शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात मध्यावधी निवडणुकांसाठी भाजप तयार; अमित शहांचे संकेत

By admin | Updated: June 17, 2017 17:36 IST

मध्यावधी निवडणुका लागल्या तर त्यासाठी भाजप तयार असल्याचे संकेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिले आहेत.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 17- राज्यात मध्यावधी निवडणुका लागल्या तर त्यासाठी भाजप तयार असल्याचे संकेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिले आहेत. मध्यावधी निवडणुका झाल्याच तर, आम्हाला लढावंच लागेल. मैदान सोडून तर जाता येणार नाही, असं त्यांनी स्पष्ट  केलं आहे. निवडणुका झाल्या तर भाजप लढेल आणि जिंकेलही, असा विश्वासही अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. मुंबईमध्ये आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये अमित शहा बोलत होते. याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यावधी निवडणुकांना भाजप तयार असल्याचे संकेत दिले होते. 
 
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा तीन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. रविवारी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेणार असल्याची चर्चा आहे.  गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप सगळ्यांच्या परिचयाचे आहेत. यातच सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा अनेकदा शिवसेना नेत्यांनी दिला आहे. तसंच मध्यावधी निवडणुकांचे संकेतही त्यांनी दिले आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा मध्यावधी निवडणुकांसाठी भाजप सज्ज आहे, असं म्हटलं होतं. यावरच अमित शहा यांना पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी  निवडणुका झाल्याच तर भाजपचाच विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 
 
पत्रकार परिषदेत अमित शहा यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबद्दलही वक्तव्य केलं आहे. उमेदवाराच्या नावावर सहमतीसाठी विरोधी पक्षांची चर्चा सुरू आहे. तसंच इतर पक्षांकडून सूचना मागविण्यात आल्याचं अमित शहा यांनी सांगितलं आहे. प्रत्येक पक्षाने दिलेल्या सल्ल्यावर विचार केला जाइल, असं उत्तर अमित शहा यांनी दिलं आहे. मुंबईमध्ये आज झालेल्या पत्रकार परिषदेत अमित शहा यांनी भाजपाने केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. मोदी सरकारनं तीन वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेला दिशा आणि गती दिली. सरकारवर आतापर्यंत एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही, असंही त्यांनी सांगितलं. महिला, आदिवासी, गरिबांसाठी आणलेल्या योजनांचाही त्यांनी उल्लेख केला. काळा पैसा आणि बेनामी संपत्तीविरोधात सरकारनं महत्त्वाची पावले उचलली, असंही त्यांनी सांगितलं आहे.