शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
2
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
3
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
4
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
5
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
6
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
7
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
8
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
9
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
10
कसा नियतीचा खेळ हा... ट्रकला धडकून मोठ्या भावाचा मृत्यू, मृतदेह घ्यायला निघालेल्या लहान भावाचाही रस्त्यावरच अंत!
11
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
12
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
13
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
14
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
15
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
16
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
17
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
18
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास
19
सौरभ चौघुलेपासून विभक्त झाल्याच्या चर्चांवर अखेर योगिता चव्हाणनं सोडलं मौन, म्हणाली...
20
रश्मिका मंदानाला व्हायचंय आई, आतापासूनच पडली प्रेमात; म्हणाली, "ठराविक वयात..."

‘जैतापूर’ विरोध चिरडण्यासाठी भाजपचा डाव

By admin | Updated: December 12, 2014 23:42 IST

पालकमंत्रीपद घेणार : शिवसेनेला पुन्हा ‘दे धक्का’ची भाजपची तयारी सुरू

रत्नागिरी : जैतापूर येथील अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेचा असलेला कडवा विरोध मोडून काढण्यासाठी भाजपने जय्यत तयारी केली आहे. त्यासाठीच रत्नागिरीचे पालकमंत्रिपद सेनेचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांना न देता भाजपाचे मंत्री विनोद तावडे यांना देण्याचा हट्ट भाजपने धरला आहे. रामदास कदमांना अन्य जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्याची योजना विचाराधीन आहे. जिल्ह्याबाहेरील मंत्र्याला पालकमंत्री बनवण्याच्या भाजपाच्या या हालचालींमुळे शिवसेनेत अस्वस्थता आहे. यावरून दोन्ही पक्षात रणकंदन माजण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद जिल्ह्यातीलच मंत्र्याला मिळायला हवे, हा सर्वसामान्य संकेत आहे. जिल्ह्यात एकही मंत्री नसेल तरच बाहेरच्या जिल्ह्यातील मंत्री पालकमंत्री म्हणून दिला जातो, हे सर्वसामान्य समीकरण आहे. राज्य मंत्रिमंडळात पर्यावरण मंत्री असलेले रामदास कदम रत्नागिरी जिल्ह्यातील खेडचे सुपुत्र आहेत, तर शिक्षणमंत्री तावडे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्याच्या कुणकवण गावचे आहेत. दोघांचेही कार्यक्षेत्र त्यांचे जिल्हे व मुंबईतील बोरिवली, कांदिवली हे भाग आहेत. त्यामुळेच रत्नागिरीचे पालकमंत्रिपद मूळ रत्नागिरीचे म्हणून कदमांना मिळायला हवे, हा संकेत आहे. परंतु निवडणूकपूर्व युतीच्या मुद्द्यापासून ते आतापर्यंत भाजपाने सर्वच संकेत बाजुला ठेवून आपला वेगळा ‘बाणा’ दाखवला आहे. त्यामुळेच पालकमंत्रिपदाबाबत सेनेला अप्रिय ठरणारा निर्णय घेण्यास भाजप मागेपुढे पाहणार नाही, असेच सध्याचे राजकीय चित्र आहे. जैतापूर येथील अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेचा ठाम विरोध आहे. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनीही ही भूमिका वारंवार मांडली आहे. कदम यांना पालकमंत्री केले; तर जिल्ह्याच्या प्रशासनावर त्यांचे नियंत्रण राहील व जैतापूरला असलेला सेनेचा विरोध अधिक कडवा होईल. प्रशासनालाही काम करणे अशक्य होईल, अशी भीती भाजपला वाटत आहे. रामदास कदम रत्नागिरीचे पालकमंत्री झाले, तर जैतापूर प्रकल्पाच्या अंमलबजावणीत सेनेच्या विरोधाचे अडथळे येणार, अशी भीती भाजपाला वाटते आहे. त्यामुळेच अद्याप जिल्ह्याला पालकमंत्री देण्यात आलेला नाही. विनोद तावडे हे बोरिवलीतून निवडून आले असले तरी ते कोकणचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या प्रतिमेचा लाभ उठवित त्यांना जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्याच्या हालचाली सुरू आहेत. जैतापूर विरोध चिरडण्यासाठी भाजपने पावले उचलली असल्याचे चित्र समोर येत असले तरी तावडे त्यांचा कोकणशी असलेला सततचा संपर्क व त्यांची जनमानसात असलेली प्रतिमा या साऱ्या गोष्टींचा लाभ पक्षाला मिळावा, यासाठीचे प्रयत्न या माध्यमातून सुरू असल्याचे सध्या तरी दिसत आहे. (प्रतिनिधी)भाजपाची धूर्त खेळी ?केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे समर्थन केले होते. मोदी सरकारची तीच भूमिका आहे. दुसरीकडे शिवसेनेचा या प्रकल्पाला ठाम विरोध आहे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प असलेल्या मतदारसंघातून आमदार राजन साळवी हे जैतापूर विरोधाच्या मुद्द्यावरच सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत.