शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

भाजपाला देश मोडायचा आहे, काँग्रेसला तो वाचवायचा आहे

By admin | Updated: February 6, 2016 01:50 IST

भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देश तोडायचा आहे, काँग्रेसला मात्र तो वाचवायचा आहे. गांधी परिवार आहे तोपर्यंत देशात आपला विचार रुजविता येणार नाही,

पुणे : भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देश तोडायचा आहे, काँग्रेसला मात्र तो वाचवायचा आहे. गांधी परिवार आहे तोपर्यंत देशात आपला विचार रुजविता येणार नाही, याची त्यांना खात्री असल्यानेच ते गांधी परिवारावर टीका करतात, पण गांधी संपणार नाहीत, असे प्रतिपादन अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष आमदार अमरिंदरसिंग राजा ब्रार यांनी केले.महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आयोजित पुणे, बारामती, मावळ, शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या युवक काँग्रेस विभागीय मेळाव्याला ब्रार यांनी मार्गदर्शन केले. भाजपा तसेच आरएसएस यांच्यावर त्यांनी तीव्र शब्दांत टीका केली. काँग्रेस भवन येथे झालेल्या या मेळाव्याला युवक काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी हिंमतसिंग, आमदार संग्राम थोपटे, अनंत गाडगीळ, माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, युवक काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष विश्वजित कदम, उपाध्यक्ष सत्यजित तांबे, काँग्रेसचे शहराध्ययक्ष अभय छाजेड आदी उपस्थित होते.ब्रार म्हणाले, ‘‘भाजप ाआरएसएसच्या विचारांचे प्रतिनिधित्व करतो. आरएसएसला देशात भांडणे लावायची आहेत. हैदराबादच्या रोहित वेमुलाने आत्महत्या केली, याचे कारण आरएसएसला विरोधी विचारांच्या लोकांना जगू द्यायचे नाही हेच आहे. ते सांगतील त्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी वागतात. गांधी परिवारावर सतत शाब्दिक हल्ले केले जातात, याचे कारणही आरएसएसच आहे. मात्र गांधी परिवार या देशातील प्रत्येक भारतीयाच्या मनामनात आहे, तो अशाने संपणार नाही. ’’विश्वजित कदम यांनी भाजपाचा पराभव युवक काँग्रेसचे कार्यकर्ते घडवून आणतील, असा विश्वास व्यक्त केला. काँग्रेस नेत्यांवरच्या हल्ल्याला यापुढे युवक काँग्रेसकडून तोडीस तोड प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. विश्वास लांडगे, सचिन दुर्गाडे, प्रदीप कंद तसेच आमदार गाडगीळ, थोपटे, जोशी, छाजेड आदींची या वेळी भाषणे झाली. (प्रतिनिधी)