपाला चिमटे काढले आहेत. 
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नीतिशकुमार यांचे अभिनंदन करत हा ऐतिहासिक निकाल देशातील राजकीय भवितव्याला वेगळे वळण देणारा ठरेल असे सांगितले, तसेच या मोठ्या विजयामुळे राजकीय महानायक म्हणून नितीशकुमार यांचा उदय झाला आहे, असेही ते म्हणाले.
त्याचवेळी त्यांनी भाजपच्या पराभवाची मिमांसा करताना बिहारमध्ये भाजप हरली म्हणजे नरेंद्र मोदीच हरले असे सांगत मोदींनी पराभवाची जबाबादारी स्वीकारली पाहिजे, असा सल्ला भाजपाला दिला.