शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

भाजप जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढणार

By admin | Updated: December 22, 2016 23:30 IST

नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले आहे.

आॅनलाइन लोकमत,

अहमदनगर, दि. २२- नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. आता जिल्हा परिषद ताब्यात घ्यायची आहे. जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादी वर्चस्व संपले आहे. यापुढे अहमदनगर जिल्हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाईल. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याची घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी केली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी नगर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा गुरूवारी शेंडी येथे झाला. त्यात त्यांनी ही घोषणा केली. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, आमदार शिवाजी कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, दिलीप भालसिंग, विलास शिंदे, शाम पिंपळे, हरिभाऊ कर्डिले, अक्षय कर्डीले, बन्सी कराळे, दत्तात्रय मगर, सुभाष झिने, दत्तात्रय सप्रे, बाजीराव गवारे, भानुदास सातपुते आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. शिंदे म्हणाले बाजार समिती निवडणुकीत कर्डिले-पाचपुते यांना पाडण्यासाठी महाआघाडी स्थापन केली जाते. आता मलाही शह देण्यासाठी विरोधक महाआघाडीच्या तयारीत आहेत. जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादी संपलेली असून अखेरची घटका मोजत आहे. सेनेचे काहीही खरे नाही. जिल्ह्यात भाजपची ताकत वाढली असून नंबर एक पक्ष बनला आहे. कर्डिले, पाचपुते डावपेच खेळण्यात तरबेज असल्यामुळे मी नेहमी त्यांच्या बाजूला बसतो. या निवडणुकीत भाजपची सत्ता येणार यात तिळमात्र शंका नाही. जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश त्यांनी दिले. कर्डिले म्हणाले, थोरात-विखे यांच्यात भांडण लागत नाही, तोपर्यंत आपली पोळी भाजणार नाही. म्हणूनच राहुरी नगरपालिकेत विखे यांच्याबरोबर युती केली होती. यामुळेच राहात्यात भाजपला यश मिळाले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांच्या पराभवालाही काँग्रेसच कारणीभूत आहे. विखे नेहमीच विरोधी पक्षाला मदत करण्याचे काम करतात. या डावपेचामुळेच राहात्याच भाजपला फायदा झाला. जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला उमेदवारही मिळणार नाहीत. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष किल्ल्या पलिकडे जात नाहीत. किल्ला सोडून हात घातला तर आपले अस्तित्व राहणार नाही, हे त्यांना माहीत आहे. पाचपुते म्हणाले ,कर्डिले यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सर्वच ठिकाणी लक्ष घालावे लागणार आहे. जिल्हाध्यक्ष बेरड यांनी नगर तालुक्यात अविचाराची आघाडी तयार झाली असून ही संधी साधुंची टोळी आहे. नगर तालुक्याचे विभाजन झाले असले तरी कर्डिले यांच्या माध्यमातून तालुक्याला पालकत्व मिळाले आहे. अहमदनगर महापालिकेत शिवसेना-राष्ट्रवादी भिडली.