शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
3
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
4
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
5
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
6
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
7
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
8
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
9
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
10
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
11
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
12
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
13
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
14
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
15
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
16
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
17
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
19
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
20
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार

भाजपाने जीएसटीच्या मूळ हेतूला हरताळ फासला

By admin | Updated: June 24, 2017 03:55 IST

भाजपा सरकारने वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) मूळ हेतूलाच हरताळ फासला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : भाजपा सरकारने वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) मूळ हेतूलाच हरताळ फासला आहे. सरकार ज्या पद्धतीने या कराची अंमलबजावणी करत आहे, त्यामुळे छोट्या व्यापाऱ्यांवर अन्याय होत असून, सर्व घटकांशी चर्चा केल्याशिवाय जीएसटी लागू करण्यात येऊ नये, अशी मागणी मुंबई काँग्रेसने केली आहे. आझाद मैदान येथील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना, मुंबई अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले, सर्व अप्रत्यक्ष कर रद्द करून एकच कर ठेवावा, असे जीएसटीचे मूळ स्वरूप आहे, पण भाजपा सरकार ज्या पद्धतीने हा कर लागू करण्याचा प्रयत्न करत आहे, ती पद्धतच पूर्णत: चुकीची आहे. १ जुलैपासून लागू होणाऱ्या जीएसटीमध्ये चार टप्पे करण्यात आले आहेत. ५, १२, १८ आणि २८ टक्के असे वेगवेगळे करटप्पे यात आहेत. शिवाय, सेंट्रल जीएसटी, स्टेट जीएसटी आणि आंतरराज्य जीएसटी असे वेगवेगळे कर भरावे लागणार आहेत. यातील आंतरराज्य जीएसटी तर थेट जकातीचाच प्रकार आहे. जगात जिथे-जिथे जीएसटी आहे, तिथे वेगवेगळे दर असले, तरी एकच कर भरावा लागतो, पण भारतातील या कराचे दर सर्वात जास्त असून, चार प्रकारच्या जीएसटीमुळे गोंधळ निर्माण झाला आहे. प्रत्येक व्यवसायानुसार आणि वस्तुनुसार वेगळा कर लावला आहे. पत्रकार परिषदेला पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा, माजी आमदार चरणजीत सप्रा, मुंबई काँग्रेसचे महासचिव भूषण पाटील उपस्थित होते.