शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

राज्यात मध्यावधी निवडणुकांसाठी भाजप तयार; अमित शहांचे संकेत

By admin | Updated: June 17, 2017 17:36 IST

मध्यावधी निवडणुका लागल्या तर त्यासाठी भाजप तयार असल्याचे संकेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिले आहेत.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 17- राज्यात मध्यावधी निवडणुका लागल्या तर त्यासाठी भाजप तयार असल्याचे संकेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिले आहेत. मध्यावधी निवडणुका झाल्याच तर, आम्हाला लढावंच लागेल. मैदान सोडून तर जाता येणार नाही, असं त्यांनी स्पष्ट  केलं आहे. निवडणुका झाल्या तर भाजप लढेल आणि जिंकेलही, असा विश्वासही अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. मुंबईमध्ये आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये अमित शहा बोलत होते. याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यावधी निवडणुकांना भाजप तयार असल्याचे संकेत दिले होते. 
 
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा तीन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. रविवारी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेणार असल्याची चर्चा आहे.  गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप सगळ्यांच्या परिचयाचे आहेत. यातच सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा अनेकदा शिवसेना नेत्यांनी दिला आहे. तसंच मध्यावधी निवडणुकांचे संकेतही त्यांनी दिले आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा मध्यावधी निवडणुकांसाठी भाजप सज्ज आहे, असं म्हटलं होतं. यावरच अमित शहा यांना पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी  निवडणुका झाल्याच तर भाजपचाच विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 
 
पत्रकार परिषदेत अमित शहा यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबद्दलही वक्तव्य केलं आहे. उमेदवाराच्या नावावर सहमतीसाठी विरोधी पक्षांची चर्चा सुरू आहे. तसंच इतर पक्षांकडून सूचना मागविण्यात आल्याचं अमित शहा यांनी सांगितलं आहे. प्रत्येक पक्षाने दिलेल्या सल्ल्यावर विचार केला जाइल, असं उत्तर अमित शहा यांनी दिलं आहे. मुंबईमध्ये आज झालेल्या पत्रकार परिषदेत अमित शहा यांनी भाजपाने केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. मोदी सरकारनं तीन वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेला दिशा आणि गती दिली. सरकारवर आतापर्यंत एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही, असंही त्यांनी सांगितलं. महिला, आदिवासी, गरिबांसाठी आणलेल्या योजनांचाही त्यांनी उल्लेख केला. काळा पैसा आणि बेनामी संपत्तीविरोधात सरकारनं महत्त्वाची पावले उचलली, असंही त्यांनी सांगितलं आहे.