शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा आयारामांवर लढणार

By admin | Updated: January 25, 2017 03:10 IST

केंद्र आणि राज्यात सत्ताधारी झालेला भारतीय जनता पक्ष येणाऱ्या जिल्हा परिषदा, तसेच तालुका पंचायतींच्या निवडणुकीसाठी आयात केलेल्या उमेदवारांवर हत्तीचे बळ निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे.

वसंत भोसले / कोल्हापूरकेंद्र आणि राज्यात सत्ताधारी झालेला भारतीय जनता पक्ष येणाऱ्या जिल्हा परिषदा, तसेच तालुका पंचायतींच्या निवडणुकीसाठी आयात केलेल्या उमेदवारांवर हत्तीचे बळ निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. दक्षिण महाराष्ट्रातील तिन्ही जिल्हा परिषदांमधील एकूण १९१ सदस्यांमध्ये विद्यमान सभागृहात भाजपाचे केवळ चार सदस्य आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेसच्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते आपल्याकडे वळवून त्यांनाच भाजपाचे उमेदवार बनविण्याचा खटाटोप चालू आहे. त्यामुळे मूळच्या भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसत आहे.दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा परिषद कॉँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीकडे आहे. सातारा आणि सांगली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे स्पष्ट बहुमत आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेत भाजपाचे तीन आणि साताऱ्यात एकमेव सदस्य आहे. सांगली जिल्हा परिषदेत अजूनही भाजपाला खाते उघडायचे आहे. सध्या दक्षिण महाराष्ट्रातील २६ आमदारांपैकी ६ आमदार भाजपाचे आहेत. चारपैकी सांगलीचे खासदार संजयकाका पाटील भाजपाचे आहेत. नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत दक्षिण महाराष्ट्रात भाजपाने ७१ नगरसेवक आणि चार ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आणले आहेत. या यशाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदा आणि तालुका पंचायत समित्यांमध्येही शिरकाव करण्यासाठी भाजपाने जोरदार फिल्डिंग लावली आहे, पण पक्षाचे कार्यकर्ते कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसशी लढत देण्यास समर्थ नसल्याने, या दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांनाच प्रवेश देऊन पक्ष निवडणुकीची तयारी करीत आहे. गेले काही दिवस राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील या तिन्ही जिल्ह्यांचे दौरे करीत आहेत. त्यांच्या प्रत्येक सभा-समारंभात दोन्ही कॉँग्रेसचे दुसऱ्या अन् तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते प्रवेश करीत आहेत. त्यापैकी अनेकांना उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले जात आहे, तर काहींना त्यांच्या संस्थांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. आतापर्यंत विरोधी पक्षातील जवळपास शंभरांवर प्रमुख कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसमधील गटबाजी उफाळलीभाजपाने प्रथमच तडजोड करून का असेना, कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षासमोर आव्हान निर्माण केले आहे. सध्याचे वातावरण तसे आहे. याउलट सत्ताधारी कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षामध्ये प्रचंड गटबाजी दिसत आहे. साताऱ्यात खासदार उदयनराजे कॉँग्रेसच्या आघाडीत सामील होण्याच्या तयारीत आहेत. च्कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक कॉँग्रेसला विरोध करण्यासाठी भाजपाशी आघाडी करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे सध्यातरी दक्षिण महाराष्ट्रात तिरंगी सामना रंगणार आहे, पण कालचे मित्र आजचे विरोधक अशा या सोईस्कर आघाड्या आकाराला येत आहेत. भाजपाला नगरपालिका निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे अनेक जण या पक्षात प्रवेश करीत आहेत, शिवाय भाजपाकडे जिल्हा परिषदा आणि तालुका पंचायत समित्यांसाठी स्वपक्षाचे सक्षम कार्यकर्ते म्हणून पुढे येत नाहीत, अशी या पक्षाची गोची झाली आहे. भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक कार्यकर्ते राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आहेत. राष्ट्रवादीला सर्वत्र दररोज कुठा ना कुठे दणका बसत आहे. या कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्याचे प्रयत्न कोणत्याही नेत्याकडून होताना दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर कॉँग्रेसला संधी आहे, पण या पक्षातील वरिष्ठ नेते आपापला गट सांभाळण्यात गुंग असल्याने पुन्हा गटबाजी उफाळून येत आहे. संपूर्ण कॉँग्रेस एकजिनसी होऊन निवडणुकीची तयारी करताना दिसत नाही.