शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

भाजपाने जीएसटीच्या मूळ हेतूला हरताळ फासला

By admin | Updated: June 24, 2017 03:55 IST

भाजपा सरकारने वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) मूळ हेतूलाच हरताळ फासला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : भाजपा सरकारने वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) मूळ हेतूलाच हरताळ फासला आहे. सरकार ज्या पद्धतीने या कराची अंमलबजावणी करत आहे, त्यामुळे छोट्या व्यापाऱ्यांवर अन्याय होत असून, सर्व घटकांशी चर्चा केल्याशिवाय जीएसटी लागू करण्यात येऊ नये, अशी मागणी मुंबई काँग्रेसने केली आहे. आझाद मैदान येथील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना, मुंबई अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले, सर्व अप्रत्यक्ष कर रद्द करून एकच कर ठेवावा, असे जीएसटीचे मूळ स्वरूप आहे, पण भाजपा सरकार ज्या पद्धतीने हा कर लागू करण्याचा प्रयत्न करत आहे, ती पद्धतच पूर्णत: चुकीची आहे. १ जुलैपासून लागू होणाऱ्या जीएसटीमध्ये चार टप्पे करण्यात आले आहेत. ५, १२, १८ आणि २८ टक्के असे वेगवेगळे करटप्पे यात आहेत. शिवाय, सेंट्रल जीएसटी, स्टेट जीएसटी आणि आंतरराज्य जीएसटी असे वेगवेगळे कर भरावे लागणार आहेत. यातील आंतरराज्य जीएसटी तर थेट जकातीचाच प्रकार आहे. जगात जिथे-जिथे जीएसटी आहे, तिथे वेगवेगळे दर असले, तरी एकच कर भरावा लागतो, पण भारतातील या कराचे दर सर्वात जास्त असून, चार प्रकारच्या जीएसटीमुळे गोंधळ निर्माण झाला आहे. प्रत्येक व्यवसायानुसार आणि वस्तुनुसार वेगळा कर लावला आहे. पत्रकार परिषदेला पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा, माजी आमदार चरणजीत सप्रा, मुंबई काँग्रेसचे महासचिव भूषण पाटील उपस्थित होते.