शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
3
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
4
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
5
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
6
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
7
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
8
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
9
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
10
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
11
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
12
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
13
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
14
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
15
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
16
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
17
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
18
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
19
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
20
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 

भाजप जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढणार

By admin | Updated: December 22, 2016 23:30 IST

नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले आहे.

आॅनलाइन लोकमत,

अहमदनगर, दि. २२- नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. आता जिल्हा परिषद ताब्यात घ्यायची आहे. जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादी वर्चस्व संपले आहे. यापुढे अहमदनगर जिल्हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाईल. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याची घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी केली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी नगर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा गुरूवारी शेंडी येथे झाला. त्यात त्यांनी ही घोषणा केली. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, आमदार शिवाजी कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, दिलीप भालसिंग, विलास शिंदे, शाम पिंपळे, हरिभाऊ कर्डिले, अक्षय कर्डीले, बन्सी कराळे, दत्तात्रय मगर, सुभाष झिने, दत्तात्रय सप्रे, बाजीराव गवारे, भानुदास सातपुते आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. शिंदे म्हणाले बाजार समिती निवडणुकीत कर्डिले-पाचपुते यांना पाडण्यासाठी महाआघाडी स्थापन केली जाते. आता मलाही शह देण्यासाठी विरोधक महाआघाडीच्या तयारीत आहेत. जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादी संपलेली असून अखेरची घटका मोजत आहे. सेनेचे काहीही खरे नाही. जिल्ह्यात भाजपची ताकत वाढली असून नंबर एक पक्ष बनला आहे. कर्डिले, पाचपुते डावपेच खेळण्यात तरबेज असल्यामुळे मी नेहमी त्यांच्या बाजूला बसतो. या निवडणुकीत भाजपची सत्ता येणार यात तिळमात्र शंका नाही. जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश त्यांनी दिले. कर्डिले म्हणाले, थोरात-विखे यांच्यात भांडण लागत नाही, तोपर्यंत आपली पोळी भाजणार नाही. म्हणूनच राहुरी नगरपालिकेत विखे यांच्याबरोबर युती केली होती. यामुळेच राहात्यात भाजपला यश मिळाले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांच्या पराभवालाही काँग्रेसच कारणीभूत आहे. विखे नेहमीच विरोधी पक्षाला मदत करण्याचे काम करतात. या डावपेचामुळेच राहात्याच भाजपला फायदा झाला. जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला उमेदवारही मिळणार नाहीत. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष किल्ल्या पलिकडे जात नाहीत. किल्ला सोडून हात घातला तर आपले अस्तित्व राहणार नाही, हे त्यांना माहीत आहे. पाचपुते म्हणाले ,कर्डिले यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सर्वच ठिकाणी लक्ष घालावे लागणार आहे. जिल्हाध्यक्ष बेरड यांनी नगर तालुक्यात अविचाराची आघाडी तयार झाली असून ही संधी साधुंची टोळी आहे. नगर तालुक्याचे विभाजन झाले असले तरी कर्डिले यांच्या माध्यमातून तालुक्याला पालकत्व मिळाले आहे. अहमदनगर महापालिकेत शिवसेना-राष्ट्रवादी भिडली.