शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
3
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
4
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
5
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
6
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
7
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
8
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
9
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
10
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
11
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
12
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
13
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
14
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
15
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
16
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
17
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
18
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
19
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
20
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO

भाजपाकडून सत्तेसह संपत्तीचा वापर

By admin | Updated: March 7, 2017 04:38 IST

भाजपाने कधी नव्हे तो सत्ता आणि साधनसंपत्तीचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाण्यातील पत्रकार परिषदेत केला.

ठाणे : राज्यातील महापालिकांसह जिल्हा परिषदा निवडणुकांमध्ये भाजपाने कधी नव्हे तो सत्ता आणि साधनसंपत्तीचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाण्यातील पत्रकार परिषदेत केला.असे असूनही राज्यात राष्ट्रवादीला क्रमांक-२ ची मते म्हणजे सुमारे ५६ लाख मते मिळाली आहेत. तरीही, पराभव मान्य करून जिथे कमी पडलो, तिथे आत्मचिंतन करणार असल्याचे ते म्हणाले.पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ते ठाण्यात आले होते. त्या वेळी एका हॉटेलात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला. ते पुढे म्हणाले की, लोकशाहीत निवडणुकीत यशापयश येतच असते. आमच्या पक्षाने धैर्याने या अपयशाचा सामना केला आहे. या वेळची निवडणूक दोन मुद्यांवर अडचणीची ठरली. त्यात काँग्रेससोबत जशी आघाडी होणे आवश्यक होते, ती न झाल्याचा फटका, तर दुसरे म्हणजे महापालिका निवडणुकीपूर्वी काहींनी पक्ष सोडला, काहींनी ऐन निवडणुकीच्या वेळी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्याचीही निवडणूक निकालास झळ बसल्याचे ते म्हणाले. औरंगाबाद, पुणे, पिंपरी-चिंचवड या ठिकाणी पक्षाला जे नुकसान झाले, त्याचा खोलात जाऊन विचार करण्यात येत आहे. यश प्राप्त करता आले नाही, त्याला कोणती कारणे किंवा कुठे कमी पडलो, यासाठीही कार्यकर्ते व नेत्यांकडून अभ्यास सुरू आहे. जिल्हा परिषदा निवडणुकांच्या बाबतीत विजयी जागा लक्षात घेता ते म्हणाले की, भाजपा क्रमांक-१ चा पक्ष ठरला. दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी, तर तिसऱ्या क्रमांकावर शिवसेना आहे. पण, भाजपा आणि राष्ट्रवादीतील अंतर मात्र जास्त नाही. राष्ट्रवादीला राज्यात ५६ लाख, तर भाजपाला ६० लाख मते मिळाली आहेत. हे अंतर अवघे ४ लाखांचे आहे. जिल्हा परिषदा निवडणुकांत समविचारी पक्ष एकत्र आले असते, तर वेगळे चित्र बघायला मिळाले असते, असेही ते म्हणाले.पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी नेते त्यावर चर्चा करतीलच. राज्यात पक्षाला मिळालेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या मतांवरून मतदार पक्षासोबत असल्याचे ते म्हणाले. कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळे हे यश मिळाले, त्याबद्दल कार्यकर्त्यांचे आभार. सत्ताधाऱ्यांनी विविध प्रकारे सत्तेचा गैरवापर करूनही राष्ट्रवादीस जे यश मिळाले आहे, त्याबद्दल पक्षप्रमुख म्हणून जनतेचा आभारी आहे.पक्षांतरबंदीचा कायदा नव्हता, त्या वेळीसुद्धा अनेक जण पक्षाला सोडून गेले होते. हा पक्ष आणि पक्षाचा कार्यकर्ता जिद्दीने उभा राहतो. आगामी काळात अधिक उमेदीने काम करावे लागणार आहे. मोदीलाटेबाबत विचारल्यावर, ते आता लाट वाटत नाही. (प्रतिनिधी)>विरोधी पक्षनेत्याचा निर्णय १९ मार्चलाठाण्यातील विरोधी पक्षनेता कोण होणार, यासंदर्भात १९ मार्च रोजी होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत तो निर्णय होणार आहे. आमदार परिचारक यांच्यासंदर्भात ते म्हणाले की, त्यांचे विधान बेताल असून बेजबाबदारपणाचे आहे. त्या वेळी माजी मंत्री, आमदार जितेंद्र आव्हाड, तटकरे, माजी मंत्री गणेश नाईक, आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार संजीव नाईक, शहराध्यक्ष आनंद परांजपे, हणमंत जगदाळे आदी उपस्थित होते.