पिंपरी-चिंचवड : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीचा गुरुवारी समारोप झाला. या बैठकीत राज्यातील गावागावांत जावून नागरिकांशी तसेच शेतावर जावून शेतकऱ्यांना धोरणे समाजावून सांगा, संवाद वाढवा, बूथवर जावून नियोजन करा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पदाधिकाऱ्यांना केले. त्याचबरोबरच यापुढील निवडणूक भाजप स्वबळावर लढणार असल्याचे संकेत दिले. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात भाजपाची दोनदिवसीय बैठक होती. बैठकीची सांगता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाली. या वेळी दानवे बोलत होते. मध्यावधी निवडणुकीच्या शक्यतेविषयी आज वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्यांविषयी काही आमदारांनी मला फोन करून विचारले, मध्यावधी निवडणुका होऊ शकतात का? त्यावर मी त्यांना म्हटले, काळजी कशाला करताय. काम करीत राहायचे. पक्षाचे काम करील तोच यशस्वी होणार आहे. राज्यात नव्वद हजार बूथ आहेत. त्या बूथवर जावून संवाद साधा.’’ (प्रतिनिधी)
भाजप स्वबळावर लढणार : दानवे
By admin | Updated: April 28, 2017 03:00 IST