शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

भाजपाचे खान्देशात ‘डॅमेज कंट्रोल!’

By admin | Updated: July 5, 2016 01:07 IST

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर खान्देशातील बहुजन समाजामधील नाराजी दूर करण्यासाठीच धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे

- मिलिंद कुलकर्णी, जळगाव

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर खान्देशातील बहुजन समाजामधील नाराजी दूर करण्यासाठीच धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करून भाजपा नेतृत्वाने एका दगडात अनेक पक्षी टिपले आहेत. मूळ शिवसैनिक असलेले डॉ. भामरे हे पहिल्यांदाच खासदार झालेले असतानाही त्यांंना मंत्रिपद देऊन खडसेंना शह देण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.डॉ. भामरे हे धुळे जिल्ह्यातील मालपूर (ता. साक्री) येथील रहिवासी. त्यांना राजकीय वारसा आहे. आजोबा सीताराम गोविंद पाटील हे सत्यशोधक चळवळीतील अग्रणी नेते होते. पुढे कम्युनिस्ट पक्षात ते सक्रिय झाले. वडील रामराव पाटील यांनीही कम्युनिस्ट पक्षापासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. परंतु पुढे ते काँग्रेसच्या मुख्य प्रवाहात सहभागी झाले. आई गोजरताई भामरे या १९७२ ते ७८ या काळात साक्री विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या आमदार म्हणून निवडून आल्या. परंतु रामराव पाटील यांनी धुळे व कुुसुंबा मतदारसंघातून एकेकदा निवडणूक लढवली, पण त्यांना यश मिळाले नाही. राजकीय वारसा आणि वडिलांचे सहकार क्षेत्रातील कार्य पाठीशी असूनही डॉ. सुभाष भामरे हे राजकारणात सक्रिय नव्हते. ते कर्करोग तज्ज्ञ म्हणून धुळ्यात प्रसिद्ध होते. एक सेवाभावी डॉक्टर हीच त्यांची खरी ओळख. २००९ मध्ये त्यांनी शिवसेनेतर्फे विधानसभेची निवडणूक लढवली, परंतु त्यांना अपयश आले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी अचानक भामरे यांचे नाव चर्चेत आले. नितीन गडकरी यांच्यापर्यंत भामरे यांचे नाव पोहोचले आणि त्यांचे तिकीट निश्चित झाले.

गटातटापासून दूर डॉ. भामरे हे दोन वर्षांपूर्वी भाजपामध्ये आले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत अनिल गोटे आणि जयकुमार रावल हे भाजपाचे दोन उमेदवार पुन्हा निवडून आले. गोटे आणि भामरे यांनी धुळ्यात एकमेकांविरुद्ध निवडणूक लढविली होती. त्यांचे संबंध धुळे-इंदूर रेल्वे मार्गाच्या मंजुरीवरून ताणले गेले. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या भेटीची छायाचित्रे, रेकाँर्डिंग पत्रकार परिषदांमध्ये ऐकविण्यापर्यंत वाद विकोपाला गेले होते. पक्षात दोन्ही नवीन असले तरी गोटे हे खडसे समर्थक म्हटले जातात. खडसे यांच्यावर आरोप झाल्यानंतरदेखील गोटे उघडपणे त्यांच्या समर्थनार्थ पुढे आले होते. धुळ्यात जल्लोष! : धुळ्याचे खासदार डॉ.सुभाष भामरे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळणार असल्याचा संपूर्ण शहरात जल्लोष करण्यात आला. त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची बातमी धुळ्यात येऊन धडकताच शहरातील भाजपा कार्यकर्त्यांनी आतषबाजी करीत जल्लोष केला. डॉ. भामरे यांच्या रूपाने धुळे जिल्ह्याला दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळत आहे. पहिल्यांदा काँग्रेसच्या राजवटीत इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात विजय नवल पाटील यांना दळणवळण राज्यमंत्रिपद मिळाले होते.डॉ़ सुभाष भामरे यांनी खासदारच नव्हे तर मंत्री होऊन धुळ्याचा चेहरामोहरा बदलावा, अशी माझी इच्छा होती, ती पूर्ण झाली आहे़ या मंत्रिपदामुळे विकास होण्यास मदत होणार आहे़ आम्हाला हा निर्णय अनपेक्षित होता़ - रामराव पाटील, वडील