शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा-शिवसेना सरकार लवकरच कोसळणार- अशोक चव्हाण

By admin | Updated: March 30, 2017 17:39 IST

निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपाने सत्तेवर येताच मात्र कर्जमाफी मिळणार नाही

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 30 - शेतकऱ्यांचे प्रश्न भाजपा सरकारला बिलकुल समजत नाहीत. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपाने सत्तेवर येताच मात्र कर्जमाफी मिळणार नाही, असा पावित्रा घेतला. शेतकऱ्यांच्या पीक विम्याची रक्कम कापून घ्या, असा जी.आर. सरकारने नुकताच काढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे भाजप-शिवसेनेचे हे सरकार आता फार काळ टिकणार नाही, ते लवकरच कोसळेल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी बुटीबोरी येथे केले.शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यात यावे, या मागणीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, युनायटेड जनता दल, समाजवादी पक्ष आणि एमआयएम या पक्षांनी संयुक्तपणे चांदा (चंद्रपूर) ते बांदा (पनवेल) पर्यंत संयुक्त संघर्ष यात्रा काढली आहे. चंद्रपूरपासून सुरु झालेली ही संघर्ष यात्रा गुरुवारी दुपारी १ वाजता बुटीबोरी येथे पोहोचली. बुटीबोरी चौकात जाहीर सभा पार पडली या सभेला मार्गदर्शन करताना खा. अशोक चव्हाण बोलत होते.यावेळी संघर्ष यात्रेत सहभागी झालेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान सभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, समाजवादी पार्टीचे नेते आ. अबू आजमी, शेकापचे आ. धैर्यशील पाटील, माजी मंत्री पतंगराव कदम, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात, गोपाल अग्रवाल, राजेंद्र मुळक, अनिल देशमुख, मधुकर चव्हाण सुनील केदार, रमेशबंग, बसवराज पाटील, विश्वजीत कदम, माया चौरे, प्रा. बबनराव तायवाडे, नाना गावंडे, राजाभाऊ टांकसाळे, कुंदा राऊत, बंटी शेळके आदी उपस्थित होते. खा. अशोक चव्हाण म्हणाले, गरीब सामान्यांना न्याय देण्यासाठी सरकार असते. परंतु श्रीमंतांच्या भाजप सरकारने सामान्यांना निराशाच दिली. भाजपच्या काळात गेल्या दोन वर्षात ९ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. तीअजुनही सुरू आहे. याचा निषेध करण्यासाठी आम्ही ही संघर्ष यात्रा काढली आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी म्हणून ही संघर्ष यात्रा आहे. तेव्हा तुम्ही (शेतकऱ्यांनी) आम्हाला हिम्मत द्या, लाठ्या-काठ्या खायला आम्ही तयार आहोत. तुमच्या हिमतीवर हे हे काही दिवस उरलेले भाजपा-शिवसेनेचे सरकार कोसळेल, असेही ते म्हणाले.सरकारने समृद्धी योजना आणली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जात आहेत. कायदा म्हणतो चार पट भाव मिळाला पाहिजे. परंतु मुख्यमंत्री फडणवीस मात्र सरकारसोबत भागिदारी करा म्हणतात. जे सरकार कोसळणार आहे, त्याच्या सोबत कोण भागिदारी करणार ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यावेळी जयंत पाटील, कुंदा राऊत आदींनी मार्गदर्शन केले.राजेंद्र मुळक यांनी संचालन केले.- महाराष्ट्रात नव्या समीकरणाचे संकेतशेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी, रिपब्लिकन पक्ष, एमआयएम. युनायडेट जनता दल यासारखे विविध राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. ही आगामी महाराष्ट्रातील नव्या समीकरणाचे संकेत आहेत, असेही खा. अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.राज्य सरकारवर खुनाच गुन्हा दाखल करा- शशिकांत शिंदेभाजपाच्या काळात दोन वर्षात ९ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सरकारच्या धोरणामुळे या आत्महत्या झाल्या आहेत. तेव्हा सरकार विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झापा पाहिजे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे म्हणाले. भाजपाचे सरकार हेबोगस मशीन आणि पैशाच्या भरवश्यार निवडून आले असल्याची टीकाही त्यांनी केली.- अर्थसंकल्प केवळ अडाणी -अंबानीसाठी- धैर्यशील पाटीलअर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा केवळ अडाणी व अंबानीसाठी आहे. त्यात शेतकऱ्यांसाठी काहीच नाही. उलट कपात करण्यात आली आहे. अशा वेळी आम्ही शेतकऱ्यांची बाजू लावून धरली तर आम्हला निलंबित करण्यात आले, अशी टीका शेकापचे आ. धैर्यशील पाटील यांनी केली.- ... तर असा गुन्हा शंभर वेळा करणार- सुनील केदारशेतकऱ्यांचे प्रश्न सभागृहात लावून धरणे, सरकारशी भांडणे हा गुन्हा ठरत असेल तर असे गुन्हे १०० वेळा करू, असे काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी स्पष्ट केले. उत्तर प्रदेशची निवडणूक शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी जिंकली तर मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्ज का माफ केले जात नाही? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.- व्यापाऱ्यांचे कर्ज माफ, मग शेतकऱ्यांचे का नाही- अबू आजमीपंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वाधिक खोटारटे व्यक्ती आहेत, अशी टीका समाजवादी पक्षाचे नेते आ. अबू आजमी यांनी केली. सर्वप्रथम प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये येतील असे आश्वासन दिले. ते अजुन पाळले नाही. मोठ्या व्यापाऱ्यांचे कर्ज माफ केले जाते, मग शेतकऱ्यांचे कर्ज का माफ केले जात नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले म्हणून १९ आमदारांचे निलंबन करण्यात आले. तेव्हा या सरकारला अद्दल घडवा, असे आवाहनही अबू आजमी यांनी केले.