शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
2
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
3
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
4
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
5
Operation Sindoor Live Updates: ही कारवाई देशाच्या सुरक्षेसाठी अनिवार्य होती; युद्धविरामानंतर शरद पवारांचं भाष्य
6
कडक सॅल्यूट! "डॅडी... मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
7
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
8
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
9
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
10
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
11
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
12
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
13
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
14
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
15
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
16
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
17
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
18
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
19
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
20
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण

डम्पर आंदोलनातून सेना-भाजपाने घेतली माघार

By admin | Updated: March 9, 2016 06:11 IST

कोकण आयुक्तांनी दिलेल्या आश्वासनांमुळे सेना-भाजपाच्या नेत्यांनी डम्पर आंदोलन मागे घेतले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठप्प असलेला गौणखनिज व्यवसाय उद्यापासून सुरू होणार

सिंधुदुर्ग : कोकण आयुक्तांनी दिलेल्या आश्वासनांमुळे सेना-भाजपाच्या नेत्यांनी डम्पर आंदोलन मागे घेतले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठप्प असलेला गौणखनिज व्यवसाय उद्यापासून सुरू होणार असल्याचे शिवसेना आमदार वैभव नाईक व भाजपाचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले; तर काँग्रेस प्रणीत संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत आणि अशोक सावंत यांनी जाहीर केले. त्यामुळे शुक्रवारपासून सुरू झालेले डम्पर आंदोलन पाचव्या दिवशीही सुरूच आहे.गेल्या पाच दिवसांपासून डम्पर चालक-मालक संघटनेचे जिल्हा प्रशासनाच्या धोरणाविरोधात जिल्हा मुख्यालयात आंदोलन सुरू होते. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक जोपर्यंत लेखी मागण्या मान्य केल्याचे आश्वासन देत नाहीत तोपर्यंत आंदोलन संपणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. दरम्यान, आंदोलकांवर लाठीमार करण्यात आल्यामुळे या सर्वपक्षीय आंदोलनाची दिशा काँग्रेस विरुद्ध शिवसेना-भाजपा अशी झाली होती. त्या दिवसापासून शिवसेना व भाजपाचे पदाधिकारी मुख्यमंत्री व महसूलमंत्र्यांच्या संपर्कात होते. मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलेल्या निर्देशानुसार मंगळवारी कोकण विभागीय आयुक्त तानाजी सत्रे सिंधुदुर्गात दाखल झाले. या वेळी भाजपा व सेनेच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेत मागण्या मांडल्या. आयुक्तांबरोबच्या चर्चेनंतर आम्ही समाधानी असून, आंदोलन मागे घेत आहोत व उद्यापासून सर्व व्यावसायिक काम सुरू करतील, असेही आमदार वैभव नाईक यांनी सांगितले. आयुक्तांशी सकारात्मक चर्चा झाली असली तरी जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत डम्पर चालक-मालक संघटनेचे आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी आग्रही भूमिका काँग्रेस प्रणीत संघटनांनी जाहीर केली. (प्रतिनिधी)> नीतेश राणेंवरील गुन्हे मागे घ्याआमदार नीतेश राणे हे आमचे प्रश्न मांडण्यासाठी आले होते. त्यांना देण्यात आलेली वागणूक ही अपमानास्पद असून, त्यांच्यावर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी केल्याचे संदेश व अशोक सावंत यांनी सांगितले. कोकण विभागीय आयुक्त व कोकण परिक्षेत्रीय पोलीस महासंचालकांशी याबाबत चर्चा झाली असून, जिल्हाधिकारी अनिल भंडारी व जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची बदली होणारच, असेही राजन तेली म्हणाले.