शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीमुळे भाजपला शिवछत्रपतींची आठवण - राणे

By admin | Updated: September 24, 2014 15:31 IST

आधी निवडणुका आल्यावर भाजपला रामाची आठवण यायची. आता विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने भाजपला शिवछत्रपतींची आठवण येते असा टोला काँग्रेस नेते नारायण राणे यांनी लगावला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २४ -  आधी निवडणुका आल्यावर भाजपला रामाची आठवण यायची. आता विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने भाजपला शिवछत्रपतींची आठवण येते असा टोला काँग्रेस नेते नारायण राणे यांनी लगावला आहे. महाराष्ट्र भाजपकडे सक्षम नेता नसल्याने भाजपच्या बॅनरवर मोदींचेच फोटो झळकत आहेत अशी बोचरी टीकाही त्यांनी केली आहे.
काँग्रेस नेते नारायण राणे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन केंद्रातील भाजप सरकारवर कडाडून टीका केली. भाजपने मुंबईत लावलेल्या बॅनरवर शिवछत्रपतींचा आशिर्वाद असा उल्लेख केला आहे. तसेच  या बॅनर फक्त मोदींचे छायाचित्र असून त्यावर चलो मोदी के साथ असेही म्हटले आहे. यावरुन राणेंनी भाजपवर निशाणा साधला आहे.
मुंबईतील डायमंड उद्योग गुजरातमधील अहमदाबादमध्ये स्थलांतरीत करण्याचे प्रयत्न सुरु आहे. मुंबईला आर्थिक केंद्र बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणा-या रिझर्व बँकेतील तीन महत्त्वाचे विभाग दिल्लीत नेले जात आहे. मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा भाजपचा डाव आहे असेही राणेंनी सांगितले. शिवाजी महाराज महाराष्ट्रातील लोकांना त्यांचे आशिर्वाद देतील, गुजरातच्या लोकांना का देतील असे सांगत केंद्रात सत्तेवर आल्यावर भाजपने मुंबई समुद्रकिनारी होणा-या शिवछत्रपतींच्या पुतळ्याला आर्थिक मदत का केली नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. 
गोळीचे उत्तर गोळीनेच देऊन अशी सिंहगर्जना करणारे नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यावर किमान ५० वेळा शेजारी राष्ट्राने गोळीबार केला आहे. आता मोदींनी गोळी खिशात ठेवायला घेतली आहे का असे खोचक सवालही राणेंनी उपस्थित केला. मुंबईतील जेएनपीटी बंदरातील व्यवहार गुजरातमध्ये नेऊन जेएनपीटीच्या ताब्यातील १८०० एकर जमिन एका उद्योजकाच्या खिशात घालण्याचा भाजपचा डाव आहे असा गंभीर आरोपही राणेंनी केला आहे. सध्या फक्त गांधीनगर आणि अहमदाबादचाच विकास केला जात आहे असा आरोपही राणेंनी केला.