शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
2
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
3
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
4
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
5
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
6
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
7
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
8
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
9
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
10
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...
11
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
12
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
13
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
14
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
15
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
16
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
17
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
18
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
19
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
20
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले

राज्यात मध्यावधी निवडणुकांसाठी भाजप तयार; अमित शहांचे संकेत

By admin | Updated: June 17, 2017 17:36 IST

मध्यावधी निवडणुका लागल्या तर त्यासाठी भाजप तयार असल्याचे संकेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिले आहेत.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 17- राज्यात मध्यावधी निवडणुका लागल्या तर त्यासाठी भाजप तयार असल्याचे संकेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिले आहेत. मध्यावधी निवडणुका झाल्याच तर, आम्हाला लढावंच लागेल. मैदान सोडून तर जाता येणार नाही, असं त्यांनी स्पष्ट  केलं आहे. निवडणुका झाल्या तर भाजप लढेल आणि जिंकेलही, असा विश्वासही अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. मुंबईमध्ये आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये अमित शहा बोलत होते. याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यावधी निवडणुकांना भाजप तयार असल्याचे संकेत दिले होते. 
 
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा तीन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. रविवारी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेणार असल्याची चर्चा आहे.  गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप सगळ्यांच्या परिचयाचे आहेत. यातच सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा अनेकदा शिवसेना नेत्यांनी दिला आहे. तसंच मध्यावधी निवडणुकांचे संकेतही त्यांनी दिले आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा मध्यावधी निवडणुकांसाठी भाजप सज्ज आहे, असं म्हटलं होतं. यावरच अमित शहा यांना पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी  निवडणुका झाल्याच तर भाजपचाच विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 
 
पत्रकार परिषदेत अमित शहा यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबद्दलही वक्तव्य केलं आहे. उमेदवाराच्या नावावर सहमतीसाठी विरोधी पक्षांची चर्चा सुरू आहे. तसंच इतर पक्षांकडून सूचना मागविण्यात आल्याचं अमित शहा यांनी सांगितलं आहे. प्रत्येक पक्षाने दिलेल्या सल्ल्यावर विचार केला जाइल, असं उत्तर अमित शहा यांनी दिलं आहे. मुंबईमध्ये आज झालेल्या पत्रकार परिषदेत अमित शहा यांनी भाजपाने केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. मोदी सरकारनं तीन वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेला दिशा आणि गती दिली. सरकारवर आतापर्यंत एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही, असंही त्यांनी सांगितलं. महिला, आदिवासी, गरिबांसाठी आणलेल्या योजनांचाही त्यांनी उल्लेख केला. काळा पैसा आणि बेनामी संपत्तीविरोधात सरकारनं महत्त्वाची पावले उचलली, असंही त्यांनी सांगितलं आहे.